शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दोष पुरुषाचा, परंतु मानसिक छळ मात्र बाईचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST

कोल्हापूर : मूल होण्यात बाई एकटीच जबाबदार नसते. त्यामध्ये पुरुषाचाही तितकाच दोष असतो; परंतु समाज मात्र बाईचा मानसिक छळ ...

कोल्हापूर : मूल होण्यात बाई एकटीच जबाबदार नसते. त्यामध्ये पुरुषाचाही तितकाच दोष असतो; परंतु समाज मात्र बाईचा मानसिक छळ करत असल्याचे वास्तव आहे. तुला अजून दिवस गेले नाहीत का, म्हणून सासरी व माहेरीही तिचीच परीक्षा घेतली जाते. पुरुषाला असे कोण कधी विचारात नाही. मूल होण्यात पुरुषाची जबाबदारी जास्त असल्याचे वैद्यकीय कारण कोल्हापुरातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंजुळा पिशवीकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

सोनाळी (ता.कागल) येथील सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. त्यातील संशयित आरोपीस लग्नाला पंधरा वर्षे झाली तरी मूल झाले नव्हते, असे पुढे आले आहे. मुलाच्या खुनाच्या कारणांशी हे कारण जोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने मूल न होण्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेतले.

१.मूल होण्यासाठी पती व पत्नीचा वाटा समान ५० टक्के असतो. किंबहुना पुरुषाची जबाबदारी मूल होण्यात जास्त असते. कारण त्याच्या शरीरात पुुरेशा शुक्राणुंची निर्मिती न झाल्यास मूल होण्यात अडचणी येतात.

२.मूल होत नाही म्हटल्यावर आता सर्व दोष पत्नी नावाच्या बाईला दिला जातो. लग्न झाल्यावर वर्षभरानंतर दिवस गेले नाहीत तर त्याबद्दलचा जाब हा पुरुषाला कधीच विचारला जात नाही. तो बाईलाच विचारला जातो.

३. पत्नीच्या शुक्राणुंची तपासणी करण्यासाठी किमान २० हजारांहून जास्त खर्च येतो. त्यासाठी छोटी शस्त्रक्रियाही करावी लागते. याउलट पुरुषाची शुक्रजंतू सुलभ असते. त्यामुळे पुरुषाची तपासणी करणे अधिक गरजेचे असते. त्याच्या शरीरात शुक्रजंतू निर्मितीस अडचणी असतील तर मूल होण्यास विलंब होतो.

४.पुरुषांमध्ये मोबाइलचा वाढता वापर, धूम्रपान, सतत ताणतणाव यामुळे शुक्रजंतू तयार होण्यात अडचणी येतात. तयार झाले तरी ते प्रजननयोग्य नसतात. त्यामुळे गर्भधारणा होत नाही.

५.महिलांमध्ये एक्स एक्स असे जिन्स असतात व पुरुषांमध्ये एक्सवाय असे जिन्स असतात. पुरुष व महिलेतील एक्स-एक्स जिन्स एकत्र आले तर मुलगी जन्माला येते व महिलेतील एक्स व पुरुषांतील वाय जिन्सचे मिलन झाल्यानंतर मुलगा जन्माला येतो. म्हणजे येथेही जन्माला येणारे अपत्य मुलगा की मुलगी होणार, हे सुद्धा पुरुषाच्या जिन्सवर ठरते; परंतु मुलगी झाली म्हणून समाज मात्र बाईचाच छळ करतो, करत आला आहे.

-------------

अनेक घरात हुंदके...

सोनाळीतील वरद पाटील या मुलाचा खून झाल्याचे वृत्त शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावरून व्हायरल होताच कित्येकांना त्याचा मानसिक धक्का बसला. अनेक महिलांना अक्षरश: रडू कोसळले. कारण काहीही असले तरी या अत्यंत गोंडस बाळाने तुझे काय वाईट केले होते रे निर्दयी राक्षसा, अशी संतप्त भावना समाजातून व्यक्त झाली.