शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हेळेवाडीत जिल्ह्यातील पहिली ज्ञानरचनावादी शाळा

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

बंदिस्त चौकट मोडली : विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी; प्रधान शिक्षण सचिव उद्या शाळा भेटीवर

रवींद्र हिडदुगी -- नेसरी  शिकविणाऱ्या शिक्षकाला जसं स्वातंत्र्य हवं असतं, तसं ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही हवं आहे’, हे प्रमुख तत्त्व ज्ञानरचनावादामध्ये मान्य करण्यात आले आहे. केवळ घोकंपट्टी किंवा ‘मी सांगतो ते तुम्ही ऐकायचे’ ही शिक्षककेंद्रित प्रचलित शिक्षण व्यवस्था ‘वर्तनवादी’ म्हणून ओळखली जाते. हीच बंदिस्त चौकट मोडून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अंगांचा विचार करणारी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती पुढे येत आहे.हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका शशिकला पाटील यांनी ज्ञानरचनावादाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व कृतियुक्त अध्ययन अध्यापनासाठी मनोरंजनात्मक शैक्षणिक साहित्य विकसित केले आहे. यासाठी त्यांनी काही प्रयोगशील शाळांना भेटी दिल्या आहेत. तसेच शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून, मते अजमावून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली रचनावादी शाळा बनविण्याचा मान पटकाविला आहे.शिक्षक, अधिकारी, शिक्षणप्रेमी आणि न्यायाधीश यांनी ही शाळा पाहून या शाळेचे कौतुक केले. ही शाळा रचनावाद शिक्षणाची मॉडेल शाळा म्हणून उदयास येत असून ही चळवळ जिल्हाभर नेटाने पुढे जात आहे. या प्रयोगाची राज्य शासनानेही दखल घेतली असून, रविवारी (दि. २२) राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार शाळेला भेट देणार आहेत.महाराष्ट्रात १ एप्रिल २०१० पासून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी सुरू आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचे व दर्जेदार शिक्षणाचे वचन मिळाले आहे. २००५ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शिक्षण ही पोस्टामार्फत किंवा शिक्षकामार्फत वितरित करायची भौतिक गोष्ट नसून, एक चैतन्यदायी प्रक्रिया मानली गेली. त्यातून स्वयंअध्ययन व कृतिशिलता या पायाभूत ज्ञानरचनावादी अध्ययन, अध्यापन पद्धतीचा अंगीकार झाला.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या धर्तीवर राज्य अभ्यासक्रम आराखडा (२०१०) तयार झाला आहे. त्यातही ज्ञानरचनावाद अधोरेखित केला आहे. २०१३ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमात रचनावादाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकेही रचनावादी पद्धतीने तयार करण्यात आली.असा आहे ज्ञानरचनावाद ज्ञानरचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. मुल कसे शिकते? या जुन्याच प्रश्नाचे अर्थपूर्ण असे नवे उत्तर देण्याचा प्रयत्न ज्ञानरचनावादाने केला आहे. नवे ज्ञान हे पूर्वज्ञानाला जोडून येत असते. हे रचनावादाचे प्रमुख सूत्र आहे. यामध्ये शिक्षकांंची भूमिका, मार्गदर्शन व उत्तम सुलभकाची आहे. प्रत्येक मूल स्वतंत्र असते व प्रत्येक मूल शिकू शकते यावर विश्वास असणारी ज्ञानरचनावादी चळवळ गतीने पुढे गेल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, हे हेळेवाडीसारख्या अगदी छोट्या खेड्यातील शाळेने दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी विद्यार्थ्याला आणणारा ज्ञानरचनावाद सर्व शाळांनी अनुसरल्यास महाराष्ट्र राज्य देशात ज्ञानरचनावादी मॉडेल म्हणून उदयास येईल. मात्र, यासाठी सर्व अधिकारी व शिक्षकांनी जबरदस्त इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास अंगी बाळगून कामाला लागणे विद्यार्थ्यांच्या पर्यायाने देशाच्या हिताचे ठरेल.