शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पितृ पंधरवडा सुरू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

कोल्हापूर : कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या श्राद्धाचा कालावधी समजल्या जाणाऱ्या पितृ पंधरवड्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. या कालावधीत त्या त्या तिथीला ...

कोल्हापूर : कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या श्राद्धाचा कालावधी समजल्या जाणाऱ्या पितृ पंधरवड्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. या कालावधीत त्या त्या तिथीला दिवंगत व्यक्तीच्या नावे पूजा करून त्यांचा कृपाशीर्वाद कुटुंबावर राहावा, घरातील सर्व दोष निघून जावेत, अशी प्रार्थना केली जाते.

अनंत चतुर्दशीनंतर एक दिवसाने महालय म्हणजेच पितृ पंधरवड्याला सुरुवात होते. या दिवसापासून अमावास्येपर्यंतचे पंधरा दिवस प्रत्येक कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावे महालय (अपभ्रंष महाळ) केले जाते. व्यक्तीचे निधन झाले त्या तिथीला त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आवडत्या पदार्थांचा नैवेद्य केला जातो. या काळात कावळ्याला विशेष महत्त्व आहे, नैवेद्य कावळ्याने खाल्ला तर तो पितरांपर्यंत पोहोचतो, अशी श्रद्धा आहे. तसेच कुटुंबात काही दोष असले, तर त्यासाठी त्रिपिंडी, नारायण नागबळी असे विधी केले जातात. जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे मोठ्या प्रमाणात हे विधी केले जातात. हा काळ पितरांचा मानला .त्यामुळे कोणतेही शुभकार्य केले जात नाही. सर्वपित्री अमावास्येला हा कालावधी संपतो. त्यानंतर घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला सुरुवात होते.

----