शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

फेडरेशनला गूळ खरेदी अशक्यच

By admin | Updated: December 17, 2014 23:59 IST

खरेदी करून विकायचा कुठे : मार्केटिंग फेडरेशनसमोर प्रश्न

राजाराम लोंढे - कोल्हापूर -भात, सोयाबीनप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने गूळ खरेदीमध्ये उतरावे, असा रेटा शेतकऱ्यांचा आहे पण गूळ खरेदी करून ठेवायचा कुठे? त्याची विक्री करायची कुठे? असे अनेक प्रश्न आहेत. येथील गूळ खरेदी करून त्याची विक्री गुजरातमध्येच करावी लागणार असल्याने फेडरेशनला गूळ खरेदी करणे अशक्यच आहे. गुळाला मिळणारा दर पाहता हा व्यवसाय शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. यासाठी शासनाने हमीभाव ठरवून द्यावा व त्यापेक्षा कमी दराने विक्री होत असल्यास मार्केटिंग फेडरेशनाच्या माध्यमातून गुळाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शंभर रुपयांपेक्षा खाली गुळाचे दर घसरल्याने १९७८ ला ‘पुलोद’ सरकारमध्ये तत्कालिन सहकारमंत्री प्रा. एन. डी. पाटील यांनी गूळ खरेदीत मार्केटिंग फेडरेशनला उतरले होते. क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ झाली; पण त्यानंतर मार्केट स्थिर राहिले. त्यामुळे फेडरेशनला दोन गाड्या गूळ खरेदी करावा लागला होता. आता तशी परिस्थिती नाही. ३६०० रुपये किंमत निश्चित करून त्याखाली दर येणारा गूळ फेडरेशनने खरेदी करावा, अशी मागणी आहे. तसे झाले तर फेडरेशनाला मोठ्या प्रमाणात रोज गूळ खरेदी करावा लागणार आहे. खरेदी केलेला गूळ ठेवायचा कुठे? हा महत्त्वाचा प्रश्न आहेच. त्याचबरोबर रोज विक्री करायची म्हटली तर त्याला मार्केट कोणते, त्यामुळे पुन्हा फेडरेशनलाही गुजरात मार्केटमध्येच गूळ घेऊन जावे लागणार आहे. हा प्रश्न सहजासहजी सुटणारा नाही. शेतकऱ्यांनीच आता पारंपरिकपणा सोडून ग्राहकांची मागणी तसा पुरवठा करायला हवा. अर्धा किलोचे छोटे रवे, पावडर तयार करण्यासाठी संशोधन करणे गरजेचे आहे. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेऊन नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे, पण तसे न करता ‘सेस’पुरतेच शेतकऱ्यांशी नाते ठेवण्याची परंपराही बाजारसमितीने जोपासल्याने शेतकरी अडचणीत येण्यात ही बाब कारणीभूत आहे. (समाप्त) समितीचे कोल्ड स्टोरेज कागदावरचगुळाचा हंगाम चार महिन्यांचा असतो. या काळात आवक वाढल्याने साहजिकच दराची घसरण होते. यासाठी हंगामात दर खाली आली की कोल्ड स्टोरेजमध्ये गूळ ठेवायचा आणि बिगर हंगामात मार्केटमध्ये काढल्यास दर चांगला मिळू शकतो. त्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज आहे, पण बाजार समितीचे कोल्ड स्टोरेज अनेक वर्षे कागदावरच राहिले आहे. हमीभावासाठी अडचणी !भात, सोयाबीनप्रमाणे केंद्र सरकारने गुळाचा हमीभाव ठरवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हमीभाव शेती उत्पादित मालाला देता येतो, गूळ हा प्रक्रिया केलेला माल असल्याने त्याला हमीभाव कायद्याने देता येत नाही. मानांकन कसे ठरवायचे ?राज्य शासनाने गूळ खरेदीचे आदेश दिले तर गुळाच्या मानांकनाचा (गुणवत्तेचा) प्रश्न निर्माण होणार आहे. भात, सोयाबीन हमीभावाने खरेदी करताना त्याची आर्द्रता तपासली जाते, पण गुळाचे मानांकन कसे ठरवायचे ? असा पेच राहणार आहे.