शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कोल्हापुरातील पुुजारी हटेपर्यंत लढा सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 17:06 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी उपस्थित झालेल्या लक्षवेधी प्रश्नानंतर न्याय व विधि खात्याच्या मंत्र्यांनी तीन महिन्यांत हा कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. देशातील विविध मंदिरांमध्ये आधीच हा कायदा झालेला असल्याने फारसे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तीन महिन्यांत शासनाने हा कायदा केला नाही तर रस्त्यावरची लढाई अत्यंत तीव्र केली जाईल, असा इशारा स्थानिक आमदारांनी व संघर्ष समितीने शनिवारी दिला.

ठळक मुद्दे स्थानिक आमदारांसह संघर्ष समितीचा निर्णयआत्ता पुजारी हटवू शकतो...जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करू नये

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी उपस्थित झालेल्या लक्षवेधी प्रश्नानंतर न्याय व विधि खात्याच्या मंत्र्यांनी तीन महिन्यांत हा कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. देशातील विविध मंदिरांमध्ये आधीच हा कायदा झालेला असल्याने फारसे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तीन महिन्यांत शासनाने हा कायदा केला नाही तर रस्त्यावरची लढाई अत्यंत तीव्र केली जाईल, असा इशारा स्थानिक आमदारांनी व संघर्ष समितीने शनिवारी दिला.

गुरुवारी (दि. १०) विधानसभेत कोल्हापुरातील स्थानिक आमदारांनी अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासंबंधीचा लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर न्याय व विधि खात्याचे मंत्री रणजित पाटील यांनी, ‘या विषयावर देशभरातील विविध मंदिरे व तेथील व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नियुक्त केली आहे. त्या समितीचा अहवाल तसेच कोल्हापुरातील जिल्हाधिकाºयांकडून अहवाल आल्यानंतर पुढील तीन महिन्यांत हा कायदा केला जाईल,’ असे आश्वासन दिले आहे. आमदारांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडल्याने गुरुवारी त्यांचा अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार म्हणाले, हा प्रश्न केवळ भाविक विरुद्ध पुजारी अशा वादाचाच आहे. त्यामुळे त्याला कोणीही जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करू नये. कोल्हापूरकरांनी आंदोलनातून टोल हटविला आहे; त्यामुळे तीन महिन्यांत शासनाने पगारी पुजारी नेमले नाहीत तर रस्त्यांवर उतरून आम्ही लढाई तीव्र करू.

स्थगिती आलीच तर.

जिल्हाधिकाºयांनी असा अहवाल शासनाला देऊ नये म्हणून श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी केलेल्या दाव्याचा सोमवारी निकाल लागणार आहे. समजा, निकाल शासनाच्या विरोधात लागला तर पगारी पुजारी नेमण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो; पण कायदा होण्यावर बंधने येणार नाहीत. तसेच या विषयावर स्वतंत्र समिती काम करीत आहे.

आत्ता पुजारी हटवू शकतो...

आमदार म्हणाले, न्याय व विधि खात्याच्या मंत्र्यांनी स्वत: सभागृहात हे मान्य केले की, अंबाबाईच्या गाभाºयातील उत्पन्नाचा केवळ दहा रुपयांपर्यंतचा भाग पुजाºयांनी घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही सगळे आत्ता मंदिरात जाऊन पुजाºयांना बाहेर काढू शकतो; पण हा विषय शांततेने सुटावा आणि मंदिराच्या लौकिकाला बाधा पोहोचू नये; शिवाय पालकमंत्री व शासनही सकारात्मक आहे; म्हणून लढ्याची धार कमी केली आहे.