शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

चित्रीकरण गोवा, हैदराबाद, गुजरातला हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने १५ तारखेपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता पुन्हा वेगाने संसर्ग होत ...

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने १५ तारखेपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता पुन्हा वेगाने संसर्ग होत असल्याने लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. हे आणखी किती दिवस चालेल याची कल्पना नसल्याने निर्मिती संस्थांनी चित्रीकरण अन्य राज्यांमध्ये हलविले आहे. कोल्हापुरातील चित्रनगरीत दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. त्यापैकी हिंदी मालिकेचे चित्रीकरण हैदराबादमध्ये हलविले आहे. मराठी मालिकेचाही स्थलांतराचा विचार सुरू आहे. राजाराणीची गं जोडी या मालिकेचे गोव्यात, तर या फुलाला सुगंध मातीचा मालिकेचे चित्रीकरण गुजरातमध्ये होत आहे. या संचारबंदीमुळे विविध वाहिन्यांवरील दोन मालिका बंद करण्यात आल्या आहेत. हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्राला कायमचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे निर्बंध घालून चित्रीकरण सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मराठी चित्रपट-मालिका व्यवसायाने केली आहे.

---

गोव्याचे रेड कार्पेट

महाराष्ट्रात चित्रीकरण बंद असल्याने अन्य राज्यांकडून मात्र निर्मिती संस्थांसाठी रेड कार्पेट घातले आहे. गोवा सरकारने देशभरात लॉकडाऊन झाले तरी आम्ही चित्रीकरणाची परवानगी घेऊन देऊ इथपर्यंतचा प्रस्ताव दिला आहे. गुजरातमध्येही कोरोना आहे, हैदराबादमध्ये नाईट कर्फ्यू असतानाही निर्बंध पाळून चित्रीकरण केले जात आहे.

--

अन्य उद्योगांप्रमाणे परवानगी द्या : चित्रपट महामंडळ

कामगारांच्या राहण्याची सोय असलेले उद्योग सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी सेटवरील मोजके कलाकार व स्पॉटबॉय, तंत्रज्ञ असतात. त्यामुळे अन्य उद्योगांप्रमाणे कमी माणसांच्या उपस्थितीत, कोविड चाचणी बंधनकारक, सेटवर डॉक्टरांची उपलब्धता, राहण्या-जेवणाची सोय, रोज सगळ्यांची आरोग्य तपासणी व कोणी पॉझिटिव्ह आल्यास घ्यावयाची काळजी, अशा अटी, शर्ती घालून चित्रीकरणाला परवानगी द्या, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

--

सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री मोहीम

चित्रीकरण बंदीविरोधात मराठी चित्रपट व मालिका व्यावसायिकांनी सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री ही मोहीम सुरू केली आहे. अन्य उद्योगांना परवानगी, निवडणुका, आयपीएल सगळं सुरू असताना लाखो लोकांचे पोट भरणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीवरच अन्याय का, हिंदी मालिकांकडे पैसा असल्याने त्यांना स्थलांतर शक्य आहे; पण मराठी मालिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केलेला मेसेज व्हायरल करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.