शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
4
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
5
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
6
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
7
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
8
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
9
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
10
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
11
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
12
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
13
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
14
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
15
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
16
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
17
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
18
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
19
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
20
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार

यंत्रमाग उद्योगातील मंदीचा पहिला बळी

By admin | Updated: July 26, 2016 00:18 IST

वस्त्रनगरीतील उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी : शेतीखालोखाल रोजगार देणाऱ्या उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष

इचलकरंजी : गेल्या वर्षभरात यंत्रमाग उद्योगात असलेल्या आर्थिक मंदीची झळ पोहोचलेल्या एका यंत्रमाग कारखानदाराने सोमवारी आत्महत्या केल्याने वस्त्रनगरीत जोरदार खळबळ उडाली. राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणाऱ्या यंत्रमाग उद्योगासमोरील समस्यांकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचा पहिला बळी ठरल्याची चर्चा शहरात आहे. आता तरी सरकार जागे होईल का, असाही प्रश्न येथे विचारला जात आहे.वर्षभर यंत्रमाग उद्योगामध्ये कापडाला मागणी नसल्यामुळे आर्थिक मंदी जाणवत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाने कापड खरेदी केली जात आहे. मात्र, यंत्रमागावर उत्पादन होणारा सर्वच कापड मालाला उठाव नाही. अशा काहीशा विचित्र परिस्थितीमध्ये यंत्रमाग उद्योग अडकला आहे. त्यामुळे राज्यातील विविध यंत्रमाग केंद्रांमधील यंत्रमागधारकांच्या संघटना या समस्यांची सोडवणूक शासन स्तरावर व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.महाराष्ट्रात वस्त्रोद्योगामध्ये साधारणपणे एक कोटी जनतेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने या उद्योगासाठी संजीवनी देणारी पॅकेज योजना हाती घ्यावी, अशी आग्रहाची मागणी यंत्रमागधारक संघटनांची आहे. कापडाची निर्यात होण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे. त्याचबरोबर चीन देशातून आयात होणाऱ्या कमी भावाच्या कापडावर बंदी आणावी. यंत्रमागधारकांनी कापड उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी घेतलेल्या अर्थसहाय्यावर व्याजाचे अनुदान द्यावे. वीज दराची सवलत देण्याबरोबरच किमान वर्षभर विजेचे दर स्थिर राहावेत, अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करूनसुद्धा शासन दरबारी अद्याप तरी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे यंत्रमाग उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.अशा पार्श्वभूमीवर खर्चीवाले पद्धतीने (जॉब वर्क) कापड व्यापाऱ्यांना कापड विणून देणाऱ्या यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घट केली. किमान साडेसहा पैसे प्रतिमीटर आवश्यक असलेली मजुरी अवघ्या चार पैशांवर आली आहे. त्यामुळे यंत्रमाग कारखान्यात कारखानदाराने स्वत: काम करूनसुद्धा दैनंदिन नुकसान होत आहे. आज नाही उद्या उद्योगधंद्यामध्ये सुधारणा होईल, या आशेने यंत्रमाग उद्योग चालविले जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस गडद होणाऱ्या आर्थिक मंदीमुळे यंत्रमाग कारखानदारांना लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता काही प्रमाणावर सुरू असलेले यंत्रमाग कारखाने पुढील महिन्यापासून बंद पडू लागतील, अशीही भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)चौकटयंत्रमाग कारखानदारांनी संघर्ष करावा : महाजनयंत्रमाग उद्योगाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सवलतीच्या वीज दराबाबत अस्थिरता आणून शासनाने खेळखंडोबा केला, अशी प्रतिक्रिया यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, यंत्रमाग कारखानदारांनीसुद्धा संघर्ष करायला शिकले पाहिजे. उत्पादनात घट आणून होणारे नुकसान कमीत-कमी होईल, याची दक्षता घेण्याबरोबरच स्वत:ची आर्थिक क्षमता वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला तर कारखानदारांवर आत्महत्येसारखा प्रसंग ओढवणार नाही.