शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोष पुरुषाचा, परंतु मानसिक छळ मात्र बाईचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST

कोल्हापूर : मूल होण्यात बाई एकटीच जबाबदार नसते. त्यामध्ये पुरुषाचाही तितकाच दोष असतो; परंतु समाज मात्र बाईचा मानसिक छळ ...

कोल्हापूर : मूल होण्यात बाई एकटीच जबाबदार नसते. त्यामध्ये पुरुषाचाही तितकाच दोष असतो; परंतु समाज मात्र बाईचा मानसिक छळ करत असल्याचे वास्तव आहे. तुला अजून दिवस गेले नाहीत का, म्हणून सासरी व माहेरीही तिचीच परीक्षा घेतली जाते. पुरुषाला असे कोण कधी विचारात नाही. मूल होण्यात पुरुषाची जबाबदारी जास्त असल्याचे वैद्यकीय कारण कोल्हापुरातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंजुळा पिशवीकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

सोनाळी (ता.कागल) येथील सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. त्यातील संशयित आरोपीस लग्नाला पंधरा वर्षे झाली तरी मूल झाले नव्हते, असे पुढे आले आहे. मुलाच्या खुनाच्या कारणांशी हे कारण जोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने मूल न होण्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेतले.

१.मूल होण्यासाठी पती व पत्नीचा वाटा समान ५० टक्के असतो. किंबहुना पुरुषाची जबाबदारी मूल होण्यात जास्त असते. कारण त्याच्या शरीरात पुुरेशा शुक्राणुंची निर्मिती न झाल्यास मूल होण्यात अडचणी येतात.

२.मूल होत नाही म्हटल्यावर आता सर्व दोष पत्नी नावाच्या बाईला दिला जातो. लग्न झाल्यावर वर्षभरानंतर दिवस गेले नाहीत तर त्याबद्दलचा जाब हा पुरुषाला कधीच विचारला जात नाही. तो बाईलाच विचारला जातो.

३. पत्नीच्या शुक्राणुंची तपासणी करण्यासाठी किमान २० हजारांहून जास्त खर्च येतो. त्यासाठी छोटी शस्त्रक्रियाही करावी लागते. याउलट पुरुषाची शुक्रजंतू सुलभ असते. त्यामुळे पुरुषाची तपासणी करणे अधिक गरजेचे असते. त्याच्या शरीरात शुक्रजंतू निर्मितीस अडचणी असतील तर मूल होण्यास विलंब होतो.

४.पुरुषांमध्ये मोबाइलचा वाढता वापर, धूम्रपान, सतत ताणतणाव यामुळे शुक्रजंतू तयार होण्यात अडचणी येतात. तयार झाले तरी ते प्रजननयोग्य नसतात. त्यामुळे गर्भधारणा होत नाही.

५.महिलांमध्ये एक्स एक्स असे जिन्स असतात व पुरुषांमध्ये एक्सवाय असे जिन्स असतात. पुरुष व महिलेतील एक्स-एक्स जिन्स एकत्र आले तर मुलगी जन्माला येते व महिलेतील एक्स व पुरुषांतील वाय जिन्सचे मिलन झाल्यानंतर मुलगा जन्माला येतो. म्हणजे येथेही जन्माला येणारे अपत्य मुलगा की मुलगी होणार, हे सुद्धा पुरुषाच्या जिन्सवर ठरते; परंतु मुलगी झाली म्हणून समाज मात्र बाईचाच छळ करतो, करत आला आहे.

-------------

अनेक घरात हुंदके...

सोनाळीतील वरद पाटील या मुलाचा खून झाल्याचे वृत्त शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावरून व्हायरल होताच कित्येकांना त्याचा मानसिक धक्का बसला. अनेक महिलांना अक्षरश: रडू कोसळले. कारण काहीही असले तरी या अत्यंत गोंडस बाळाने तुझे काय वाईट केले होते रे निर्दयी राक्षसा, अशी संतप्त भावना समाजातून व्यक्त झाली.