शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:46 IST

उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला

ठळक मुद्देजयसिंगपूर येथील विराट ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग; धुराडी पेटू न देण्याचा इशारासंसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार

विश्वास पाटील-राजाराम लोंढे-संदीप बावचे जयसिंगपूर : उसाला पहिली उचल टनास एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यास शेतकºयांनी हात वर करून व मुठी आवळून प्रतिसाद दिला. पहिल्या उचलीबाबत आम्ही लवचिक आहे; परंतु सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत ऊसतोड नाकारा, असे शेट्टी यांनी शेतकºयांना बजावले.

या परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली. या परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपºयांतून शेतकरी प्रचंड संख्येने आले होते. खोत यांनी ऊसदर म्हणजे मटक्याचा आकडा नव्हे, अशी टीका केली होती, त्यास उत्तर द्यायला लोक त्वेषाने आले. त्यामुळे गर्दीचा उच्चांक झाला. विक्रमसिंह मैदानावर झालेल्या या सोळाव्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अजितबाबा शिंदे-नेसरीकर होते.

ऊसदराचा महाराष्ट्राला लागू होणारा निर्णय याच परिषदेत होणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, ‘मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ऊसदराचे काय ठरवायचे, अशी विचारणा करीत आहेत. हा प्रश्न तुम्हाला संपला असल्याचे वाटत असेल, तर मग गेल्यावर्षी ऊसदराचा प्रश्न मी सोडविला असे श्रेय घ्यायला कशाला आला होता..? यंदा देशात जो साखरसाठा शिल्लक आहे, तो या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर आयात न केल्यास तुमच्या उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळेल. थोडा धीर धरा. देशाची गरज २४० लाख टनांची आहे व तेवढेच उत्पादन होणार असल्याने चांगला दर मिळेल, परंतु त्यासाठी १५ दिवस कारखाने बंद पाडायची तयारी ठेवा.

यावेळची लढाई दुहेरी असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, ‘ऊसदरासाठीचा संघर्ष आहेच, परंतु त्याशिवाय देशातील शेतकºयांचा सात-बारा कोरा करण्यासाठीही संघर्ष करायचा आहे. जोपर्यंत खासगी सावकारांसह शेतकºयांच्या डोक्यावरील संपूर्ण कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत ही लढाई आता थांबणार नाही. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठीच आम्ही देशभरातील शेतकºयांना घेऊन दिल्लीवर धडक देणार आहे. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार असून, त्यातील एक सत्र आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या विधवा घेणार आहेत. त्यातील ठराव आम्ही राष्ट्रपतींना भेटून देणार आहे. ही खरी कष्टकºयांची संसद असल्याचे आम्ही देशाला दाखवून देऊ.’‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’च्या खर्चासाठी शेतकºयांचा प्रतिसादसात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी २० नोव्हेंबरला दिल्लीत धडक देण्यासाठी महाराष्ट्रातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ म्हणून एक स्पेशल रेल्वेच नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.राज्यातील आत्महत्या केलेल्या ५४३ शेतकºयांच्या विधवांना सन्मानाने किसान संसदेला नेण्यात येणार आहे. रेल्वेच्या खर्चासाठी संघटनेच्यावतीने मदतीच्या आवाहनास शेतकºयांनी भरभरून प्रतिसाद दिला.आमच्यामुळेच ४२ खासदारखासदार शेट्टी म्हणाले, ‘भाजपवाल्यांना मते द्या, असे सांगत मी महाराष्ट्राच्या गावागावांत गेलो म्हणून कधी नव्हे ते ४८ पैकी ४२ खासदार भाजपचे निवडून आले; परंतु निवडून आलेले भामटे निघाले. भाजपवाले मला म्हणतात की मोदींवर टीका करू नका, आम्हाला यातना होतात. परंतु तुम्ही शेतकºयांच्या जीवनात अच्छे दिन आणतो असे सांगून आमचा विश्वासघात केला, त्याच्या यातना आम्हाला होत नाहीत का, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.‘लोकमत’ चे अभिनंदनऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने शनिवारच्या अंकात ऊस दराचे अर्थकारण मांडणारे लेखन प्रसिद्ध केल्याबद्दल परिषदेत ‘लोकमत’चे अभिनंदन केले. उपस्थित शेतकºयांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणStrikeसंप