शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

कोल्हापूरला आवड ताज्या पावाची

By admin | Updated: May 27, 2016 00:03 IST

दोनशे टनांहून अधिक खप : ब्रोमेटच्या चर्चेचा खपावर परिणाम नाही

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना ताजा पाव खायची सवय आहे. पोटॅशियम ब्रोमेट हा पदार्थ पँकिंगच्या पावामध्ये मुख्यत: वापरला जातो. त्यामुळे या पदार्थामुळे कॅन्सर होतो अशी जोरदार चर्चा सुरु असली तरी स्थानिक बाजारपेठेतील पावाच्या विक्रीवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे बेकरी उत्पादकांनी सांगितले.गेले काही दिवस पाव बनवीत असताना त्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट या आरोग्यास घातक असलेल्या रासायनिक पदार्थाचा वापर केला जात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांना कर्करोगासारख्या आजारालाही सामोरे जावे लागत असून, तसे पाहणी अहवालही सरकारला सादर झाले आहेत.कोल्हापुरातील जवळजवळ ३५० हून अधिक बेकरी उत्पादक पाव अथवा तत्सम पदार्थ बनविताना या पावडरचा वापर करीत नाहीत. किंबहुना ही पावडर कसली आहे, याची साधी माहितीही त्यांना नाही. आपल्याकडील पाव किमान तीन दिवस टिकतो. कोल्हापुरात तर ताज्या पावालाच मागणी अधिक असते. मोठ्या शहरातील काही पाव उत्पादक कंपन्या आपले उत्पादन जास्त काळ पॅकिंगमध्ये टिकावे, याकरिता त्यामध्ये असल्या रासायनिक पदार्थांचा वापर करतात. त्यामुळे हा पाव पांढराशुभ्र व मऊ आणि जास्त दिवस टिकतो. आपल्याकडे किमान ४५ मिनिटे पाव भाजला जातो. कमी वेळेत भाजलेला पाव वजनाला जास्त आणि कच्चा राहतो. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यात चांगल्या भाजलेल्या कडक पावालाच ग्राहकांकडून मागणी अधिक आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूरचा साधा पाव राज्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे. यामध्ये मैदा, मीठ, यीस्ट यांचाच वापर केला जातो. याशिवाय मिल्क पावासाठी साखर, दूध, यीस्ट, मैदा यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे कोल्हापुरात पॅकिंगचा कंपनी पाव बहुतांश मंडळी घेत नाहीत. या ग्राहकांना ताजा पाव लागतो. त्यामुळे रोजच्या रोज उत्पादन आणि विक्री होऊन तयार माल खपतोही. त्यामुळे रासायनिक पदार्थ वापरण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्ह्यात दररोज दीडशे ते दोनशे टन पावाचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचते.- एम. आर. शेख, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स संस्था