शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शिवाजी बॅँकेचा परवाना रद्द

By admin | Updated: June 20, 2014 01:08 IST

आरबीआयची कारवाई : अवसायक नेमण्याची सूचना

गडहिंग्लज : रिझर्व्ह बॅँकेकडून वेळोवेळी मिळालेली बँकेच्या पुनरुज्जीवनाची संधी येथील श्री शिवाजी सहकारी बॅँकेने गमावली. त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी ‘शिवाजी’चा बॅँकिंग परवाना अखेर रिझर्व्ह बॅँकेने रद्द केला. बॅँकेचा गाशा गुंडाळा व त्यावर अवसायक नेमा, अशी सूचना रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाचे सहायक सरव्यवस्थापक अजित प्रसाद यांनी सहकारी संस्थांच्या राज्य निबंधकांना आज दिली. अधिक माहिती अशी, शनिवारी (दि. १४) रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाच्या दोन अधिकाऱ्यांनी बॅँकेच्या येथील मुख्यालयास भेट देऊन यासंदर्भातील कागदपत्रे व माहिती घेतली होती. त्याच दिवशी बॅँक वाचविण्यासंदर्भात बैठक झाली. मात्र आरबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे बॅँकेची ती बैठक बारगळली. १४ जून २०१४ पासून बॅँकेचा परवाना रद्द केल्याची सूचना रिझर्व्ह बॅँकेने आज प्रसिद्ध केली. त्यासंदर्भातील पहिली बातमी ‘लोकमत’नेच १५ जूनच्या अंकात दिली होती.६ जानेवारी १९९५ रोजी आरबीआयने शिवाजी बॅँकेला बॅँकिंगचा परवाना दिला होता. प्रारंभी बहुजनांची बॅँक म्हणून बॅँकेची चर्चा झाली. हरळी, कडगाव व कोल्हापूर या ठिकाणी शाखाही सुरू झाल्या. मात्र, पहिल्या दशकानंतर बॅँकेची घडी विस्कटली. नियमबाह्य व बेकायदेशी कारभार सुरू झाला. त्यासंदर्भातही ९ जानेवारी २००६ रोजी आरबीआयने बॅँकेची कानउघडणी केली होती. मात्र, बॅँकेच्या कारभारात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर आरबीआयने बॅँकेच्या कारभारावर नियंत्रण आणले. तरीदेखील नियम धाब्यावर बसवून कारभार हाकण्यात आला. त्यामुळे बॅँकेची आर्थिक स्थिती ढासळत गेली. एनपीए, संचित तोटा व निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच गेले. त्यामुळे २७ डिसेंबर २०१० रोजी संचालक मंडळ बरखास्त करून बॅँकेवर प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली. प्रशासक मंडळाच्या नेमणुकीनंतर अन्य चांगल्या बॅँकेत विलीनीकरणासाठी प्रयत्नही झाले. त्यासंदर्भात कॉसमॉस, जनसेवा व कागल या बॅँकांच्या नावांची चर्चादेखील सुरू होती. मात्र, दरम्यानच एका सर्वसाधारण सभेत विलीनीकरणाच्या विरोधात झालेला ठराव व बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे विलीनीकरणाला खो बसला. कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही आरबीआयने बॅँकिंग परवान्याची मुदत वाढवून देऊन बॅँकेच्या पुनरुज्जीवनाची संधी दिली. मात्र, त्याचा लाभ उठवता आला नाही.३१ मार्च २०१३ अखेर ६ कोटी ४५ लाख ८० हजार रुपयांचा निव्वळ तोटा, १० कोटी १३ लाख ७५ हजारांचा संचित तोटा आणि निव्वळ मालमत्ता मूल्य (नेटवर्थ) उणे ८ कोटी १९ लाख १६ हजार इतके झाले. कारणे दाखवा नोटिसीला बॅँकेने पाठविलेल्या खुलाशावर आरबीआयचे समाधान न झाल्यामुळेच आणि बॅँकेच्या कारभारात अपेक्षित सुधारणा दृष्टिपथात न आल्यामुळे आरबीआयने बॅँकेचा बॅँकिंग परवाना अखेर रद्द केला. त्यामुळे ठेवीदार व कर्मचारी यांच्यासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)