शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोडोलीत पाटील विरुद्ध कोरे लढत

By admin | Updated: July 7, 2015 01:29 IST

ग्रामपंचायत निवडणूक : यशवंत एकनाथ, भारत पाटील १६ वर्षांनी एकत्र

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कोडोली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विलास पाटील हे गट एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तीन पाटील विरुद्ध माजी आमदार विनय कोरे अशी झुंज होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये नेमकी कशी आघाडी होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांसाठी २५ जुलैला निवडणूक होत आहे. आता तिथे कोरे गटाची सत्ता आहे. त्या गटाचे १२ व विरोधी यशवंतदादा पाटील गटाचे पाच सदस्य आहेत. कोरे गट गावच्या राजकारणात अल्पमतात होता. भारतअप्पा पाटील यांनी कोरे यांचे नेतृत्व मानून काम करण्यास सुरुवात केल्यावर स्थानिक राजकारणाचे चित्र बदलले. अल्पमतातील कोरे गट सत्तेत आला. स्वत: पाटील २००२ मध्ये पन्हाळा पंचायत समितीचे सभापती झाले. पुढे २००७ मध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. जिल्हा परिषदेच्या २०१२ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या. भारतअप्पा पाटील सोबत असल्यामुळे २००० पासून कोरे गटाचे गावच्या राजकारणात वर्चस्व राहिले. या गटाचे नेतृत्व भारतअप्पा पाटील करत होते. परंतु, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून पाटील व कोरे यांच्यात राजकीय वितुष्ट आले. जनसुराज्य पक्षात राहून आपल्याला राजकीय भवितव्य नाही, असे भारतअप्पांना वाटत होते. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतअप्पा तटस्थ राहिले. स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून विधानसभेची शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी मिळावी, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला ते पुन्हा कोरे यांच्याशीच संगत करणार की काही वेगळा पवित्रा घेणार, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, आता दादा गटाशी त्यांनी संधान बांधल्याने कोरे व भारतअप्पा यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्याचे स्पष्ट झाले. तालुक्याच्या राजकारणातही पडसाद भारतअप्पा पाटील, अमर पाटील, डॉ. जयंत पाटील व स्वाभिमानीचे विलास पाटील यांची जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. सर्वांनी एकत्र यायचे हा निर्णय झाला असून, जागावाटप चर्चेतून ठरवू, असे भारतअप्पा पाटील यांनी स्पष्ट केले. या घडामोडींचा तालुक्याच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. कोडोली हे कोरे यांचे मूळ गाव. त्यामुळे तेथूनच त्यांच्याविरोधातील राजकारणाला आता विरोध सुरू झाला आहे. यशवंत एकनाथ पाटील व भारतअप्पा हे नातेवाईक आहेत. सोळा वर्षांनंतर ते पुन्हा राजकारणात एकत्र आले आहेत.