शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

राखेप्रश्नी वसंतदादा साखर कारखान्यावर फौजदारी दाखल करा

By admin | Updated: December 23, 2016 23:33 IST

अमित शिंदे : कारवाई न केल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ बरखास्तीची मागणी शासनाकडे करणार

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याने राख नियंत्रण यंत्रणा बसवूनही, ती कार्यान्वित न करता बाहेर राख सोडली जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असल्यामुळे कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळावर सात दिवसात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड्. अमित शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. कारवाई न केल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळच बरखास्त करण्याची शासनाकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, वसंतदादा कारखान्याच्या राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे झाडांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. याप्रश्नी जिल्हा सुधार समितीने मागील गळीत हंगामावेळी आंदोलन केले होते. आंदोलनानंतर कारखान्याने राख नियंत्रणाची यंत्रणा उभारली. परंतु, कारखाना ही यंत्रणा वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुन्हा कारखान्याच्या राखेचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. या प्रदूषणामुळे संजयनगर, चिंतामणीनगर, घन:शामनगर, शिवोदयनगर, शांतिनिकेतन परिसरातील झाडांंच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांच्या डोळ्यात राख जात असल्यामुळे अपघात होत आहेत. या प्रश्नावर जिल्हा सुधार समितीच्या माध्यमातून आंदोलन केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली. त्यांनी लगेच राख नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना वसंतदादा कारखाना प्रशासनाला दिली होती. कारखाना प्रशासनानेही राख नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केल्याचे जाहीर केले होते. परंतु, ही त्यांची घोषणा फसवी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. कारखाना रात्री मोठ्याप्रमाणात राख सोडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यानुसार कारखाना परिसरातील काही उपनगरांना भेट दिली. यावेळी कारखाना रात्रीची राख सोडत असल्याचे दिसून आले आहे. झाडांवर, घरांच्या परिसरातही राखेचा थर साचला आहे. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि त्यांचे संचालक मंडळ प्रदूषण नियंत्रण मंडळाची फसवणूक करीत असल्यामुळे त्यांच्यावर सात दिवसात फौजदारी कारवाई करावी. या कालावधित कारवाई न झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ बरखास्त करावे, अशी आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. यावेळी प्रा. आर. बी. शिंदे, हर्षवर्धन आलासे, अ‍ॅड. राजाराम यमगर, जयंत जाधव, सतीश भंडारे, शंकर माने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दादांच्या विचारांचे आम्ही वारसदारवसंतदादांच्या नावाचा कारखाना जिल्हा सुधार समिती बंद पाडत असल्याचा भावनिक अपप्रचार केला जात आहे. पण, आम्ही वसंतदादांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत. दादा नेहमीच जनतेचा त्रास कमी करण्यासाठी लढले. दादांचे तेच काम आम्ही पुढे चालवत आहोत, असे अ‍ॅड्. शिंदे म्हणाले. तसेच वसंतदादांच्या वारसांनी एकही संस्था व्यवस्थित चालविली नाही. दादांच्या नावाची ही एकमेव संस्था वसंतदादा कारखाना चालू आहे. तो तरी त्यांच्या वारसांनी व्यवस्थित चालवावा, असे आवाहनही त्यांनी केले.