शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कोल्हापूरला आवड ताज्या पावाची

By admin | Updated: May 27, 2016 00:03 IST

दोनशे टनांहून अधिक खप : ब्रोमेटच्या चर्चेचा खपावर परिणाम नाही

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना ताजा पाव खायची सवय आहे. पोटॅशियम ब्रोमेट हा पदार्थ पँकिंगच्या पावामध्ये मुख्यत: वापरला जातो. त्यामुळे या पदार्थामुळे कॅन्सर होतो अशी जोरदार चर्चा सुरु असली तरी स्थानिक बाजारपेठेतील पावाच्या विक्रीवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे बेकरी उत्पादकांनी सांगितले.गेले काही दिवस पाव बनवीत असताना त्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट या आरोग्यास घातक असलेल्या रासायनिक पदार्थाचा वापर केला जात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांना कर्करोगासारख्या आजारालाही सामोरे जावे लागत असून, तसे पाहणी अहवालही सरकारला सादर झाले आहेत.कोल्हापुरातील जवळजवळ ३५० हून अधिक बेकरी उत्पादक पाव अथवा तत्सम पदार्थ बनविताना या पावडरचा वापर करीत नाहीत. किंबहुना ही पावडर कसली आहे, याची साधी माहितीही त्यांना नाही. आपल्याकडील पाव किमान तीन दिवस टिकतो. कोल्हापुरात तर ताज्या पावालाच मागणी अधिक असते. मोठ्या शहरातील काही पाव उत्पादक कंपन्या आपले उत्पादन जास्त काळ पॅकिंगमध्ये टिकावे, याकरिता त्यामध्ये असल्या रासायनिक पदार्थांचा वापर करतात. त्यामुळे हा पाव पांढराशुभ्र व मऊ आणि जास्त दिवस टिकतो. आपल्याकडे किमान ४५ मिनिटे पाव भाजला जातो. कमी वेळेत भाजलेला पाव वजनाला जास्त आणि कच्चा राहतो. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यात चांगल्या भाजलेल्या कडक पावालाच ग्राहकांकडून मागणी अधिक आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूरचा साधा पाव राज्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे. यामध्ये मैदा, मीठ, यीस्ट यांचाच वापर केला जातो. याशिवाय मिल्क पावासाठी साखर, दूध, यीस्ट, मैदा यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे कोल्हापुरात पॅकिंगचा कंपनी पाव बहुतांश मंडळी घेत नाहीत. या ग्राहकांना ताजा पाव लागतो. त्यामुळे रोजच्या रोज उत्पादन आणि विक्री होऊन तयार माल खपतोही. त्यामुळे रासायनिक पदार्थ वापरण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्ह्यात दररोज दीडशे ते दोनशे टन पावाचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचते.- एम. आर. शेख, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स संस्था