शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

चित्रीकरण गोवा, हैदराबाद, गुजरातला हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने १५ तारखेपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता पुन्हा वेगाने संसर्ग होत ...

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने १५ तारखेपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता पुन्हा वेगाने संसर्ग होत असल्याने लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. हे आणखी किती दिवस चालेल याची कल्पना नसल्याने निर्मिती संस्थांनी चित्रीकरण अन्य राज्यांमध्ये हलविले आहे. कोल्हापुरातील चित्रनगरीत दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. त्यापैकी हिंदी मालिकेचे चित्रीकरण हैदराबादमध्ये हलविले आहे. मराठी मालिकेचाही स्थलांतराचा विचार सुरू आहे. राजाराणीची गं जोडी या मालिकेचे गोव्यात, तर या फुलाला सुगंध मातीचा मालिकेचे चित्रीकरण गुजरातमध्ये होत आहे. या संचारबंदीमुळे विविध वाहिन्यांवरील दोन मालिका बंद करण्यात आल्या आहेत. हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्राला कायमचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे निर्बंध घालून चित्रीकरण सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मराठी चित्रपट-मालिका व्यवसायाने केली आहे.

---

गोव्याचे रेड कार्पेट

महाराष्ट्रात चित्रीकरण बंद असल्याने अन्य राज्यांकडून मात्र निर्मिती संस्थांसाठी रेड कार्पेट घातले आहे. गोवा सरकारने देशभरात लॉकडाऊन झाले तरी आम्ही चित्रीकरणाची परवानगी घेऊन देऊ इथपर्यंतचा प्रस्ताव दिला आहे. गुजरातमध्येही कोरोना आहे, हैदराबादमध्ये नाईट कर्फ्यू असतानाही निर्बंध पाळून चित्रीकरण केले जात आहे.

--

अन्य उद्योगांप्रमाणे परवानगी द्या : चित्रपट महामंडळ

कामगारांच्या राहण्याची सोय असलेले उद्योग सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी सेटवरील मोजके कलाकार व स्पॉटबॉय, तंत्रज्ञ असतात. त्यामुळे अन्य उद्योगांप्रमाणे कमी माणसांच्या उपस्थितीत, कोविड चाचणी बंधनकारक, सेटवर डॉक्टरांची उपलब्धता, राहण्या-जेवणाची सोय, रोज सगळ्यांची आरोग्य तपासणी व कोणी पॉझिटिव्ह आल्यास घ्यावयाची काळजी, अशा अटी, शर्ती घालून चित्रीकरणाला परवानगी द्या, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

--

सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री मोहीम

चित्रीकरण बंदीविरोधात मराठी चित्रपट व मालिका व्यावसायिकांनी सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री ही मोहीम सुरू केली आहे. अन्य उद्योगांना परवानगी, निवडणुका, आयपीएल सगळं सुरू असताना लाखो लोकांचे पोट भरणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीवरच अन्याय का, हिंदी मालिकांकडे पैसा असल्याने त्यांना स्थलांतर शक्य आहे; पण मराठी मालिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केलेला मेसेज व्हायरल करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.