शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

पहिल्यांदाच दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: December 26, 2014 00:04 IST

गेले तीन वर्षे गाजत असलेल्या केंद्र शासनाच्या ११२ कोटींच्या कर्जमाफीची वसुली झाली.

अवकाळी पाऊस, मान्सूनने उशिरा लावलेली हजेरी व लांबलेला परतीचा पाऊस, यामुळे सरत्या वर्षात शेतकऱ्यांची पुरती दमछाक उडाली. शेतकऱ्यांना बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच दुष्काळाच्या झळा काहीकाळ सहन कराव्या लागल्या. यंदा जिल्ह्णात ७३ दिवसांत १९ हजार ३४१ मिलीमीटर पाऊस झाला. सरासरी १६११.७८ मिलीमीटर पाऊस झाला असला तरी अनियमितपणामुळे तो त्रासदायक ठरला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम रब्बीवर झाला. मृगाची सलामी कोरडीच झाल्याने खरीप उगवण वेळाने झाली. जूनअखेर जिल्ह्णात सरासरीपेक्षा ३३ टक्केच पाऊस झाला. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सूनने हुलकावणी दिल्याने खरीप पिकाला झटका बसला. यामुळे दुष्काळाच्या झळा काय असतात, हे बऱ्याच वर्षांनंतर कोल्हापूरकरांनी अनुभवले. त्यानंतर पावसाने चांगली सुरुवात केली. यावर्षी पुराने फारसे नुकसान झाले नाही. आॅक्टोबरपर्यंत पाऊस लांबल्याने खरीप काढणीत अडचणी आल्या; पण उशिरा उगवण झालेल्या पिकांना तो पोषक ठरला. त्यानंतर डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. गेले तीन वर्षे गाजत असलेल्या केंद्र शासनाच्या ११२ कोटींच्या कर्जमाफीची वसुली झाली. जिल्हा बॅँकेने विकास संस्थांकडून ही रक्कम वसूल केल्याने शेतकऱ्यांना हे पैसे भरावे लागले. शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी असणाऱ्या भूविकास बॅँकेच्या पुनर्जिवनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. चौगुले समितीच्या अहवालानुसार कार्यवाही झालीच नाही. परिणामी, ‘भूविकास’ पुनर्जिवनाचे घोडे पुन्हा चौकशी समितीतच अडले. प्रशासक, अशासकीय मंडळ व पुन्हा प्रशासक अशा घोळात बाजार समितीचे सरते वर्ष चर्चेचे ठरले. समितीला न्यायालयीन लढाई नवी नसली तरी यावर्षी लढाईने टोक गाठले. गूळ नियमन रद्दमुळे हंगामाची सुरुवातच संभ्रमावस्थेत झाली. परिणामी, गुळाच्या आवकेवर परिणाम झाला. कांदा व गूळ उत्पादकांनी सरत्या वर्षात दोनवेळा समितीला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला. अडीच वर्षे जिल्ह्णात गाजत असलेल्या रोजंदारी नोकरभरतीतील कर्मचाऱ्यांना प्रशासकांनी कामावरून कमी केले. एकंदरीत बाजार समितीच्या दृष्टीने सरते वर्ष विविध कारणांनी वादाचे ठरले.शेतकऱ्यांकडून कारखान्याची कोंडीऊस पिकाला पोषक असे वातावरण राहिल्याने उत्पादन वाढलेच; शिवाय साखर उताऱ्याचा टक्काही वाढला. ऊसदरासाठी कायद्यावर बोट ठेवून कारखानदारांची कोंडी करण्यात शेतकऱ्यांना यश आले. परिणामी, आंदोलन न करताच सरासरी २५०० रुपये दर मिळाला. राजाराम लोंढे