शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

पहिल्यांदाच दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: December 26, 2014 00:04 IST

गेले तीन वर्षे गाजत असलेल्या केंद्र शासनाच्या ११२ कोटींच्या कर्जमाफीची वसुली झाली.

अवकाळी पाऊस, मान्सूनने उशिरा लावलेली हजेरी व लांबलेला परतीचा पाऊस, यामुळे सरत्या वर्षात शेतकऱ्यांची पुरती दमछाक उडाली. शेतकऱ्यांना बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच दुष्काळाच्या झळा काहीकाळ सहन कराव्या लागल्या. यंदा जिल्ह्णात ७३ दिवसांत १९ हजार ३४१ मिलीमीटर पाऊस झाला. सरासरी १६११.७८ मिलीमीटर पाऊस झाला असला तरी अनियमितपणामुळे तो त्रासदायक ठरला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम रब्बीवर झाला. मृगाची सलामी कोरडीच झाल्याने खरीप उगवण वेळाने झाली. जूनअखेर जिल्ह्णात सरासरीपेक्षा ३३ टक्केच पाऊस झाला. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सूनने हुलकावणी दिल्याने खरीप पिकाला झटका बसला. यामुळे दुष्काळाच्या झळा काय असतात, हे बऱ्याच वर्षांनंतर कोल्हापूरकरांनी अनुभवले. त्यानंतर पावसाने चांगली सुरुवात केली. यावर्षी पुराने फारसे नुकसान झाले नाही. आॅक्टोबरपर्यंत पाऊस लांबल्याने खरीप काढणीत अडचणी आल्या; पण उशिरा उगवण झालेल्या पिकांना तो पोषक ठरला. त्यानंतर डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. गेले तीन वर्षे गाजत असलेल्या केंद्र शासनाच्या ११२ कोटींच्या कर्जमाफीची वसुली झाली. जिल्हा बॅँकेने विकास संस्थांकडून ही रक्कम वसूल केल्याने शेतकऱ्यांना हे पैसे भरावे लागले. शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी असणाऱ्या भूविकास बॅँकेच्या पुनर्जिवनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. चौगुले समितीच्या अहवालानुसार कार्यवाही झालीच नाही. परिणामी, ‘भूविकास’ पुनर्जिवनाचे घोडे पुन्हा चौकशी समितीतच अडले. प्रशासक, अशासकीय मंडळ व पुन्हा प्रशासक अशा घोळात बाजार समितीचे सरते वर्ष चर्चेचे ठरले. समितीला न्यायालयीन लढाई नवी नसली तरी यावर्षी लढाईने टोक गाठले. गूळ नियमन रद्दमुळे हंगामाची सुरुवातच संभ्रमावस्थेत झाली. परिणामी, गुळाच्या आवकेवर परिणाम झाला. कांदा व गूळ उत्पादकांनी सरत्या वर्षात दोनवेळा समितीला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला. अडीच वर्षे जिल्ह्णात गाजत असलेल्या रोजंदारी नोकरभरतीतील कर्मचाऱ्यांना प्रशासकांनी कामावरून कमी केले. एकंदरीत बाजार समितीच्या दृष्टीने सरते वर्ष विविध कारणांनी वादाचे ठरले.शेतकऱ्यांकडून कारखान्याची कोंडीऊस पिकाला पोषक असे वातावरण राहिल्याने उत्पादन वाढलेच; शिवाय साखर उताऱ्याचा टक्काही वाढला. ऊसदरासाठी कायद्यावर बोट ठेवून कारखानदारांची कोंडी करण्यात शेतकऱ्यांना यश आले. परिणामी, आंदोलन न करताच सरासरी २५०० रुपये दर मिळाला. राजाराम लोंढे