शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषण विरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषण विरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी व त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचगंगा प्रदूषणप्रश्नी सुरू असलेले हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वास बालीघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गत महिन्यात पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने त्याची पाहणी करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी बांधून घातले होते. त्यामुळे अधिकारी हरबड यांनी बंडू पाटील, बालीघाटे यांच्यासह इतर तीन अज्ञात कार्यकर्त्यांवर कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते.

ते म्हणाले, पंचगंगा प्रदूषित होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडले, तरी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कारखाने व उद्योग, व्यावसायिक यांच्यावर गून्हे दाखल का झाले नाहीत? उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड हे सतत रजेवर का असतात? शिवाय अधिकारी रवींद्र आंधळे कार्यालयात व प्रदूषण ठिकाणी न येण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करून अधिकारी नदी प्रदूषित करणारे कारखानदार व प्रोसेसधारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, नदी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना टाळे ठोकावे, अशा सूचना देऊनदेखील त्याची अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी बंडू उंमडाळे, रघू नाईक, अमीर नदाफ यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.