शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

धगधगत्या गांधीनगरात उद्रेकाची भीती

By admin | Updated: May 18, 2015 01:21 IST

आंबेडकर पुतळ्याचा वाद : पोलीस व प्रशासनाची भूमिका ढिम्मच, रोजची ३० कोटींची उलाढाल ठप्प; संघटनांतही सामंजस्याची गरज

संदीप खवळे / कोल्हापूर बेफिकीर पोलीस, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष अन् अस्वस्थ गांधीनगरवासीय, अशी आजची स्थिती आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यावरून गेले आठवडाभर सुरू असलेला वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. पुतळा अन्यत्र हलविल्याशिवाय बंद मागे घेणार नाही, अशी भूमिका सिंधी व्यापाऱ्यांनी घेतली आहे; तर दुसरीकडे, दलित संघटनांनी पुतळ्याला हात लावू देणार नाही, असा इशारा दिल्यामुळे गांधीनगरात तणावपूर्ण वातावरण आहे. असा सुरू झाला वाद हा वाद सुरू झाला तो गांधीनगर येथील शिरू चौकातील न्यायप्रविष्ट असलेल्या जागेत बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून. दुर्गामाता मंदिराशेजारी रविवारी (दि. ११) मध्यरात्री अज्ञातांकडून डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला. हा पुतळा अन्यत्र बसवावा, या मागणीसाठी सिंधी समाजाने आठवडाभर बाजारपेठ बंद ठेवली आहे. शिरू चौक येथील गट क्रमांक २७७३ ची जागा ही शासनाच्या मालकीची असून, या जागेचे क्षेत्रफळ ३.२५ गुंठे आहे. सध्या ही जागा न्यायप्रविष्ट आहे. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा १९९४ मध्ये गांधीनगर ग्रामपंचायतीकडे व्यवस्थापनासाठी सोपविली. या जागेतील अर्धा गुंठा जागेमध्ये दोन वर्षांपूर्वी लालचंद खुबचंदानी यांनी दुर्गामातेचे मंदिर अनधिकृतरीत्या बांधले, आणि आता येथील रिकाम्या जागेत अज्ञातांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा आणून बसविला आहे. वादाचा फटका सर्वांनाच गेले आठवडाभर सुरू असलेल्या या वादाने गांधीनगर बाजारपेठेतील सुमारे एक हजार दुकानांतून होणारी रोजची ३० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. अद्याप पुतळा हलविण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे बाजारपेठ बंदच राहणार आहे. या ‘बंद’मुळे मालकांबरोबरच गांधीनगरात काम करणारे कामगार, हमाल, फेरीवाले, रिक्षावाले यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच कोल्हापूरसह कोकण आणि बेळगावातून गांधीनगरमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात; पण बाजारपेठ बंद असल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या बंदमध्ये आतापर्यंत सुमारे १५० कोटी रुपयांचे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. दररोज होणारा लाखो रुपयांचा तोटा सहन करून सिंधी बांधव पुतळा अन्यत्र हलवण्यात येईपर्यंत हा बंद सुरूच ठेवणार यावर ठाम आहेत; तर दलित संघटनांनीही पुतळा हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे यापूर्वी कधीही नसलेले तणावपूर्ण वातावरण गांधीनगरवासीय अनुभवत आहेत. तोडग्यासाठी प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अन्यत्र हलवण्यात यावा, यासाठी आतापर्यंत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हा पोलीसप्रमुख, करवीर तहसीलदार यांच्यासोबत, तसेच गांधीनगर पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत सिंधी बांधव आणि ‘आरपीआय’च्या नेत्यांमध्ये आठवडाभरात बैठका झाल्या; पण दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे या बैठकांमध्ये तोडगा निघाला नाही. सिंधी बांधवांनी ग्रामपंचायतीनेच हा पुतळा हलवावा, अशी मागणी केली; तर आंबेडकरी संघटनांनी न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत हा पुतळा हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे वाद चिघळत राहिला. पुतळ्यास पर्यायी जागा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. जुने गांधीनगर पोलीस ठाण्याचे प्रांगण, स्वामी शांतिप्रकाश उद्यान या पर्यायी जागा तहसीलदारांनी सुचविलेल्या आहेत. त्यांचा विचार झाल्यास हा वाद मिटेल , अशी अपेक्षा सिंधी बांधवांनी व्यक्त केली.