शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

धगधगत्या गांधीनगरात उद्रेकाची भीती

By admin | Updated: May 18, 2015 01:21 IST

आंबेडकर पुतळ्याचा वाद : पोलीस व प्रशासनाची भूमिका ढिम्मच, रोजची ३० कोटींची उलाढाल ठप्प; संघटनांतही सामंजस्याची गरज

संदीप खवळे / कोल्हापूर बेफिकीर पोलीस, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष अन् अस्वस्थ गांधीनगरवासीय, अशी आजची स्थिती आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यावरून गेले आठवडाभर सुरू असलेला वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. पुतळा अन्यत्र हलविल्याशिवाय बंद मागे घेणार नाही, अशी भूमिका सिंधी व्यापाऱ्यांनी घेतली आहे; तर दुसरीकडे, दलित संघटनांनी पुतळ्याला हात लावू देणार नाही, असा इशारा दिल्यामुळे गांधीनगरात तणावपूर्ण वातावरण आहे. असा सुरू झाला वाद हा वाद सुरू झाला तो गांधीनगर येथील शिरू चौकातील न्यायप्रविष्ट असलेल्या जागेत बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून. दुर्गामाता मंदिराशेजारी रविवारी (दि. ११) मध्यरात्री अज्ञातांकडून डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला. हा पुतळा अन्यत्र बसवावा, या मागणीसाठी सिंधी समाजाने आठवडाभर बाजारपेठ बंद ठेवली आहे. शिरू चौक येथील गट क्रमांक २७७३ ची जागा ही शासनाच्या मालकीची असून, या जागेचे क्षेत्रफळ ३.२५ गुंठे आहे. सध्या ही जागा न्यायप्रविष्ट आहे. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा १९९४ मध्ये गांधीनगर ग्रामपंचायतीकडे व्यवस्थापनासाठी सोपविली. या जागेतील अर्धा गुंठा जागेमध्ये दोन वर्षांपूर्वी लालचंद खुबचंदानी यांनी दुर्गामातेचे मंदिर अनधिकृतरीत्या बांधले, आणि आता येथील रिकाम्या जागेत अज्ञातांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा आणून बसविला आहे. वादाचा फटका सर्वांनाच गेले आठवडाभर सुरू असलेल्या या वादाने गांधीनगर बाजारपेठेतील सुमारे एक हजार दुकानांतून होणारी रोजची ३० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. अद्याप पुतळा हलविण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे बाजारपेठ बंदच राहणार आहे. या ‘बंद’मुळे मालकांबरोबरच गांधीनगरात काम करणारे कामगार, हमाल, फेरीवाले, रिक्षावाले यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच कोल्हापूरसह कोकण आणि बेळगावातून गांधीनगरमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात; पण बाजारपेठ बंद असल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या बंदमध्ये आतापर्यंत सुमारे १५० कोटी रुपयांचे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. दररोज होणारा लाखो रुपयांचा तोटा सहन करून सिंधी बांधव पुतळा अन्यत्र हलवण्यात येईपर्यंत हा बंद सुरूच ठेवणार यावर ठाम आहेत; तर दलित संघटनांनीही पुतळा हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे यापूर्वी कधीही नसलेले तणावपूर्ण वातावरण गांधीनगरवासीय अनुभवत आहेत. तोडग्यासाठी प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अन्यत्र हलवण्यात यावा, यासाठी आतापर्यंत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हा पोलीसप्रमुख, करवीर तहसीलदार यांच्यासोबत, तसेच गांधीनगर पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत सिंधी बांधव आणि ‘आरपीआय’च्या नेत्यांमध्ये आठवडाभरात बैठका झाल्या; पण दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे या बैठकांमध्ये तोडगा निघाला नाही. सिंधी बांधवांनी ग्रामपंचायतीनेच हा पुतळा हलवावा, अशी मागणी केली; तर आंबेडकरी संघटनांनी न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत हा पुतळा हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे वाद चिघळत राहिला. पुतळ्यास पर्यायी जागा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. जुने गांधीनगर पोलीस ठाण्याचे प्रांगण, स्वामी शांतिप्रकाश उद्यान या पर्यायी जागा तहसीलदारांनी सुचविलेल्या आहेत. त्यांचा विचार झाल्यास हा वाद मिटेल , अशी अपेक्षा सिंधी बांधवांनी व्यक्त केली.