शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

आधी उपाययोजना, मगच लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:21 IST

लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करणार असल्यास त्यापूर्वी सर्व घटकांचा विचार होणे ...

लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करणार असल्यास त्यापूर्वी सर्व घटकांचा विचार होणे अपेक्षित आहे. कोणत्याही घटकांची कुचंबणा होऊ नये, कोणावर उपासमारीची वेळ येऊ नये, यादृष्टीने प्रथम उपाययोजनांची आखणी करावी. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. लॉकडाऊनमधील वीजबिल, कर आकारणी, कर्जाचे हप्ते याचा भार शेतकरी, कामगार, व्यापारी व उद्योजक यांना सोसावा लागू नये, असेही खासदार संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा. तूर्तास लसीचा राखीव साठा न करता सर्वांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावेत, असे नमूद करून पत्रात पुढे म्हटले आहे की, बाधितांचा रिकव्हरी रेट वाढवून मृत्यू दर रोखणे हे देखील सरकारपुढील आव्हान आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा होत असलेला काळाबाजार व साठेबाजीस आळा घालण्यासाठी या इंजेक्शनचे वितरण संपूर्ण सरकारच्या नियंत्रणात घ्यावे. रुग्णालयांची कार्यक्षमता वाढवावी, बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर, अशा आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. लॉकडाऊन जनतेला कोरोनापेक्षा जास्त जाचक वाटणार नाही याची खबरदारी घ्या.