शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अखेर ‘दौलत’चा तिढा सुटला

By admin | Updated: May 1, 2016 01:03 IST

तत्त्वत: मान्यता : ‘न्यूट्रीयन्टस’ला ४५ वर्षांसाठी भाड्याने देणार

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी साखर कारखाना न्यूट्रीयन्टस फु्रटस प्रा. लि. गोकाक या कंपनीस ४५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात तत्त्वत: मान्यता देण्यात आली. पंधरा दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या असून, गेली अनेक वर्षे बँकेच्या गळ्याभोवती अडकलेला ‘दौलत’चा तिढा अखेर सुटल्याने बँक संचालकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘दौलत’ भाडेतत्त्वावर घेण्यासाठी ‘न्यूट्रीयन्टस’ने ४५ व ६० वर्षांचे दोन प्रस्ताव दिले होते. त्यावर चर्चा होऊन जिल्हा बँक संचालकांनी ४५ वर्षांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामध्ये जिल्हा बँकेची सगळी थकबाकी २०२३ पर्यंत कंपनी देणार आहे. कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी बॅँकेची काही रक्कम राखून ठेवण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला. सिक्युअर्ड क्रेडिटर्स यांचे १०२ कोटी ३६ लाख ८५ हजार अधिक व्याज हे २०२२ अखेर मर्यादित राहणार आहे. कारखाना बंद असल्याने बँकेबरोबर चंदगड परिसरातील शेतकरी, कामगार अडचणीत सापडला होता. मध्यंतरी काही कंपन्यांनी चालविण्याची तयारी दाखवली, पण बऱ्याच घडामोडी झाल्या आणि त्यांनी नकार दिल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कंपनी व बँकेचे चार्टर्ड अकौंटंट तसेच बँकेचे कायदा सल्लागार यांच्या अभिप्रायानुसार कंपनीस मान्यतापत्र देणार असल्याचेही त्यांनी सागिंतले. उपाध्यक्ष अप्पी पाटील, के. पी. पाटील, निवेदिता माने यांच्यासह संचालक उपस्थित होते. काय आहे प्रस्ताव -४बॅँकेचे ६७.५० कोटींपैकी ३३.७० कोटी मार्च २०१७ पर्यंत जमा करणे, पैकी १६.८० कोटी ताबा घेताना द्यावे लागणार. उर्वरित ५० टक्के रकमेचे व्याज व मुद्दलाचे सहा वार्षिक हप्ते करून त्यावर १२ टक्के व्याज अदा करण्यात येणार आहे. ४एसडीएफचे देणे ७२.५० लाख २०१७ पर्यंत, २०१८ ते २०२२ पर्यंत प्रतिवर्षी १ कोटी ७२ लाख १३ हजार रुपये १० टक्के व्याजासह अदा करायचे आहेत. ४बॅँकेने कारखान्याचे ना हरकत पत्र देणे. ४आवश्यक शासकीय मान्यता करारापूर्वी बँकेने देणेचे आहे. ४शासकीय देय रकमामध्ये काही सवलत मिळाली तर भाड्यातून ती वजा करण्यात येईल. ४कामगार देणेबाबत युनियन किंवा वैयक्तिक कामगारांशी चर्चा करून तडजोड केली जाईल. ४कारखाना ताळेबंद कंपनी लेखापरीक्षकाकडून निश्चित करून संबंधित सिक्युअर्ड देणी दिली जातील. ४करारातील दायित्वाखेरीज कंपनी कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही.सप्टेंबरपर्यंत चाचणी हंगामकारखान्याचा गाळप परवाना कायम राहण्यासाठी सप्टेंबरपर्यंत चाचणी गळीत हंगाम घेणे बंधनकारक आहे. ‘न्यूट्रीयन्टस’ कंपनीने याची तयारी केल्याने परवान्याची काही अडचण येणार नसल्याचे बॅँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले.