शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शिवाजी बॅँकेचा परवाना रद्द

By admin | Updated: June 20, 2014 01:08 IST

आरबीआयची कारवाई : अवसायक नेमण्याची सूचना

गडहिंग्लज : रिझर्व्ह बॅँकेकडून वेळोवेळी मिळालेली बँकेच्या पुनरुज्जीवनाची संधी येथील श्री शिवाजी सहकारी बॅँकेने गमावली. त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी ‘शिवाजी’चा बॅँकिंग परवाना अखेर रिझर्व्ह बॅँकेने रद्द केला. बॅँकेचा गाशा गुंडाळा व त्यावर अवसायक नेमा, अशी सूचना रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाचे सहायक सरव्यवस्थापक अजित प्रसाद यांनी सहकारी संस्थांच्या राज्य निबंधकांना आज दिली. अधिक माहिती अशी, शनिवारी (दि. १४) रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाच्या दोन अधिकाऱ्यांनी बॅँकेच्या येथील मुख्यालयास भेट देऊन यासंदर्भातील कागदपत्रे व माहिती घेतली होती. त्याच दिवशी बॅँक वाचविण्यासंदर्भात बैठक झाली. मात्र आरबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे बॅँकेची ती बैठक बारगळली. १४ जून २०१४ पासून बॅँकेचा परवाना रद्द केल्याची सूचना रिझर्व्ह बॅँकेने आज प्रसिद्ध केली. त्यासंदर्भातील पहिली बातमी ‘लोकमत’नेच १५ जूनच्या अंकात दिली होती.६ जानेवारी १९९५ रोजी आरबीआयने शिवाजी बॅँकेला बॅँकिंगचा परवाना दिला होता. प्रारंभी बहुजनांची बॅँक म्हणून बॅँकेची चर्चा झाली. हरळी, कडगाव व कोल्हापूर या ठिकाणी शाखाही सुरू झाल्या. मात्र, पहिल्या दशकानंतर बॅँकेची घडी विस्कटली. नियमबाह्य व बेकायदेशी कारभार सुरू झाला. त्यासंदर्भातही ९ जानेवारी २००६ रोजी आरबीआयने बॅँकेची कानउघडणी केली होती. मात्र, बॅँकेच्या कारभारात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर आरबीआयने बॅँकेच्या कारभारावर नियंत्रण आणले. तरीदेखील नियम धाब्यावर बसवून कारभार हाकण्यात आला. त्यामुळे बॅँकेची आर्थिक स्थिती ढासळत गेली. एनपीए, संचित तोटा व निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच गेले. त्यामुळे २७ डिसेंबर २०१० रोजी संचालक मंडळ बरखास्त करून बॅँकेवर प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली. प्रशासक मंडळाच्या नेमणुकीनंतर अन्य चांगल्या बॅँकेत विलीनीकरणासाठी प्रयत्नही झाले. त्यासंदर्भात कॉसमॉस, जनसेवा व कागल या बॅँकांच्या नावांची चर्चादेखील सुरू होती. मात्र, दरम्यानच एका सर्वसाधारण सभेत विलीनीकरणाच्या विरोधात झालेला ठराव व बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे विलीनीकरणाला खो बसला. कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही आरबीआयने बॅँकिंग परवान्याची मुदत वाढवून देऊन बॅँकेच्या पुनरुज्जीवनाची संधी दिली. मात्र, त्याचा लाभ उठवता आला नाही.३१ मार्च २०१३ अखेर ६ कोटी ४५ लाख ८० हजार रुपयांचा निव्वळ तोटा, १० कोटी १३ लाख ७५ हजारांचा संचित तोटा आणि निव्वळ मालमत्ता मूल्य (नेटवर्थ) उणे ८ कोटी १९ लाख १६ हजार इतके झाले. कारणे दाखवा नोटिसीला बॅँकेने पाठविलेल्या खुलाशावर आरबीआयचे समाधान न झाल्यामुळेच आणि बॅँकेच्या कारभारात अपेक्षित सुधारणा दृष्टिपथात न आल्यामुळे आरबीआयने बॅँकेचा बॅँकिंग परवाना अखेर रद्द केला. त्यामुळे ठेवीदार व कर्मचारी यांच्यासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)