शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

यंदा पहिली उचल २७०० रुपये शक्य

By admin | Updated: November 1, 2014 00:41 IST

आज ऊस परिषद : मागणीपेक्षा मिळणार किती याचीच उत्सुकता

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तेरावी ऊस परिषद उद्या, शनिवारी जयसिंगपूर येथील ऐतिहासिक विक्रमसिंह मैदानावर होत आहे. दुपारी एक वाजता ही परिषद होत असून, त्यामध्ये संघटना पहिल्या उचलीचा बार फोडणार आहे. किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देणे तर सर्वच कारखानदारांना बंधनकारक आहे. त्यामुळे त्याहून जास्त किती उचल मिळणार आणि मिळविणार यातच संघटनेचा कस लागेल. गतवर्षी तीन हजारांची मागणी करून २६५० शी तडजोड केली. त्यामुळे यंदा २७००-२८०० रुपयांची मागणी करून तेवढी मिळविण्याचा संघटनेचा विचार आहे.कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत संघटनेचा प्रभाव जास्त आहे. या जिल्ह्यांतील बहुतेक सर्वच साखर कारखान्यांची सरासरी एफआरपी ही २२०० पासून २५०० रुपयांपर्यंत आहे. सदाशिवराव मंडलिक व बिद्रीसह मोजक्याच कारखान्यांची ती २६०० पर्यंत आहे. त्यामुळे एवढी उचल ही कारखान्यांना द्यावीच लागेल. आज बाजारात साखरेचा दर क्विंटलला २६८० पर्यंत आहे. किरकोळ बाजारात तो किलोस ३४ रुपयांपर्यंत आहे. नजीकच्या काळात दर याहून वाढतील अशी स्थिती सध्यातरी दिसत नाही. अशा स्थितीत मग पहिली उचल हेच अंतिम बिल राहणार की काय, ही भीती शेतकऱ्यांच्या मनांत आहे. कारखानदार दुसरा हप्ता ठरवून घेतात; परंतु तो प्रत्यक्षात दिला जात नाही. तो मिळावा अशी कायदेशीर व्यवस्था नाही. गेल्या हंगामात संघटनेने तीन हजार रुपयांच्या पहिल्या उचलीची मागणी ऊस परिषदेत केली होती. त्यात पुढे-मागे होण्याची तयारी असल्याचे सांगून शेट्टी यांनी चर्चेस तयार असल्याचे जाहीर केले होते; परंतु तोंडावर लोकसभा निवडणूक असल्याने कोणताच साखर कारखानदार, जिल्हा प्रशासन चर्चेसाठी पुढे आले नाही. राज्य सरकारही तोडगा काढण्याबाबत ताठर राहिल्याने शेवटी तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाच पुढाकार घ्यावा लागला व त्यांच्याशी झालेल्या चर्चेत २२०० व ४५० अशा २६५० रुपयांच्या उचलीस शेट्टी यांना मान्यता द्यावी लागली. परंतु, तेवढे अंतिम बिल फक्त कागलचा शाहू व बिद्री कारखान्यांनीच दिले आहे. ‘एफआरपी’प्रमाणे जेवढे कायदेशीर देणे द्यावे लागत होते. तेवढेच बहुतेक कारखान्यांनी दिले. काही चांगल्या कारखान्यांनी त्यापेक्षा जास्त दर दिला; परंतु ज्यांनी तोडगा काढला त्या मंडलिक कारखान्यानेही २५०० रुपयेच दिले. त्यामुळे यंदा संघटना पहिली उचल किती जाहीर करणार आणि त्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती मिळणार, याबद्दल उत्सुकता आहे.