शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

यंत्रमाग उद्योगातील मंदीचा पहिला बळी

By admin | Updated: July 26, 2016 00:18 IST

वस्त्रनगरीतील उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी : शेतीखालोखाल रोजगार देणाऱ्या उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष

इचलकरंजी : गेल्या वर्षभरात यंत्रमाग उद्योगात असलेल्या आर्थिक मंदीची झळ पोहोचलेल्या एका यंत्रमाग कारखानदाराने सोमवारी आत्महत्या केल्याने वस्त्रनगरीत जोरदार खळबळ उडाली. राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणाऱ्या यंत्रमाग उद्योगासमोरील समस्यांकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचा पहिला बळी ठरल्याची चर्चा शहरात आहे. आता तरी सरकार जागे होईल का, असाही प्रश्न येथे विचारला जात आहे.वर्षभर यंत्रमाग उद्योगामध्ये कापडाला मागणी नसल्यामुळे आर्थिक मंदी जाणवत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाने कापड खरेदी केली जात आहे. मात्र, यंत्रमागावर उत्पादन होणारा सर्वच कापड मालाला उठाव नाही. अशा काहीशा विचित्र परिस्थितीमध्ये यंत्रमाग उद्योग अडकला आहे. त्यामुळे राज्यातील विविध यंत्रमाग केंद्रांमधील यंत्रमागधारकांच्या संघटना या समस्यांची सोडवणूक शासन स्तरावर व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.महाराष्ट्रात वस्त्रोद्योगामध्ये साधारणपणे एक कोटी जनतेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने या उद्योगासाठी संजीवनी देणारी पॅकेज योजना हाती घ्यावी, अशी आग्रहाची मागणी यंत्रमागधारक संघटनांची आहे. कापडाची निर्यात होण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे. त्याचबरोबर चीन देशातून आयात होणाऱ्या कमी भावाच्या कापडावर बंदी आणावी. यंत्रमागधारकांनी कापड उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी घेतलेल्या अर्थसहाय्यावर व्याजाचे अनुदान द्यावे. वीज दराची सवलत देण्याबरोबरच किमान वर्षभर विजेचे दर स्थिर राहावेत, अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करूनसुद्धा शासन दरबारी अद्याप तरी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे यंत्रमाग उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.अशा पार्श्वभूमीवर खर्चीवाले पद्धतीने (जॉब वर्क) कापड व्यापाऱ्यांना कापड विणून देणाऱ्या यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घट केली. किमान साडेसहा पैसे प्रतिमीटर आवश्यक असलेली मजुरी अवघ्या चार पैशांवर आली आहे. त्यामुळे यंत्रमाग कारखान्यात कारखानदाराने स्वत: काम करूनसुद्धा दैनंदिन नुकसान होत आहे. आज नाही उद्या उद्योगधंद्यामध्ये सुधारणा होईल, या आशेने यंत्रमाग उद्योग चालविले जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस गडद होणाऱ्या आर्थिक मंदीमुळे यंत्रमाग कारखानदारांना लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता काही प्रमाणावर सुरू असलेले यंत्रमाग कारखाने पुढील महिन्यापासून बंद पडू लागतील, अशीही भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)चौकटयंत्रमाग कारखानदारांनी संघर्ष करावा : महाजनयंत्रमाग उद्योगाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सवलतीच्या वीज दराबाबत अस्थिरता आणून शासनाने खेळखंडोबा केला, अशी प्रतिक्रिया यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, यंत्रमाग कारखानदारांनीसुद्धा संघर्ष करायला शिकले पाहिजे. उत्पादनात घट आणून होणारे नुकसान कमीत-कमी होईल, याची दक्षता घेण्याबरोबरच स्वत:ची आर्थिक क्षमता वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला तर कारखानदारांवर आत्महत्येसारखा प्रसंग ओढवणार नाही.