शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

चित्रपट महामंडळ संकटात...!

By admin | Updated: March 15, 2016 01:00 IST

आढावा : इतिहासाला काळेकुट्ट ग्रहण, माशी कुठे शिंकली...

मराठी चित्रपट महामंडळ या नावाने ९ नोव्हेंबर १९६६ या दिवशी स्थापन झालेल्या या चित्रपट क्षेत्रातील शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले चित्रपती व्ही. शांताराम, चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, सुधीर फडके, विश्वास सरपोतदार, राम कदम, कमलाकर तोरणे, प्रभातकुमार यांच्यासह बाबूराव पेंढारकर, द. स. अंबपकर, अनंत माने, ग. रं. भिडे अशा अनेक थोर चित्रकर्मींमुळे महामंडळाचा वटवृक्ष महाराष्ट्राबाहेरही बहरू लागला. कोल्हापूरबरोबरच मुंबई, पुणे, नाशिक येथे शाखा विस्तार होताच झाला. त्याचे ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ असे नामकरण झाले. मूकपटापासून कृष्णधवल बोलपटापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीने बाळसे धरले. तंत्रज्ञानात क्रांती आली आणि चित्रपट रंगीत झाला, तसा मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख उंचावत चालला. महामंडळाचे नाव सरकार दरबारीही सन्मानाने घेतले जाऊ लागले. चित्रपट निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान देण्याची योजना मंजूर केली. कलाकार-तंत्रज्ञ-कामगार-निर्माते यांच्या उत्तरार्धात त्यांना काही आर्थिक मदत व्हावी, ही संकल्पना पुढे आली आणि ‘वृद्ध कलाकार मानधन योजना’ पुढे आली आणि पुढे महाराष्ट्र शासनानेही ती टप्प्याटप्प्याने राबविण्यास सुरुवातही केली. मानधनाच्या रकमेत आणि लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. निर्मात्यांचे अनुदान वाढल्याने महामंडळालाही वर्गणीरूपाने निधी मिळू लागला. जमा निधीतून आर्थिक मदत सुरू केल्याने आपुलकी वाढीस लागली. या मातृसंस्थेची अशी देदीप्यमान, उज्ज्वल वाटचाल आणि भविष्य असणारी, अशी कारकीर्द सुरू असताना, अशी कशी-कुठे माशी शिंकली? किरकोळ मतभेद-हेवेदावे-वादावादी असे अपवाद वगळता महामंडळाच्या आजवरच्या इतिहासात असे काळेकुट्ट ग्रहण का लागले, याचा आढावा गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे. पावित्र्य, सद्हेतूने चाललेली महामंडळाची वाटचाल गेल्या तीन-चार वर्षांपासून विचित्र (हॅलो २ वर)अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या द्विवर्षीय सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोपाने महामंडळाची प्रचंड बदनामी झाली. त्यातच कोल्हापूरकर विरुद्ध मुंबईकर अशी एक नवीनच वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच महामंडळाची निवडणूकही लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा वाद नेमका काय आहे, याबद्दल चित्रपट महामंडळाचे ‘अ’ वर्ग सभासद असलेले आणि महामंडळाच्या वाटचालीत योगदान दिलेले भालजी पेंढारकर यांचे स्वीय सहाय्यक अर्जुन नलावडे यांनी आपले मनोगत ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे.