शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

हेळेवाडीत जिल्ह्यातील पहिली ज्ञानरचनावादी शाळा

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

बंदिस्त चौकट मोडली : विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी; प्रधान शिक्षण सचिव उद्या शाळा भेटीवर

रवींद्र हिडदुगी -- नेसरी  शिकविणाऱ्या शिक्षकाला जसं स्वातंत्र्य हवं असतं, तसं ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही हवं आहे’, हे प्रमुख तत्त्व ज्ञानरचनावादामध्ये मान्य करण्यात आले आहे. केवळ घोकंपट्टी किंवा ‘मी सांगतो ते तुम्ही ऐकायचे’ ही शिक्षककेंद्रित प्रचलित शिक्षण व्यवस्था ‘वर्तनवादी’ म्हणून ओळखली जाते. हीच बंदिस्त चौकट मोडून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अंगांचा विचार करणारी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती पुढे येत आहे.हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका शशिकला पाटील यांनी ज्ञानरचनावादाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व कृतियुक्त अध्ययन अध्यापनासाठी मनोरंजनात्मक शैक्षणिक साहित्य विकसित केले आहे. यासाठी त्यांनी काही प्रयोगशील शाळांना भेटी दिल्या आहेत. तसेच शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून, मते अजमावून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली रचनावादी शाळा बनविण्याचा मान पटकाविला आहे.शिक्षक, अधिकारी, शिक्षणप्रेमी आणि न्यायाधीश यांनी ही शाळा पाहून या शाळेचे कौतुक केले. ही शाळा रचनावाद शिक्षणाची मॉडेल शाळा म्हणून उदयास येत असून ही चळवळ जिल्हाभर नेटाने पुढे जात आहे. या प्रयोगाची राज्य शासनानेही दखल घेतली असून, रविवारी (दि. २२) राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार शाळेला भेट देणार आहेत.महाराष्ट्रात १ एप्रिल २०१० पासून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी सुरू आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचे व दर्जेदार शिक्षणाचे वचन मिळाले आहे. २००५ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शिक्षण ही पोस्टामार्फत किंवा शिक्षकामार्फत वितरित करायची भौतिक गोष्ट नसून, एक चैतन्यदायी प्रक्रिया मानली गेली. त्यातून स्वयंअध्ययन व कृतिशिलता या पायाभूत ज्ञानरचनावादी अध्ययन, अध्यापन पद्धतीचा अंगीकार झाला.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या धर्तीवर राज्य अभ्यासक्रम आराखडा (२०१०) तयार झाला आहे. त्यातही ज्ञानरचनावाद अधोरेखित केला आहे. २०१३ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमात रचनावादाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकेही रचनावादी पद्धतीने तयार करण्यात आली.असा आहे ज्ञानरचनावाद ज्ञानरचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. मुल कसे शिकते? या जुन्याच प्रश्नाचे अर्थपूर्ण असे नवे उत्तर देण्याचा प्रयत्न ज्ञानरचनावादाने केला आहे. नवे ज्ञान हे पूर्वज्ञानाला जोडून येत असते. हे रचनावादाचे प्रमुख सूत्र आहे. यामध्ये शिक्षकांंची भूमिका, मार्गदर्शन व उत्तम सुलभकाची आहे. प्रत्येक मूल स्वतंत्र असते व प्रत्येक मूल शिकू शकते यावर विश्वास असणारी ज्ञानरचनावादी चळवळ गतीने पुढे गेल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, हे हेळेवाडीसारख्या अगदी छोट्या खेड्यातील शाळेने दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी विद्यार्थ्याला आणणारा ज्ञानरचनावाद सर्व शाळांनी अनुसरल्यास महाराष्ट्र राज्य देशात ज्ञानरचनावादी मॉडेल म्हणून उदयास येईल. मात्र, यासाठी सर्व अधिकारी व शिक्षकांनी जबरदस्त इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास अंगी बाळगून कामाला लागणे विद्यार्थ्यांच्या पर्यायाने देशाच्या हिताचे ठरेल.