शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

पंधरा मिनिटांत अनेक संसार उघड्यावर!

By admin | Updated: May 5, 2017 00:22 IST

वादळी वाऱ्याचा तडाखा : वाघेरी, मेरवेवाडीत घरांची पडझड; झाडे कोसळली, वीजखांबही जमीनदोस्त; शेतीचे नुकसान

कऱ्हाड/ओगलेवाडी : वादळी वाऱ्यासह बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घराचे छत उडाले. तर काही ठिकाणी घर तसेच वाहनावर झाड मोडून पडले. काही गावांमध्ये वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. तसेच रस्त्यावर झाडे मोडून पडल्याने वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती. कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी आणि मेरवेवाडी परिसरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने या परिसरात मोठे नुकसान झाले. संजय शिवराम गायकवाड यांच्या घरावरील कौले, राजाराम कोंडिबा गायकवाड यांचे पत्र्याचे शेड, सुदाम कोंडिबा गायकवाड, हणमंत गणपत पवार, अरुण बाबूराव पवार या सर्वांच्या घरावरील कौले, रशिद जाफर मुल्ला, रफीक उमर पटेल, इब्राहिम खाजीमियाँ पटेल, निजाम मुल्ला, अल्लाउद्दीन मुसांडे, इम्रान चांद पटेल, राहुल नेताजी गायकवाड, बापू ज्ञानू पाटोळे, पोपट गोपाळ पाटोळे, अशोक कोळी, प्रकाश बापू साळुंखे, कासिम गुलाबहुसेन पटेल, लक्ष्मण गोविंद माळी, दादामियाँ पटेल, युसूफ शमशुद्दीन पटेल, बाबूराव धोंडी गुरव, हुसेन धोंडी पटेल, मधुकर दत्तात्रय पाटोळे, बरकत मुल्ला, हासिम सुलतान पटेल, महादेव संपत पवार, संगीता सुखदेव साळुंखे, भीमराव अण्णा पवार, लिलाताई भीमराव तुपे यांच्या घरावरील पत्रे आणि कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.घरावरील छतच उडून गेल्यामुळे घरात साठवलेले धान्य तसेच संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. वर्षभरासाठी साठवलेले धान्य भिजल्याने वर्षभर खायचे काय, असा प्रश्न संबंधित कुटुंबासमोर उभा आहे. सुमारे पन्नास ते साठ क्विंटल ज्वारी, गहू, शेंगा तसेच कडधान्य पावसात भिजले आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक साहित्यही भिजले आहे. विजेच्या तारा, खांब कोसळले आहेत. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे वाघेरी आणि मेरवेवाडीतील अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)अनेकांना निवारा शोधण्याची वेळपहिल्याच पावसात घराचे छप्पर उडून गेल्याने अनेकांना राहण्यासाठी तात्पुरते घर शोधावे लागत आहे. गुरुवारी काहीजणांनी घराच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. तर काहीजणांनी प्लास्टिक कागद वापरून निवारा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही घरांवरील पत्रा एवढ्या लांबवर जाऊन पडला होता की तो गोळा करतानाही ग्रामस्थांना शिवार तुडवावे लागत होते. करवडीत वीज खांब कोसळलाशामगाव : बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करवडी येथे रस्त्यानजीक असलेला वीज खांब मोडून पडला. या खांबावरील तारा एकमेकांत गुंतल्याने शॉर्टसर्किट होऊन तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, करवडीसह परिसरातील गावांमधील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता. गुरुवारी खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.मलकापूर परिसराला तडाखामलकापूर : परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यात वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले. तर भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणीजिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी परिसरातील गावांची पाहणी केली. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची सूचनाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. संबंधित कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निवास थोरात यांनी दिली.चिंचमळ्यात संरक्षक भिंत कोसळलीचिंचमळा येथे कऱ्हाड-पुसेसावळी रस्त्यालगत गारमेंट कंपनी आहे. या कंपनीभोवती संरक्षक भिंत उभारण्यात आली असून, बुधवारच्या वादळी वाऱ्यात वीस फूट भिंत जमीनदोस्त झाली. सुदैवाने यावेळी परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.