शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

हेळेवाडीत जिल्ह्यातील पहिली ज्ञानरचनावादी शाळा

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

बंदिस्त चौकट मोडली : विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी; प्रधान शिक्षण सचिव उद्या शाळा भेटीवर

रवींद्र हिडदुगी -- नेसरी  शिकविणाऱ्या शिक्षकाला जसं स्वातंत्र्य हवं असतं, तसं ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही हवं आहे’, हे प्रमुख तत्त्व ज्ञानरचनावादामध्ये मान्य करण्यात आले आहे. केवळ घोकंपट्टी किंवा ‘मी सांगतो ते तुम्ही ऐकायचे’ ही शिक्षककेंद्रित प्रचलित शिक्षण व्यवस्था ‘वर्तनवादी’ म्हणून ओळखली जाते. हीच बंदिस्त चौकट मोडून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अंगांचा विचार करणारी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती पुढे येत आहे.हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका शशिकला पाटील यांनी ज्ञानरचनावादाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व कृतियुक्त अध्ययन अध्यापनासाठी मनोरंजनात्मक शैक्षणिक साहित्य विकसित केले आहे. यासाठी त्यांनी काही प्रयोगशील शाळांना भेटी दिल्या आहेत. तसेच शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून, मते अजमावून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली रचनावादी शाळा बनविण्याचा मान पटकाविला आहे.शिक्षक, अधिकारी, शिक्षणप्रेमी आणि न्यायाधीश यांनी ही शाळा पाहून या शाळेचे कौतुक केले. ही शाळा रचनावाद शिक्षणाची मॉडेल शाळा म्हणून उदयास येत असून ही चळवळ जिल्हाभर नेटाने पुढे जात आहे. या प्रयोगाची राज्य शासनानेही दखल घेतली असून, रविवारी (दि. २२) राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार शाळेला भेट देणार आहेत.महाराष्ट्रात १ एप्रिल २०१० पासून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी सुरू आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचे व दर्जेदार शिक्षणाचे वचन मिळाले आहे. २००५ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शिक्षण ही पोस्टामार्फत किंवा शिक्षकामार्फत वितरित करायची भौतिक गोष्ट नसून, एक चैतन्यदायी प्रक्रिया मानली गेली. त्यातून स्वयंअध्ययन व कृतिशिलता या पायाभूत ज्ञानरचनावादी अध्ययन, अध्यापन पद्धतीचा अंगीकार झाला.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या धर्तीवर राज्य अभ्यासक्रम आराखडा (२०१०) तयार झाला आहे. त्यातही ज्ञानरचनावाद अधोरेखित केला आहे. २०१३ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमात रचनावादाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकेही रचनावादी पद्धतीने तयार करण्यात आली.असा आहे ज्ञानरचनावाद ज्ञानरचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. मुल कसे शिकते? या जुन्याच प्रश्नाचे अर्थपूर्ण असे नवे उत्तर देण्याचा प्रयत्न ज्ञानरचनावादाने केला आहे. नवे ज्ञान हे पूर्वज्ञानाला जोडून येत असते. हे रचनावादाचे प्रमुख सूत्र आहे. यामध्ये शिक्षकांंची भूमिका, मार्गदर्शन व उत्तम सुलभकाची आहे. प्रत्येक मूल स्वतंत्र असते व प्रत्येक मूल शिकू शकते यावर विश्वास असणारी ज्ञानरचनावादी चळवळ गतीने पुढे गेल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, हे हेळेवाडीसारख्या अगदी छोट्या खेड्यातील शाळेने दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी विद्यार्थ्याला आणणारा ज्ञानरचनावाद सर्व शाळांनी अनुसरल्यास महाराष्ट्र राज्य देशात ज्ञानरचनावादी मॉडेल म्हणून उदयास येईल. मात्र, यासाठी सर्व अधिकारी व शिक्षकांनी जबरदस्त इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास अंगी बाळगून कामाला लागणे विद्यार्थ्यांच्या पर्यायाने देशाच्या हिताचे ठरेल.