शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

पंधरा मिनिटांत अनेक संसार उघड्यावर!

By admin | Updated: May 5, 2017 00:22 IST

वादळी वाऱ्याचा तडाखा : वाघेरी, मेरवेवाडीत घरांची पडझड; झाडे कोसळली, वीजखांबही जमीनदोस्त; शेतीचे नुकसान

कऱ्हाड/ओगलेवाडी : वादळी वाऱ्यासह बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घराचे छत उडाले. तर काही ठिकाणी घर तसेच वाहनावर झाड मोडून पडले. काही गावांमध्ये वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. तसेच रस्त्यावर झाडे मोडून पडल्याने वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती. कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी आणि मेरवेवाडी परिसरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने या परिसरात मोठे नुकसान झाले. संजय शिवराम गायकवाड यांच्या घरावरील कौले, राजाराम कोंडिबा गायकवाड यांचे पत्र्याचे शेड, सुदाम कोंडिबा गायकवाड, हणमंत गणपत पवार, अरुण बाबूराव पवार या सर्वांच्या घरावरील कौले, रशिद जाफर मुल्ला, रफीक उमर पटेल, इब्राहिम खाजीमियाँ पटेल, निजाम मुल्ला, अल्लाउद्दीन मुसांडे, इम्रान चांद पटेल, राहुल नेताजी गायकवाड, बापू ज्ञानू पाटोळे, पोपट गोपाळ पाटोळे, अशोक कोळी, प्रकाश बापू साळुंखे, कासिम गुलाबहुसेन पटेल, लक्ष्मण गोविंद माळी, दादामियाँ पटेल, युसूफ शमशुद्दीन पटेल, बाबूराव धोंडी गुरव, हुसेन धोंडी पटेल, मधुकर दत्तात्रय पाटोळे, बरकत मुल्ला, हासिम सुलतान पटेल, महादेव संपत पवार, संगीता सुखदेव साळुंखे, भीमराव अण्णा पवार, लिलाताई भीमराव तुपे यांच्या घरावरील पत्रे आणि कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.घरावरील छतच उडून गेल्यामुळे घरात साठवलेले धान्य तसेच संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. वर्षभरासाठी साठवलेले धान्य भिजल्याने वर्षभर खायचे काय, असा प्रश्न संबंधित कुटुंबासमोर उभा आहे. सुमारे पन्नास ते साठ क्विंटल ज्वारी, गहू, शेंगा तसेच कडधान्य पावसात भिजले आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक साहित्यही भिजले आहे. विजेच्या तारा, खांब कोसळले आहेत. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे वाघेरी आणि मेरवेवाडीतील अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)अनेकांना निवारा शोधण्याची वेळपहिल्याच पावसात घराचे छप्पर उडून गेल्याने अनेकांना राहण्यासाठी तात्पुरते घर शोधावे लागत आहे. गुरुवारी काहीजणांनी घराच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. तर काहीजणांनी प्लास्टिक कागद वापरून निवारा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही घरांवरील पत्रा एवढ्या लांबवर जाऊन पडला होता की तो गोळा करतानाही ग्रामस्थांना शिवार तुडवावे लागत होते. करवडीत वीज खांब कोसळलाशामगाव : बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करवडी येथे रस्त्यानजीक असलेला वीज खांब मोडून पडला. या खांबावरील तारा एकमेकांत गुंतल्याने शॉर्टसर्किट होऊन तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, करवडीसह परिसरातील गावांमधील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता. गुरुवारी खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.मलकापूर परिसराला तडाखामलकापूर : परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यात वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले. तर भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणीजिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी परिसरातील गावांची पाहणी केली. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची सूचनाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. संबंधित कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निवास थोरात यांनी दिली.चिंचमळ्यात संरक्षक भिंत कोसळलीचिंचमळा येथे कऱ्हाड-पुसेसावळी रस्त्यालगत गारमेंट कंपनी आहे. या कंपनीभोवती संरक्षक भिंत उभारण्यात आली असून, बुधवारच्या वादळी वाऱ्यात वीस फूट भिंत जमीनदोस्त झाली. सुदैवाने यावेळी परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.