शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

३६ कोटी भरा; मगच ४९ कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: June 26, 2017 00:59 IST

३६ कोटी भरा; मगच ४९ कोटींची कर्जमाफी

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दीड लाखापेक्षा जास्त असणारी थकबाकी शेतकऱ्यांनी खात्यावर भरल्यानंतरच त्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ होईल, अशी अट राज्य सरकारने घातल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. पैसे असते तर थकबाकी राहिली असती का? ४९ कोटींची कर्जमाफी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अगोदर ३६ कोटी भरावे लागणार असल्याने शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील किमान तीन हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने थकबाकीदारांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी केल्याची घोषणा शनिवारी (दि. २४) केली. दीड लाखापर्यंतचे सर्व कर्ज माफ, तर त्यापेक्षा जास्त थकीत कर्जदारांनाही सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी करण्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. गेली पाच-सहा वर्षे विविध कारणांनी डोक्यावर असलेला कर्जाचा बोजा सरकारच्या कृपेने हलका होईल, अशी श्ेतकऱ्यांची अपेक्षा होती; पण सरकारने दीड लाखापेक्षा जास्त थकीत कर्जदारांना कर्जमाफी देताना अट घातली आहे. या शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा अधिक थकीत रक्कम बॅँकेत जमा केली तरच दीड लाखाची माफी मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. जिल्हा बॅँकेशी संलग्न, दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणारे ३३२५ शेतकरी आहेत. त्यांच्याकडे ८६ कोटी ७१ लाख रुपये थकीत आहेत. या शेतकऱ्यांची दीड लाखापर्यंतची कर्जमाफी झाली तर त्यांचे ४९ कोटी ८७ लाखांचे कर्ज हलके होणार आहे; पण दीड लाखाचा लाभ होण्यासाठी त्यांना अगोदर ३६ कोटी ८४ लाख रुपये बॅँकेत भरावे लागणार आहेत. नैसर्गिक संकटासह इतर कारणांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून शेतकऱ्यांची कर्जे थकीत गेली आहेत. पाच लाखांच्या थकबाकीदाराला कर्जमाफीतील दीड लाखाचा लाभ मिळवायचा झाल्यास त्याला अगोदर साडेतीन लाखांची रक्कम बॅँकेत जमा करावी लागणार आहे. त्याच्याकडे साडेतीन लाख असते तर तो पाच वर्षे चक्रवाढ व्याजात अडकत कशाला बसला असता? अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. दीड लाखावरील रक्कम भरल्याशिवाय सवलतीची रक्कम खात्यावर जमा होणार नसल्याने त्याला पुन्हा कर्जपुरवठा करता येणार नाही.केंद्राप्रमाणे ही कर्जमाफी फ्लॉप ठरणार?केंद्र सरकारने २००९ ला पाच एकरांपर्यंतचे सगळे कर्ज माफ केले होते. पाच एकरांवरील थकबाकीदारांनी ७५ टक्के थकीत रक्कम भरायची. त्यानंतर सरकार २५ टक्के रक्कम देणार होते; पण याला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना काडीचाही फायदा झाला नाही. त्याची पुनरावृत्ती होणार, अशी चर्चा बॅँकिंग क्षेत्रात सुरू आहे. कर्जमर्यादेच्या निकषाचा अडसरशेतकऱ्यांना सर्वाधिक कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यात बोगसगिरी खपवून घेणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. थकबाकीदाराचे क्षेत्र, थकबाकी व कर्जमर्यादा यांची सांगड घालूनच पात्र शेतकरी ठरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जमर्यादेचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.