शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील पहिल्या साक्षर विद्यार्थ्याला आर्थिक पाठबळ

By admin | Updated: April 8, 2015 23:59 IST

विद्यापीठाचा उपक्रम : आरती पाटणकर पारितोषिकाने प्रारंभ

संतोष मिठारी-कोल्हापूर -कुटुंबाच्या आर्थिक, तसेच अन्य परिस्थितीमुळे काही पिढ्यांना शिक्षणच मिळालेले नसते. अशा कुटुंबांतून जिद्दीने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या निधीतून पारितोषिकांच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे.‘ग्रामीण विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुर्गम खेड्या-पाड्यांतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. कुटुंबांत काही पिढ्यांना शिक्षणाची ओळख नसतानाही ते साक्षर होतात; शिवाय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पूर्ततेसाठी विद्यापीठात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रवेशित होतात. प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यांना पुस्तके, प्रवेश शुल्कासाठी पैशांची जुळवाजुळव करताना अनेकदा कसरत करावी लागते. हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना पारितोषिकांच्या माध्यमातून यावर्षीपासून विद्यापीठ आर्थिक मदत करणार आहे. या उपक्रमाची सुरुवात संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अंतिम वर्ष (बी. ई. फायनल इन कॉम्प्युटर सायन्स) सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीला आरती पाटणकर परितोषिक देऊन होणार आहे. अर्जात यंदा बदलपहिल्या पिढीतील साक्षर विद्यार्थी, विद्यार्थिनींची माहिती संकलित करण्यासाठी यावर्षीपासून विद्यापीठाच्या सर्वच प्रवेश अर्जात बदल केला जाणार आहे. अर्जात पहिल्या पिढीतील अथवा दुसऱ्या पिढीतील साक्षर आहात का? असे दोन रकाने असणार आहेत. त्याद्वारे माहिती संकलित करून या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.वर्षाकाठी पावणेतीन लाखांचे वितरणदेशाच्या कानाकोपऱ्यांतील २०२ व्यक्ती, संस्था असे देणगीदार दरवर्षी शिवाजी विद्यापीठातील ३५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पारितोषिकांच्या माध्यमातून बळ देत आहेत. या पारितोषिकांच्या माध्यमातून वर्षाकाठी पावणेतीन लाखांच्या रकमेचे वितरण केले जाते. गेल्या ४९ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.काही व्यक्ती, संस्था पारितोषिकांसाठी विद्यापीठाला देणगी देतात. अशा देणगीदारांना या नव्या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली जाणार आहे. त्यानुसार त्याची सुरुवात आरती पाटणकर पारितोषिकाने झाली आहे. - डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ