शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पहिल्यांदाच दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: December 26, 2014 00:04 IST

गेले तीन वर्षे गाजत असलेल्या केंद्र शासनाच्या ११२ कोटींच्या कर्जमाफीची वसुली झाली.

अवकाळी पाऊस, मान्सूनने उशिरा लावलेली हजेरी व लांबलेला परतीचा पाऊस, यामुळे सरत्या वर्षात शेतकऱ्यांची पुरती दमछाक उडाली. शेतकऱ्यांना बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच दुष्काळाच्या झळा काहीकाळ सहन कराव्या लागल्या. यंदा जिल्ह्णात ७३ दिवसांत १९ हजार ३४१ मिलीमीटर पाऊस झाला. सरासरी १६११.७८ मिलीमीटर पाऊस झाला असला तरी अनियमितपणामुळे तो त्रासदायक ठरला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम रब्बीवर झाला. मृगाची सलामी कोरडीच झाल्याने खरीप उगवण वेळाने झाली. जूनअखेर जिल्ह्णात सरासरीपेक्षा ३३ टक्केच पाऊस झाला. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सूनने हुलकावणी दिल्याने खरीप पिकाला झटका बसला. यामुळे दुष्काळाच्या झळा काय असतात, हे बऱ्याच वर्षांनंतर कोल्हापूरकरांनी अनुभवले. त्यानंतर पावसाने चांगली सुरुवात केली. यावर्षी पुराने फारसे नुकसान झाले नाही. आॅक्टोबरपर्यंत पाऊस लांबल्याने खरीप काढणीत अडचणी आल्या; पण उशिरा उगवण झालेल्या पिकांना तो पोषक ठरला. त्यानंतर डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. गेले तीन वर्षे गाजत असलेल्या केंद्र शासनाच्या ११२ कोटींच्या कर्जमाफीची वसुली झाली. जिल्हा बॅँकेने विकास संस्थांकडून ही रक्कम वसूल केल्याने शेतकऱ्यांना हे पैसे भरावे लागले. शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी असणाऱ्या भूविकास बॅँकेच्या पुनर्जिवनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. चौगुले समितीच्या अहवालानुसार कार्यवाही झालीच नाही. परिणामी, ‘भूविकास’ पुनर्जिवनाचे घोडे पुन्हा चौकशी समितीतच अडले. प्रशासक, अशासकीय मंडळ व पुन्हा प्रशासक अशा घोळात बाजार समितीचे सरते वर्ष चर्चेचे ठरले. समितीला न्यायालयीन लढाई नवी नसली तरी यावर्षी लढाईने टोक गाठले. गूळ नियमन रद्दमुळे हंगामाची सुरुवातच संभ्रमावस्थेत झाली. परिणामी, गुळाच्या आवकेवर परिणाम झाला. कांदा व गूळ उत्पादकांनी सरत्या वर्षात दोनवेळा समितीला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला. अडीच वर्षे जिल्ह्णात गाजत असलेल्या रोजंदारी नोकरभरतीतील कर्मचाऱ्यांना प्रशासकांनी कामावरून कमी केले. एकंदरीत बाजार समितीच्या दृष्टीने सरते वर्ष विविध कारणांनी वादाचे ठरले.शेतकऱ्यांकडून कारखान्याची कोंडीऊस पिकाला पोषक असे वातावरण राहिल्याने उत्पादन वाढलेच; शिवाय साखर उताऱ्याचा टक्काही वाढला. ऊसदरासाठी कायद्यावर बोट ठेवून कारखानदारांची कोंडी करण्यात शेतकऱ्यांना यश आले. परिणामी, आंदोलन न करताच सरासरी २५०० रुपये दर मिळाला. राजाराम लोंढे