शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

अस्वस्थ काळाच्या मुक्या संवेदना - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

‘मरण कुणाला टळलंय बाबा, आज त्यो गेला उद्या आपण....' आपल्या पोटच्या पोराचा मेल्यानंतर तोंडसुद्धा बघता न आलेली आक्का मनाला ...

‘मरण कुणाला टळलंय बाबा, आज त्यो गेला उद्या आपण....'

आपल्या पोटच्या पोराचा मेल्यानंतर तोंडसुद्धा बघता न आलेली आक्का मनाला सावरता सावरता उरलासुरला आयुष्याचा संसार मुठीत धरून जगण्याचं तत्त्वज्ञान माझ्या कानात ठासून भरताना मला कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण वाटला, तर दुःखाला नि सुखाला जगण्याची आसक्ती घट्ट चिकटलेली असते. जगताना अनेक बरे वाईट प्रसंग येत असतात. आपण या हा भवसागर पार करायलाच हवा. आपण दुःखमुक्त होण्यासाठी सम्यक व्हायला हवं असं सांगणारा ती बुद्ध वाटली. काळ नि वेळ, सुख नि दुःख कधी घरं बांधून माणसांच्या जीवनात राहत नसतात हे तत्त्वज्ञान सांगणारी महान विभूती वाटली. जिच्या माथ्यावर कपटानं या नियतीनं अखंड कष्ट कोरलं त्या नियतीचा मला क्षणभर खूप रागही आला. माणसाला दुःखं किती असावीत नि किती संघर्ष असावा याचा महासातबारा म्हणजे माझी आक्काच फक्त आहे असंही नकळत वाटत होतं. पण घरातलं कर्ता कोण अकाली गेलं कि त्या घराची काय वाताहत होत असते हे समोर बघून मी मनानं पुरा उद्ध्वस्त झालो हुतो. हे बघून भावजी नि आक्का मलाच धीर द्यायला लागल्याली बघून मी खूप भारावून गेलो. आयुष्य सारं संघर्षमय झालं की माणसं शांतपणे ही जगण्याची लढाई कशी लढत असतात हे मी नागड्या डोळ्यांनी बघत असताना मला आक्का नि भावजीचा एकिकडं ते दुःखातून सावरल्याचा आनंद वाटत हुता. दुःखानं खचून न जाता काळाच्या छाताडावर उरलंसुरलं आयुष्य कोरण्याची आक्काची धडपड काळजाला हेलावून टाकत हुती.

या वैश्विक महामारीत स्वच्छतेच्या नियमानं जगला तो वाचला नि दुःखाला पाठीवर टाकला तोही जगला हाच जणू आक्का संदेश देत असताना अस्वस्थ काळालाही धडकी बसली असावी.

आपण सावरायलाच हवंय. येळ लय वाईट आलीय. काळ भयान नाचू लागलाय पोरांनू. हिकडं तिकडं उगाच फिरू नका. तोंडावर रुमाल न्हायत मास्क लावा. जीव जगला तर सारं मिळालं. आज माझं लेकरू गेलं कोरोनानं. आरं अशी किती माणस गेली. कुणाचा बा गेला. कुणाची माय गेली कुणाची लेक गेली कुणाची आजी गेली, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा नवरा गेला .कुणाची बायकू गेली तर कुणाचा आज्जा.......

ह्यो कोरोना कुणा-कुणाला उघड्यावर पाडणार हाय कुणास ठाऊक. पण लेकरांनू आपण धीर सोडून चालायचं न्हाय. या कोरोनाशी आता आपण चार हात करायला तयार व्हऊया. सारं जगच हवालदिल झालंय, मग आपण किस झाड कि पत्ती. आपल्या दुःखाला न डगमगता आल्या संकटांना सामुदायिक स्वच्छता, बाजारात गेलं तर घरी आल्यावर साबणानं हात धुवा. अंघोळ करा. स्वच्छ व्हा. असं बाडबाड बोलत असताना बोलताना अंतर ठेवा. कुठं थुंकू नका. असा संदेश देताना आपल्या लेकराचं मरण विसरल्याली बघून अस्वस्थ काळाच्याही संवेदना मुक्या झाल्या हुत्या.

000000