शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांसाठी फराळाचा पहिला घास

By admin | Updated: October 23, 2014 00:01 IST

९७ वर्षांची परंपरा : साठमारी गल्लीतील विवेकानंद आश्रमचा उपक्रम

संतोष मिठारी - कोल्हापूर -नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देणे, फटाके वाजविणे, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना भेट असा एकंदरीतपणे दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा बहुतांश जणांचा दिनक्रम असतो. मात्र, मंगळवार पेठ परिसरातील साठमारी गल्लीतील श्री स्वामी विवेकानंद आश्रमातील कार्यकर्त्यांनी त्याला बगल दिली आहे. या दिवशी आपल्या परिसरातील दारोदारी फिरून करंज्या, चकली, चिवडा असा मिळेल तो फराळ जमा करून भिकारी, निराधारांना त्याचा घास भरविण्याचा उपक्रम ते गेली ९७ वर्षे राबवीत आहेत.मंगळवार पेठेतील मुक्तांबिका मंदिरात दादा गजबर यांनी १९१७ मध्ये श्री स्वामी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. त्यांनी दरिद्र्यनारायण सेवेंतर्गत कोल्हापुरातील भिकारी, अनाथ आणि निराधारांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात ते संबंधितांना कपडे आणि फराळ वाटप करीत होते. त्यांची ही परंपरा साठमारी गल्लीतील आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी नवीन कपडे परिधान करून तीन ते चारजणांचे गट करून कार्यकर्ते मंगळवार पेठेतील प्रत्येक घरात जातात. लाडू, चकली, चिवडा, करंज्या असे जे काही नागरिक देतील ते जमा करतात. त्यानंतर यादिवशीच आश्रमात भिकारी, अनाथ आणि निराधारांना या फराळाचे वाटप करतात. यासाठी कोल्हापुरातील विविध परिसरातील भिकारी, निराधार याठिकाणी स्वत:हून येतात.समाधान लाभते...भिकारी आणि निराधारांसाठी आम्ही राबवीत असलेल्या उपक्रमांना नागरिकदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही एकत्रित केलेल्या फराळाचे दोनशे ते अडीचशे जणांना वाटप करतो. फराळासाठी दारोदारी फिरताना कोणताही कमीपणा आम्हाला वाटत नाही. जोपर्यंत या निराधारांना फराळाचे वाटप करीत नाही. तोपर्यंत आश्रमातील एकही कार्यकर्ता फराळ करीत नाही. - संजय पायमल (सदस्य, श्री स्वामी विवेकानंद आश्रम)