शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

यंदा पहिली उचल २७०० रुपये शक्य

By admin | Updated: November 1, 2014 00:41 IST

आज ऊस परिषद : मागणीपेक्षा मिळणार किती याचीच उत्सुकता

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तेरावी ऊस परिषद उद्या, शनिवारी जयसिंगपूर येथील ऐतिहासिक विक्रमसिंह मैदानावर होत आहे. दुपारी एक वाजता ही परिषद होत असून, त्यामध्ये संघटना पहिल्या उचलीचा बार फोडणार आहे. किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देणे तर सर्वच कारखानदारांना बंधनकारक आहे. त्यामुळे त्याहून जास्त किती उचल मिळणार आणि मिळविणार यातच संघटनेचा कस लागेल. गतवर्षी तीन हजारांची मागणी करून २६५० शी तडजोड केली. त्यामुळे यंदा २७००-२८०० रुपयांची मागणी करून तेवढी मिळविण्याचा संघटनेचा विचार आहे.कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत संघटनेचा प्रभाव जास्त आहे. या जिल्ह्यांतील बहुतेक सर्वच साखर कारखान्यांची सरासरी एफआरपी ही २२०० पासून २५०० रुपयांपर्यंत आहे. सदाशिवराव मंडलिक व बिद्रीसह मोजक्याच कारखान्यांची ती २६०० पर्यंत आहे. त्यामुळे एवढी उचल ही कारखान्यांना द्यावीच लागेल. आज बाजारात साखरेचा दर क्विंटलला २६८० पर्यंत आहे. किरकोळ बाजारात तो किलोस ३४ रुपयांपर्यंत आहे. नजीकच्या काळात दर याहून वाढतील अशी स्थिती सध्यातरी दिसत नाही. अशा स्थितीत मग पहिली उचल हेच अंतिम बिल राहणार की काय, ही भीती शेतकऱ्यांच्या मनांत आहे. कारखानदार दुसरा हप्ता ठरवून घेतात; परंतु तो प्रत्यक्षात दिला जात नाही. तो मिळावा अशी कायदेशीर व्यवस्था नाही. गेल्या हंगामात संघटनेने तीन हजार रुपयांच्या पहिल्या उचलीची मागणी ऊस परिषदेत केली होती. त्यात पुढे-मागे होण्याची तयारी असल्याचे सांगून शेट्टी यांनी चर्चेस तयार असल्याचे जाहीर केले होते; परंतु तोंडावर लोकसभा निवडणूक असल्याने कोणताच साखर कारखानदार, जिल्हा प्रशासन चर्चेसाठी पुढे आले नाही. राज्य सरकारही तोडगा काढण्याबाबत ताठर राहिल्याने शेवटी तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाच पुढाकार घ्यावा लागला व त्यांच्याशी झालेल्या चर्चेत २२०० व ४५० अशा २६५० रुपयांच्या उचलीस शेट्टी यांना मान्यता द्यावी लागली. परंतु, तेवढे अंतिम बिल फक्त कागलचा शाहू व बिद्री कारखान्यांनीच दिले आहे. ‘एफआरपी’प्रमाणे जेवढे कायदेशीर देणे द्यावे लागत होते. तेवढेच बहुतेक कारखान्यांनी दिले. काही चांगल्या कारखान्यांनी त्यापेक्षा जास्त दर दिला; परंतु ज्यांनी तोडगा काढला त्या मंडलिक कारखान्यानेही २५०० रुपयेच दिले. त्यामुळे यंदा संघटना पहिली उचल किती जाहीर करणार आणि त्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती मिळणार, याबद्दल उत्सुकता आहे.