शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण महाराष्ट्रात पहिली उचल २३९५ रुपये; दोन हप्त्यात उचलीची शिफारस : हंगाम संपल्यावर मिळणार उर्वरित बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याने घातलेल्या ऊसाची किंमत म्हणून दोन हप्त्यात रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) देण्याची शिफारस ...

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याने घातलेल्या ऊसाची किंमत म्हणून दोन हप्त्यात रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) देण्याची शिफारस साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासगटाने शासनाला केली आहे. मंत्री समितीने ही शिफारस ऊसदर नियंत्रण समितीकडे पाठवली आहे. ही शिफारस स्वीकारल्यास दक्षिण महाराष्ट्रात टनाला तीन हजार रुपये घेण्याची सवय लागलेल्या शेतकऱ्याला पहिली उचल २३९५ रुपये मिळेल. उर्वरित रक्कम हंगाम संपल्यावर एकूण एफआरपी निश्चित करून त्यातून पहिली उचल वजा करून शेतकऱ्याला दिली जाणार आहे.

ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्याला त्याच्या ऊसाचे बिल मिळणे कायद्याने बंधनकारक आहे. ते नाही दिल्यास त्यावरील व्याजासह रक्कम द्यावी लागते. ही तरतूद कारखान्यांना अडचणीची ठरते. कारण ऊसाची किंमत केंद्राने निश्चित करून दिली आहे; परंतु साखरेची किंमत मात्र बाजारावर सोडून दिली आहे. त्यामुळे बाजारात साखरेला चांगले दर असतील तेव्हाच साखर विक्री करायची झाल्यास १४ दिवसांत बिल देणे शक्य होत नाही. मग कर्जे काढून बिले दिली जातात व त्यातून कारखानदारी आर्थिक आरिष्टात सापडते. त्यातून मार्ग म्हणून दोन किंवा तीन हप्त्यात एफआरपी देण्याची शिफारस केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने केली होती. यंदाच्या हंगामापासून राज्य शासनानेच एफआरपीबाबतचे धोरण निश्चित करावे, असे केंद्राने सुचविले होते. ते धोरण कसे असावे, हे निश्चित करण्यासाठी हा अभ्यासगट नेमण्यात आला होता.

अभ्यासगटाने एफआरपी देण्यासाठीही दोन पर्याय सुचविले आहेत.

पर्याय क्रमांक ०१ : आतापर्यंत एफआरपी निश्चित करताना मागील हंगामाचा साखर उतारा आणि तोडणी-ओढणी खर्च विचारात घेतला जाई. ही पद्धत बदलून ज्या हंगामाची एफआरपी त्याच हंगामाचा उतारा व वाहतूक खर्च विचारात घेण्याची साखर कारखानदारीची मागणी मान्य करण्यात आली आहे. साखर उताऱ्यात हंगामभर चढ-उतार असतात. तो सुरुवातीला कमी असतो तर शेवटी जास्त असतो. म्हणून एकूण हंगामाचा साखर उतारा असेल तर विचारात घेऊन त्यानुसार एफआरपी निश्चित करण्यात येणार आहे. तोडणी-ओढणी खर्च मागील तीन वर्षाच्या सरासरीइतका विचारात घेण्यात येणार आहे. हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत हंगामाच्या अंतिम साखर उताऱ्यानुसार अंतिम एफआरपी निश्चित करून फरकाची रक्कम द्यावी, असे म्हटले आहे. पुणे महसूल विभागासाठी अभ्यासगटाने १०.५० साखर उतारा विचारात घेतला आहे. त्या हिशेबाने एकूण एफआरपी ३०४५ होते. त्यातून ६५० रुपये तोडणी-ओढणीचे वजा केल्यास शेतकऱ्याला २३९५ रुपये पहिली उचल मिळू शकेल.

पर्याय क्रमांक : ०२ केंद्र शासनाच्या ३१ ऑगस्ट २१२१ च्या अधिसूचनेनुसार मूलभूत किमान १० टक्के उताऱ्यासाठी टनास २९०० रुपये व ९.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास टनास २७५५ रुपये देण्यात यावा. त्यासाठी उतारा ९.५० हाच आधारभूत धरून त्यानुसार पैसे द्यावेत.

हंगामाच्या सुरुवातीला भौगोलिक क्षेत्रनिहाय किमान साखर उतारा व संभाव्य पहिली उचल अशी

१.नागपूर, अमरावती व औरंगाबाद महसूल विभाग : ९.५० टक्के : २१०० रुपये

२.नाशिक महसूल विभाग : १० टक्के : २२५०

३.पुणे महसूल विभाग : १०.५० : २३९५