शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

अस्वस्थ काळाच्या मुक्या संवेदना - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

‘मरण कुणाला टळलंय बाबा, आज त्यो गेला उद्या आपण....' आपल्या पोटच्या पोराचा मेल्यानंतर तोंडसुद्धा बघता न आलेली आक्का मनाला ...

‘मरण कुणाला टळलंय बाबा, आज त्यो गेला उद्या आपण....'

आपल्या पोटच्या पोराचा मेल्यानंतर तोंडसुद्धा बघता न आलेली आक्का मनाला सावरता सावरता उरलासुरला आयुष्याचा संसार मुठीत धरून जगण्याचं तत्त्वज्ञान माझ्या कानात ठासून भरताना मला कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण वाटला, तर दुःखाला नि सुखाला जगण्याची आसक्ती घट्ट चिकटलेली असते. जगताना अनेक बरे वाईट प्रसंग येत असतात. आपण या हा भवसागर पार करायलाच हवा. आपण दुःखमुक्त होण्यासाठी सम्यक व्हायला हवं असं सांगणारा ती बुद्ध वाटली. काळ नि वेळ, सुख नि दुःख कधी घरं बांधून माणसांच्या जीवनात राहत नसतात हे तत्त्वज्ञान सांगणारी महान विभूती वाटली. जिच्या माथ्यावर कपटानं या नियतीनं अखंड कष्ट कोरलं त्या नियतीचा मला क्षणभर खूप रागही आला. माणसाला दुःखं किती असावीत नि किती संघर्ष असावा याचा महासातबारा म्हणजे माझी आक्काच फक्त आहे असंही नकळत वाटत होतं. पण घरातलं कर्ता कोण अकाली गेलं कि त्या घराची काय वाताहत होत असते हे समोर बघून मी मनानं पुरा उद्ध्वस्त झालो हुतो. हे बघून भावजी नि आक्का मलाच धीर द्यायला लागल्याली बघून मी खूप भारावून गेलो. आयुष्य सारं संघर्षमय झालं की माणसं शांतपणे ही जगण्याची लढाई कशी लढत असतात हे मी नागड्या डोळ्यांनी बघत असताना मला आक्का नि भावजीचा एकिकडं ते दुःखातून सावरल्याचा आनंद वाटत हुता. दुःखानं खचून न जाता काळाच्या छाताडावर उरलंसुरलं आयुष्य कोरण्याची आक्काची धडपड काळजाला हेलावून टाकत हुती.

या वैश्विक महामारीत स्वच्छतेच्या नियमानं जगला तो वाचला नि दुःखाला पाठीवर टाकला तोही जगला हाच जणू आक्का संदेश देत असताना अस्वस्थ काळालाही धडकी बसली असावी.

आपण सावरायलाच हवंय. येळ लय वाईट आलीय. काळ भयान नाचू लागलाय पोरांनू. हिकडं तिकडं उगाच फिरू नका. तोंडावर रुमाल न्हायत मास्क लावा. जीव जगला तर सारं मिळालं. आज माझं लेकरू गेलं कोरोनानं. आरं अशी किती माणस गेली. कुणाचा बा गेला. कुणाची माय गेली कुणाची लेक गेली कुणाची आजी गेली, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा नवरा गेला .कुणाची बायकू गेली तर कुणाचा आज्जा.......

ह्यो कोरोना कुणा-कुणाला उघड्यावर पाडणार हाय कुणास ठाऊक. पण लेकरांनू आपण धीर सोडून चालायचं न्हाय. या कोरोनाशी आता आपण चार हात करायला तयार व्हऊया. सारं जगच हवालदिल झालंय, मग आपण किस झाड कि पत्ती. आपल्या दुःखाला न डगमगता आल्या संकटांना सामुदायिक स्वच्छता, बाजारात गेलं तर घरी आल्यावर साबणानं हात धुवा. अंघोळ करा. स्वच्छ व्हा. असं बाडबाड बोलत असताना बोलताना अंतर ठेवा. कुठं थुंकू नका. असा संदेश देताना आपल्या लेकराचं मरण विसरल्याली बघून अस्वस्थ काळाच्याही संवेदना मुक्या झाल्या हुत्या.

000000