शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

लढा ! आत्महत्या नको नेत्यांची भावनिक साद : विनायक गुदगी याला शोकसभेत श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:58 IST

मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा, यश जवळ आले आहे, आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद सोमवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी दिली.

कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा, यश जवळ आले आहे, आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद सोमवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी दिली. विनायक गुदगी या कणेरीवाडीतील तरुणाने रविवारी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दसरा चौकात शोकसभेचे आयोजन केले होते.आरक्षण हा आपला हक्क असला तरीही तो आपण मिळवणारच आहे, पण त्यासाठी आत्महत्या करू नका. लढा द्या, यश जवळ आले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी बळ हवे आहे, त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद अनेक आंदोलक प्रमुखांनी घातली. शासनानेही आंदोलकांचा अंत पाहू नये. तातडीने आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा शासनाविरोधी ‘हर हर महादेव’ची घोषणा द्यायलाही वेळ लागणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी वसंतराव मुळीक, फत्तेसिंह सावंत, सचिन तोडकर, प्रा. जयंत पाटील, हर्षल सुर्वे यांची शोकसभेत भाषणे झाली.दरम्यान, आत्महत्या केलेल्या विनायक गुदगी याने नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गुदगी याच्या भावाला एका कंपनीत नोकरीस घेण्याची जबाबदारी एका उद्योजकाने उचलली आहे.मराठा आरक्षण चिघळविण्याचा काहींचा प्रयत्न : महेश जाधवकोल्हापूर : स्वत:च्या मतदारसंघातील मराठा आरक्षण आंदोलन ज्यांनी बाजूला ठेवले आहे, असे काहीजण कोल्हापुरात येऊन भाषणबाजी करत आहेत. काही मंडळी मुद्दामहून हे आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे कोल्हापूर महानगरचे माजी अध्यक्ष व पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकाद्वारे केला. त्याचबरोबर विनायक गुदगी याची आत्महत्या मराठा आरक्षण आंदोलनाशी जोडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.पत्रकातील माहिती अशी : गेले दहा-बारा दिवस मराठा आरक्षणाबाबत ठिय्या आंदोलन सुरू आहे. बाहेरून येऊन येथे आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. हे योग्य नसून कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण देण्यास सरकार बांधील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरअखेर मराठा समाजाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून आरक्षण देणार, असे सांगितले आहे; त्यामुळे आंदोलकांनी त्यावर विश्वास ठेवावा व शांततेने व संयमाने आंदोलन करावे. जर ( पान ४ वर)