शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राधानगरी पंचायत समितीमध्ये उपसभापतिपदासाठी ‘फिल्ंिडग’

By admin | Updated: March 13, 2017 23:33 IST

निवडीबाबत उत्सुकता : राष्ट्रवादीकडे सभापतिपदाचा एकमेव सदस्य

राधानगरी : दहा सदस्यसंख्या असलेल्या राधानगरी पंचायत समितीच्या सभागृहात सर्वाधिक पाच सदस्य निवडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमत नसल्याने पुढील वाटचाल कशी राहणार याबाबत उत्सुकता आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सभापतिपदाचा एकमेव सदस्य या पक्षाकडेच असल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे. मात्र उपसभापतिपदासाठी समझोता की चिठ्ठी याकडे लक्ष लागून राहिले आहे. विरोधात कॉंग्रसचे चार व शिवसेनेचा एक असे बलाबल आहे. गेल्या साडेसात वर्षांत येथे दोन्ही काँग्रेसमध्ये समझोता एक्स्प्रेस धावत आहे.दहा वषार्पूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमताने सत्ता हस्तगत करत कॉंग्रेसला बाजूला ठेवले होते.मात्र २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणामुळे कॉंग्रेसच्या गजानन बिल्ले यांना उपसभापतिपद देवून सत्तेत सामावून घेतले होते. २०१२ मध्ये पुन्हा हे दोन्ही पक्ष विरोधात लढले. त्यावेळी मित्रपक्षासह दोघांना प्रत्येकी पाच अशा समान जागा मिळाल्या. त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय न राहिल्याने येथून पुन्हा समझोता एक्स्प्रेस धावली.गेल्या पाच वर्षांत चार पक्षांनी सत्तेचा उपभोग घेतला. या काळात अन्यत्र राजकीय वादविवाद झाले तरीही येथील सत्तेवर त्याचा काही परिणाम झाला नाही त्यामुळे दहापैकी सहाजणांना सभापती व चारजणांना उपसभापती म्हणून संधी मिळाली. (प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादीत कितीही टोकाचा वाद असला तरी जिल्हा परिषदेत त्यांची आघाडी होणार असल्याने येथेही हे दोन पक्ष आघाडी करतील व गेल्या पाच वर्षाप्रमाणे पदांची वाटणी करतील अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी विकासाच्या मुद्यावर अशी आघाडी होईल, असे संकेत दिले आहेत. तालुक्यात दोन्ही कॉग्रेस आमने-सामनेनुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीची लढत दोन्ही काँग्रेसमध्येच झाली. जिल्ह्यात इतरत्र भाजप व मित्र पक्षांनी बाजी मारली असली तरी येथे मात्र त्यांना संधी मिळाली नाही. काँग्रेसचा मित्रपक्ष स्वाभिमानी संघटना व राष्ट्रवादीचा मित्र जनता दल यांनी त्यांची साथ सोडली पण त्यांनाच याचा फटका बसला. राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या. काँग्रेसला चार व अनपेक्षितपणे शिवसेनेला एक जागा मिळाली. शिवसेनेला मिळालेली जागा जाधव गुरुजी यांच्या गटाची आहे. ते मुळचे काँग्रेसचेच आहेत. शिवाय त्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जमत नाही. ते थेट राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.