शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

निराधारांसाठी फराळाचा पहिला घास

By admin | Updated: October 23, 2014 00:01 IST

९७ वर्षांची परंपरा : साठमारी गल्लीतील विवेकानंद आश्रमचा उपक्रम

संतोष मिठारी - कोल्हापूर -नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देणे, फटाके वाजविणे, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना भेट असा एकंदरीतपणे दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा बहुतांश जणांचा दिनक्रम असतो. मात्र, मंगळवार पेठ परिसरातील साठमारी गल्लीतील श्री स्वामी विवेकानंद आश्रमातील कार्यकर्त्यांनी त्याला बगल दिली आहे. या दिवशी आपल्या परिसरातील दारोदारी फिरून करंज्या, चकली, चिवडा असा मिळेल तो फराळ जमा करून भिकारी, निराधारांना त्याचा घास भरविण्याचा उपक्रम ते गेली ९७ वर्षे राबवीत आहेत.मंगळवार पेठेतील मुक्तांबिका मंदिरात दादा गजबर यांनी १९१७ मध्ये श्री स्वामी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. त्यांनी दरिद्र्यनारायण सेवेंतर्गत कोल्हापुरातील भिकारी, अनाथ आणि निराधारांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात ते संबंधितांना कपडे आणि फराळ वाटप करीत होते. त्यांची ही परंपरा साठमारी गल्लीतील आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी नवीन कपडे परिधान करून तीन ते चारजणांचे गट करून कार्यकर्ते मंगळवार पेठेतील प्रत्येक घरात जातात. लाडू, चकली, चिवडा, करंज्या असे जे काही नागरिक देतील ते जमा करतात. त्यानंतर यादिवशीच आश्रमात भिकारी, अनाथ आणि निराधारांना या फराळाचे वाटप करतात. यासाठी कोल्हापुरातील विविध परिसरातील भिकारी, निराधार याठिकाणी स्वत:हून येतात.समाधान लाभते...भिकारी आणि निराधारांसाठी आम्ही राबवीत असलेल्या उपक्रमांना नागरिकदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही एकत्रित केलेल्या फराळाचे दोनशे ते अडीचशे जणांना वाटप करतो. फराळासाठी दारोदारी फिरताना कोणताही कमीपणा आम्हाला वाटत नाही. जोपर्यंत या निराधारांना फराळाचे वाटप करीत नाही. तोपर्यंत आश्रमातील एकही कार्यकर्ता फराळ करीत नाही. - संजय पायमल (सदस्य, श्री स्वामी विवेकानंद आश्रम)