शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:46 IST

उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला

ठळक मुद्देजयसिंगपूर येथील विराट ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग; धुराडी पेटू न देण्याचा इशारासंसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार

विश्वास पाटील-राजाराम लोंढे-संदीप बावचे जयसिंगपूर : उसाला पहिली उचल टनास एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यास शेतकºयांनी हात वर करून व मुठी आवळून प्रतिसाद दिला. पहिल्या उचलीबाबत आम्ही लवचिक आहे; परंतु सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत ऊसतोड नाकारा, असे शेट्टी यांनी शेतकºयांना बजावले.

या परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली. या परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपºयांतून शेतकरी प्रचंड संख्येने आले होते. खोत यांनी ऊसदर म्हणजे मटक्याचा आकडा नव्हे, अशी टीका केली होती, त्यास उत्तर द्यायला लोक त्वेषाने आले. त्यामुळे गर्दीचा उच्चांक झाला. विक्रमसिंह मैदानावर झालेल्या या सोळाव्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अजितबाबा शिंदे-नेसरीकर होते.

ऊसदराचा महाराष्ट्राला लागू होणारा निर्णय याच परिषदेत होणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, ‘मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ऊसदराचे काय ठरवायचे, अशी विचारणा करीत आहेत. हा प्रश्न तुम्हाला संपला असल्याचे वाटत असेल, तर मग गेल्यावर्षी ऊसदराचा प्रश्न मी सोडविला असे श्रेय घ्यायला कशाला आला होता..? यंदा देशात जो साखरसाठा शिल्लक आहे, तो या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर आयात न केल्यास तुमच्या उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळेल. थोडा धीर धरा. देशाची गरज २४० लाख टनांची आहे व तेवढेच उत्पादन होणार असल्याने चांगला दर मिळेल, परंतु त्यासाठी १५ दिवस कारखाने बंद पाडायची तयारी ठेवा.

यावेळची लढाई दुहेरी असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, ‘ऊसदरासाठीचा संघर्ष आहेच, परंतु त्याशिवाय देशातील शेतकºयांचा सात-बारा कोरा करण्यासाठीही संघर्ष करायचा आहे. जोपर्यंत खासगी सावकारांसह शेतकºयांच्या डोक्यावरील संपूर्ण कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत ही लढाई आता थांबणार नाही. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठीच आम्ही देशभरातील शेतकºयांना घेऊन दिल्लीवर धडक देणार आहे. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार असून, त्यातील एक सत्र आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या विधवा घेणार आहेत. त्यातील ठराव आम्ही राष्ट्रपतींना भेटून देणार आहे. ही खरी कष्टकºयांची संसद असल्याचे आम्ही देशाला दाखवून देऊ.’‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’च्या खर्चासाठी शेतकºयांचा प्रतिसादसात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी २० नोव्हेंबरला दिल्लीत धडक देण्यासाठी महाराष्ट्रातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ म्हणून एक स्पेशल रेल्वेच नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.राज्यातील आत्महत्या केलेल्या ५४३ शेतकºयांच्या विधवांना सन्मानाने किसान संसदेला नेण्यात येणार आहे. रेल्वेच्या खर्चासाठी संघटनेच्यावतीने मदतीच्या आवाहनास शेतकºयांनी भरभरून प्रतिसाद दिला.आमच्यामुळेच ४२ खासदारखासदार शेट्टी म्हणाले, ‘भाजपवाल्यांना मते द्या, असे सांगत मी महाराष्ट्राच्या गावागावांत गेलो म्हणून कधी नव्हे ते ४८ पैकी ४२ खासदार भाजपचे निवडून आले; परंतु निवडून आलेले भामटे निघाले. भाजपवाले मला म्हणतात की मोदींवर टीका करू नका, आम्हाला यातना होतात. परंतु तुम्ही शेतकºयांच्या जीवनात अच्छे दिन आणतो असे सांगून आमचा विश्वासघात केला, त्याच्या यातना आम्हाला होत नाहीत का, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.‘लोकमत’ चे अभिनंदनऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने शनिवारच्या अंकात ऊस दराचे अर्थकारण मांडणारे लेखन प्रसिद्ध केल्याबद्दल परिषदेत ‘लोकमत’चे अभिनंदन केले. उपस्थित शेतकºयांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणStrikeसंप