शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

चित्रीकरण गोवा, हैदराबाद, गुजरातला हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने १५ तारखेपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता पुन्हा वेगाने संसर्ग होत ...

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने १५ तारखेपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता पुन्हा वेगाने संसर्ग होत असल्याने लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. हे आणखी किती दिवस चालेल याची कल्पना नसल्याने निर्मिती संस्थांनी चित्रीकरण अन्य राज्यांमध्ये हलविले आहे. कोल्हापुरातील चित्रनगरीत दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. त्यापैकी हिंदी मालिकेचे चित्रीकरण हैदराबादमध्ये हलविले आहे. मराठी मालिकेचाही स्थलांतराचा विचार सुरू आहे. राजाराणीची गं जोडी या मालिकेचे गोव्यात, तर या फुलाला सुगंध मातीचा मालिकेचे चित्रीकरण गुजरातमध्ये होत आहे. या संचारबंदीमुळे विविध वाहिन्यांवरील दोन मालिका बंद करण्यात आल्या आहेत. हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्राला कायमचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे निर्बंध घालून चित्रीकरण सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मराठी चित्रपट-मालिका व्यवसायाने केली आहे.

---

गोव्याचे रेड कार्पेट

महाराष्ट्रात चित्रीकरण बंद असल्याने अन्य राज्यांकडून मात्र निर्मिती संस्थांसाठी रेड कार्पेट घातले आहे. गोवा सरकारने देशभरात लॉकडाऊन झाले तरी आम्ही चित्रीकरणाची परवानगी घेऊन देऊ इथपर्यंतचा प्रस्ताव दिला आहे. गुजरातमध्येही कोरोना आहे, हैदराबादमध्ये नाईट कर्फ्यू असतानाही निर्बंध पाळून चित्रीकरण केले जात आहे.

--

अन्य उद्योगांप्रमाणे परवानगी द्या : चित्रपट महामंडळ

कामगारांच्या राहण्याची सोय असलेले उद्योग सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी सेटवरील मोजके कलाकार व स्पॉटबॉय, तंत्रज्ञ असतात. त्यामुळे अन्य उद्योगांप्रमाणे कमी माणसांच्या उपस्थितीत, कोविड चाचणी बंधनकारक, सेटवर डॉक्टरांची उपलब्धता, राहण्या-जेवणाची सोय, रोज सगळ्यांची आरोग्य तपासणी व कोणी पॉझिटिव्ह आल्यास घ्यावयाची काळजी, अशा अटी, शर्ती घालून चित्रीकरणाला परवानगी द्या, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

--

सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री मोहीम

चित्रीकरण बंदीविरोधात मराठी चित्रपट व मालिका व्यावसायिकांनी सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री ही मोहीम सुरू केली आहे. अन्य उद्योगांना परवानगी, निवडणुका, आयपीएल सगळं सुरू असताना लाखो लोकांचे पोट भरणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीवरच अन्याय का, हिंदी मालिकांकडे पैसा असल्याने त्यांना स्थलांतर शक्य आहे; पण मराठी मालिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केलेला मेसेज व्हायरल करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.