शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

कोल्हापुरातील पुुजारी हटेपर्यंत लढा सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 17:06 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी उपस्थित झालेल्या लक्षवेधी प्रश्नानंतर न्याय व विधि खात्याच्या मंत्र्यांनी तीन महिन्यांत हा कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. देशातील विविध मंदिरांमध्ये आधीच हा कायदा झालेला असल्याने फारसे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तीन महिन्यांत शासनाने हा कायदा केला नाही तर रस्त्यावरची लढाई अत्यंत तीव्र केली जाईल, असा इशारा स्थानिक आमदारांनी व संघर्ष समितीने शनिवारी दिला.

ठळक मुद्दे स्थानिक आमदारांसह संघर्ष समितीचा निर्णयआत्ता पुजारी हटवू शकतो...जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करू नये

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी उपस्थित झालेल्या लक्षवेधी प्रश्नानंतर न्याय व विधि खात्याच्या मंत्र्यांनी तीन महिन्यांत हा कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. देशातील विविध मंदिरांमध्ये आधीच हा कायदा झालेला असल्याने फारसे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तीन महिन्यांत शासनाने हा कायदा केला नाही तर रस्त्यावरची लढाई अत्यंत तीव्र केली जाईल, असा इशारा स्थानिक आमदारांनी व संघर्ष समितीने शनिवारी दिला.

गुरुवारी (दि. १०) विधानसभेत कोल्हापुरातील स्थानिक आमदारांनी अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासंबंधीचा लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर न्याय व विधि खात्याचे मंत्री रणजित पाटील यांनी, ‘या विषयावर देशभरातील विविध मंदिरे व तेथील व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नियुक्त केली आहे. त्या समितीचा अहवाल तसेच कोल्हापुरातील जिल्हाधिकाºयांकडून अहवाल आल्यानंतर पुढील तीन महिन्यांत हा कायदा केला जाईल,’ असे आश्वासन दिले आहे. आमदारांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडल्याने गुरुवारी त्यांचा अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार म्हणाले, हा प्रश्न केवळ भाविक विरुद्ध पुजारी अशा वादाचाच आहे. त्यामुळे त्याला कोणीही जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करू नये. कोल्हापूरकरांनी आंदोलनातून टोल हटविला आहे; त्यामुळे तीन महिन्यांत शासनाने पगारी पुजारी नेमले नाहीत तर रस्त्यांवर उतरून आम्ही लढाई तीव्र करू.

स्थगिती आलीच तर.

जिल्हाधिकाºयांनी असा अहवाल शासनाला देऊ नये म्हणून श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी केलेल्या दाव्याचा सोमवारी निकाल लागणार आहे. समजा, निकाल शासनाच्या विरोधात लागला तर पगारी पुजारी नेमण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो; पण कायदा होण्यावर बंधने येणार नाहीत. तसेच या विषयावर स्वतंत्र समिती काम करीत आहे.

आत्ता पुजारी हटवू शकतो...

आमदार म्हणाले, न्याय व विधि खात्याच्या मंत्र्यांनी स्वत: सभागृहात हे मान्य केले की, अंबाबाईच्या गाभाºयातील उत्पन्नाचा केवळ दहा रुपयांपर्यंतचा भाग पुजाºयांनी घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही सगळे आत्ता मंदिरात जाऊन पुजाºयांना बाहेर काढू शकतो; पण हा विषय शांततेने सुटावा आणि मंदिराच्या लौकिकाला बाधा पोहोचू नये; शिवाय पालकमंत्री व शासनही सकारात्मक आहे; म्हणून लढ्याची धार कमी केली आहे.