शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
3
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
4
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
5
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
6
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
7
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
8
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
9
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
10
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
11
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
12
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
13
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
14
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
15
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
16
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
17
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
18
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
19
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

दिंडेवाडी-बारवे प्रकल्पाचे भाग्य कधी उजळणार

By admin | Updated: December 29, 2014 23:49 IST

गेल्या चौदा वर्षांपासून प्रकल्प रेंगाळला : राज्यात युतीचे शासन आल्याने चिकोत्रा खोऱ्याच्या आशा पल्लवित

नामदेव पाटील-पांगिरे -भुदरगड व कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्याला वरदायी ठरलेला व मुहूर्तापासूनच चक्रव्युहात अडकलेल्या दिंडेवाडी-बारवे लघुपाटबंधारे प्रकल्पाचे उर्वरित काम रेंगाळलेले आहे. आधी पुनर्वसन मगच धरण, अशा ठाम भूमिकेवर धरणाचे काम बंद आहे. राज्यात युती शासन आल्याने तसेच कॅबिनेट मंत्री व आमदार याच तालुक्यातील असल्याने लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाने चिकोत्रा खोऱ्यात २.१८ टीएमसी पाणी साठ्याचे नियोजन केले. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोऱ्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे या भागाचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी पिंपळगाव खोऱ्यात झुलपेवाडी (ता. आजरा) येथे १.८६ टी.एम.सी. पाणी साठविण्याचे ठरविले व उर्वरित ०.३२ टीएमसी पाणी पांगिरे खोऱ्यात नागणवाडी प्रकल्पांतर्गत साठविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार दिंडेवाडी-बारवे येथे प्रकल्प उभारण्यासाठी ३१ जानेवारी २००० रोजी १२.९३ कोटी रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली.सुरुवातीला या प्रकल्पाच्या जागेवरून विरोध झाला. प्रथम नागणवाडी येथे प्रकल्पाची जागा दिंडेवाडी-बारवे या ठिकाणी निश्चित करण्यात आली. २४ मे २००१ ला प्रकल्पाच्या मुहूर्ताचा नारळ कोणी फोडायचा यावरून महाभारत घडले. राजकीय गोंधळामुळे व उदासीनतेमुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकत नाही हे निश्चित झाले होते.प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रकल्पाचे काम रेंगाळले. दि. १९ जानेवारी २००९ ला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, कामगारमंत्री हसन मुश्रीफ व धरणग्रस्त कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पाचे काम पुनर्वसनासह दोन वर्षांत पूर्ण करावयाचे असल्याने यासाठी भूसंपादन व पुनर्वसनाचे टप्पे निश्चित करून कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी कृती समितीला दिले होते. बुडीत क्षेत्रातील भूसंपादनाचे निवाडे पूर्ण करणे, तीन महिने कालावधीत धरण पायामध्ये जमीन संपादित केलेल्या खातेदाराला ६५ टक्के रक्कम भरल्यानंतर दोन महिन्यांच्या आत जमिनीचे वाटप केले जाईल, लाभ क्षेत्रातील जमीन संपादन करून प्रकल्पग्रस्तांना वाटप असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले लेखी आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, कार्यकारी अभियंता कदम यांच्याबरोबर कृती समितीची बैठक झाली. मात्र, याही बैठकीत पुनर्वसनाची समाधानकारक प्रक्रिया दिसून आली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आधी पुनर्वसन मगच धरण, अशी भूमिका घेतली. (पूर्वार्ध)आधी पुनर्वसनासाठी शेतकरी ठामप्रकल्पाचे काम समांतर पुनर्वसन या अटीवर २००७ व ०८ या दोन वर्षांत जोरात सुरू झाले. सुमारे ४० टक्के काम पूर्ण केले. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे २००८ पासून शेतकऱ्यांनी हा प्रकल्प अनिश्चित कालावधीसाठी बंद पाडला. प्रशासनाचा या प्रकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रशासन आधी धरण पूर्ण करू द्या, मगच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावता येईल, अशा अटी घालत होते व धरणग्रस्त शेतकरी व कृती समिती आधी पुनर्वसन मगच धरण, अशा भूमिकेवर ठाम राहिल्याने हा प्रकल्प गेल्या चौदा वर्षांपासून रेंगाळला आहे.