शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

हाळोलीतील २५ एकरांतील काजू बागेला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:24 IST

आजरा : हाळोली व वेळवट्टी (ता. आजरा) दरम्यान असलेल्या २५ एकर क्षेत्रातील काजू बागेला लागलेल्या आगीत अंदाजे १२०० ते ...

आजरा : हाळोली व वेळवट्टी (ता. आजरा) दरम्यान असलेल्या २५ एकर क्षेत्रातील काजू बागेला लागलेल्या आगीत अंदाजे १२०० ते १५०० झाडे जळाली. सातवानचा माळ व हुंबराचे पाणी नावाच्या शेतात दुपारी १ वाजता आग लागली. आगीत शेतकऱ्यांचे काजू बाग, मेसकाठीचे अंदाजे १० लाखांवर नुकसान झाले.

आजरा-आंबोली रस्त्याशेजारील राणे यांच्या पोल्ट्री फार्मपासून आगीला सुरुवात झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दुपारच्या वेळेत लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले होते. आगीच्या ज्वाळा १५ ते २० फूट उंचीपर्यंत होत्या. त्यातच वारा असल्याने आग सर्वत्र पसरली. परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत आग सुरूच होती. आग सायंकाळी चाळोबाच्या जंगलात घुसली होती. वनविभागाचे कर्मचारी ब्लोअरिंग मशीनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणत होते.

..........

गवतामुळे आग वाढली

जंगलाशेजारील या खासगी मालकीच्या जमिनीत वारंवार हत्ती व गव्यांचा वावर असतो. त्यांच्या भीतीने चालू वर्षी शेतकऱ्यांनी गवत कापलेले नाही. या आगीत वाढलेले गवत जळाले. त्याच्या ज्वाळा १५ ते २० फूट उंचीच्या होत्या. त्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात अडचणी येत होत्या.

हत्ती गेला, आग घुसली..

गेल्या आठ वर्षांपासून टस्कर हत्तींचा कळप या परिसरात तळ ठोकून आहे. गेले आठ ते दहा दिवसांपासून टस्कर हत्ती घाटकरवाडी परिसरात गेले आहेत. पण, हत्ती पिके खाण्याबरोबर तुडवण करीत होता. आज आगीने सगळेच भुईसपाट केले आहे.

---------------------------

* फोटो ओळी : हाळोली (ता. आजरा) येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली काजू बाग.

क्रमांक : १५०३२०२१-गड-१४