शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

निराधारांसाठी फराळाचा पहिला घास

By admin | Updated: October 23, 2014 00:01 IST

९७ वर्षांची परंपरा : साठमारी गल्लीतील विवेकानंद आश्रमचा उपक्रम

संतोष मिठारी - कोल्हापूर -नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देणे, फटाके वाजविणे, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना भेट असा एकंदरीतपणे दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा बहुतांश जणांचा दिनक्रम असतो. मात्र, मंगळवार पेठ परिसरातील साठमारी गल्लीतील श्री स्वामी विवेकानंद आश्रमातील कार्यकर्त्यांनी त्याला बगल दिली आहे. या दिवशी आपल्या परिसरातील दारोदारी फिरून करंज्या, चकली, चिवडा असा मिळेल तो फराळ जमा करून भिकारी, निराधारांना त्याचा घास भरविण्याचा उपक्रम ते गेली ९७ वर्षे राबवीत आहेत.मंगळवार पेठेतील मुक्तांबिका मंदिरात दादा गजबर यांनी १९१७ मध्ये श्री स्वामी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. त्यांनी दरिद्र्यनारायण सेवेंतर्गत कोल्हापुरातील भिकारी, अनाथ आणि निराधारांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात ते संबंधितांना कपडे आणि फराळ वाटप करीत होते. त्यांची ही परंपरा साठमारी गल्लीतील आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी नवीन कपडे परिधान करून तीन ते चारजणांचे गट करून कार्यकर्ते मंगळवार पेठेतील प्रत्येक घरात जातात. लाडू, चकली, चिवडा, करंज्या असे जे काही नागरिक देतील ते जमा करतात. त्यानंतर यादिवशीच आश्रमात भिकारी, अनाथ आणि निराधारांना या फराळाचे वाटप करतात. यासाठी कोल्हापुरातील विविध परिसरातील भिकारी, निराधार याठिकाणी स्वत:हून येतात.समाधान लाभते...भिकारी आणि निराधारांसाठी आम्ही राबवीत असलेल्या उपक्रमांना नागरिकदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही एकत्रित केलेल्या फराळाचे दोनशे ते अडीचशे जणांना वाटप करतो. फराळासाठी दारोदारी फिरताना कोणताही कमीपणा आम्हाला वाटत नाही. जोपर्यंत या निराधारांना फराळाचे वाटप करीत नाही. तोपर्यंत आश्रमातील एकही कार्यकर्ता फराळ करीत नाही. - संजय पायमल (सदस्य, श्री स्वामी विवेकानंद आश्रम)