शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

कुरुंदवाडमध्ये कचरा डेपोतील आगीमुळे ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:18 IST

कुरुंदवाड : शहराच्या कचरा डेपोतील आगीमुळे लगतचा सुमारे पाच एकर क्षेत्रातील ऊस जळाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. आगीत ...

कुरुंदवाड : शहराच्या कचरा डेपोतील आगीमुळे लगतचा सुमारे पाच एकर क्षेत्रातील ऊस जळाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. आगीत चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नगरपालिका प्रशासन आणि कचरा ठेकेदाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, या नुकसानीविरोधात शेतकऱ्यांनी कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, तर बुधवारी दुपारी नुकसानग्रस्त व कचरा डेपो परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांना जळीत उसाची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन दिले.

शहरातील संकलित झालेला कचरा मजरेवाडी (ता. शिरोळ) हद्दीतील पालिकेच्या कचरा डेपोमध्ये टाकला जातो. कचरा ठेकेदाराकडून सुका व ओला कचरा विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जाते. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिका प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करते.

कचरा जाळण्यासाठी मंगळवारी कचरा डेपोला आग लावण्यात आली होती. कचरा डेपोलगत शहरातील शेतकऱ्यांबरोबर मजरेवाडीतील शेतकऱ्यांची शेती आहे. शिवाय कचरा डेपोला कंपाउंड नसल्याने कचऱ्याला लागलेली आग वाऱ्याने ऊस पिकात उडून गेल्याने प्रकाश राऊ चव्हाण, जयश्री सुरेश माळी, पद्मावती अजित माळी व रावसाहेब महादेव माळी यांच्या मालकीच्या (गट नं. १२२) शेतातील सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.

-------------------------

चौकट - शेतकऱ्यांतून तीव्र संताप

पालिकेने शहर स्वच्छतेचा ठेका तानाजी पवार यांच्या भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट कंपनी पुणे या कंपनीला देण्यात आला आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराच्या कारभारावर शहरवासीयांसह काही नगरसेवकही नाराज आहेत. कचरा पेटल्याने ऊस पेटल्याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता कचराच पेटला नाही, असे सांगत खोटे बोलून जबाबदारी झटकल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

फोटो - २८०४२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - कुरुंदवाड येथील कचरा डेपोतील आगीमुळे लगतचा आडसाली ऊस जळून खाक झाला.