शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

लोकांच्या मनांत उतरली पूर्ण लॉकडाऊनची भीती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:22 IST

कोल्हापूर : दोन दिवसांच्या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीच झाली असली तरी कोल्हापूरकरांची शनिवारची सकाळ आळसावलेली होती. उठून काय करायचे ...

कोल्हापूर : दोन दिवसांच्या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीच झाली असली तरी कोल्हापूरकरांची शनिवारची सकाळ आळसावलेली होती. उठून काय करायचे आहे म्हणून बराच वेळ लोक अंथरुणातच पडून राहिले. शनिवारी सकाळी मात्र लागू झालेला लॉकडाऊन पुढे ३० एप्रिलपर्यंत कायम होणार की काय, या भीतीनेच अनेकांची गाळण उडाली. पोहे खात लोकांनी वृत्तवाहिन्यांवरील बातम्यात त्याचे काही उत्तर मिळते का, याचा शोध घेतला.

लोकमतच्या प्रतिनिधीने सकाळी साऱ्या शहरभर फेरफटका मारला. रस्त्यावर अत्यंत तुरळक वर्दळ दिसत होती. ज्यांच्या घरातील अचानक गॅस संपला होता, ते टाकीला चादर गुंडाळून मोटारसायकलवरून नवीन सिलिंडर आणायला निघाले होते. ग्रामीण भागातून दूध घेऊन आलेले गवळी घरोघरी दुधाचे वाटप करत होते. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते. ओला कचरा..सुका कचऱ्याची धून सगळीकडे वाजत होती. तुंबलेली गटर्स काढण्याचे कामही सुरू होते. सकाळच्या टप्प्यात गाडी धुणे, घरातील स्वच्छतेची कामे सुरू होती.

फुलांचा वासही नव्हता..

रक्त तपासणी प्रयोगशाळा व तुरळक कुठेतरी दवाखाना सुरू होता. दूध विक्री केंद्रे मात्र सुरू होती. कपिलतीर्थ भाजी मार्केट झाकलेल्या भाजीपाल्याचे ढीग घेऊन विश्रांती घेत होते. शिंगोशी मार्केटला फुलांचा वास आला नव्हता. अंबाबाईच्या मंदिरात बाहेरूनच हात जोडणारा भाविकही दिसत नव्हता..

असा होता दिनक्रम..

लोकांनी घरी बसून लोकमत वाचून कोल्हापूर शहर, राज्यासह देशातील कोरोना स्थिती जाणून घेतली. काही जणांनी जाणीवपूर्वक आवडीचे वाचन केले. काहींनी व्हॅाटस ॲपवरील मेसेज वाचण्यात व ते दुसऱ्याला पाठविण्यात आनंद शोधला. पैपाहुण्यांशी, मित्रांशी फोनवरून ख्याली खुशालीही विचारली गेली. दिवसभर टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणे, चमचमीत खाणे, विश्रांती आणि रात्र आयपीएलची मॅच पाहण्यात घालवली.

दहावी-बारावीचे काय..

ज्या कुटुंबात दहावी-बारावीची मुले आहेत त्या पालकांची चिंता तर वेगळीच होती. या परीक्षा होणार की लांबणार, याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. परीक्षा लांबणीवर जातील म्हणून मुलांनीही अभ्यासातून अंग काढून घेतल्याने पालक हवालदिल झाले होते. सर्वांच्या परीक्षा रद्द झाल्या, लांबणीवर पडल्या; परंतु दहावी-बारावीचा काहीच निर्णय न झाल्याने सारेच हैराण आहेत.