शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

अंतिम लढती आज ठरणार

By admin | Updated: October 1, 2014 01:17 IST

विधानसभा निवडणूक : जिल्ह्यातील अकरा उमेदवारांची माघार

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतून आज अकरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये ‘डमी’ म्हणून अर्ज भरलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज मागे घेण्याचा उद्या, बुधवारी शेवटचा दिवस असून त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत बहुरंगी लढती होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, भाकप, शेकाप, जनसुराज्य, बसप अशा विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.चंदगड विधानसभा मतदारसंघातून रामकृष्ण गोपाळ पाटील आणि राजेंद्र गणपती परीट या दोन उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. कागल विधानसभा मतदारसंघातून आज युवराज दत्ताजीराव पाटील, बाळासो मल्हारी पाटील आणि अविनाश आण्णासाहेब मगदूम या तीन अपक्ष उमेदवारांनी, तर काल अंबरिशसिंह संजय घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून प्रतिमा सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.करवीर व राधानगरी विधानसभा मतदारसंघांतून आज एकाही उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही. मात्र, काल सोमवारी करवीरमधून श्रीमती शैलाबाई शशिकांत नरके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून वैशाली राजेश क्षीरसागर यांनी, तर शाहूवाडी मतदारसंघातून आज भाग्यश्री कर्णसिंह गायकवाड यांनी, तर काल, सोमवारी विनय निवृत्ती टिळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हातकणंगले मतदारसंघातून युवराज शिवाजी कांबळे यांनी, इचलकरंजी मतदारसंघातून शाहूगोंडा सतगोंडा पाटील यांनी, तर शिरोळ मतदारसंघातून गणपतराव आप्पासाहेब पाटील या एका उमेदवाराने त्यांचा अर्ज मागे घेतला. (प्रतिनिधी)