शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

दिंडेवाडी-बारवे प्रकल्पाचे भाग्य कधी उजळणार

By admin | Updated: December 29, 2014 23:44 IST

गेल्या चौदा वर्षांपासून प्रकल्प रेंगाळला : राज्यात युतीचे शासन आल्याने चिकोत्रा खोऱ्याच्या आशा पल्लवित

नामदेव पाटील -पांगिरे -भुदरगड व कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्याला वरदायी ठरलेला व मुहूर्तापासूनच चक्रव्युहात अडकलेल्या दिंडेवाडी-बारवे लघुपाटबंधारे प्रकल्पाचे उर्वरित काम रेंगाळलेले आहे. आधी पुनर्वसन मगच धरण, अशा ठाम भूमिकेवर धरणाचे काम बंद आहे. राज्यात युती शासन आल्याने तसेच कॅबिनेट मंत्री व आमदार याच तालुक्यातील असल्याने लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाने चिकोत्रा खोऱ्यात २.१८ टीएमसी पाणी साठ्याचे नियोजन केले. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोऱ्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे या भागाचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी पिंपळगाव खोऱ्यात झुलपेवाडी (ता. आजरा) येथे १.८६ टी.एम.सी. पाणी साठविण्याचे ठरविले व उर्वरित ०.३२ टीएमसी पाणी पांगिरे खोऱ्यात नागणवाडी प्रकल्पांतर्गत साठविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार दिंडेवाडी-बारवे येथे प्रकल्प उभारण्यासाठी ३१ जानेवारी २००० रोजी १२.९३ कोटी रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली.सुरुवातीला या प्रकल्पाच्या जागेवरून विरोध झाला. प्रथम नागणवाडी येथे प्रकल्पाची जागा दिंडेवाडी-बारवे या ठिकाणी निश्चित करण्यात आली. २४ मे २००१ ला प्रकल्पाच्या मुहूर्ताचा नारळ कोणी फोडायचा यावरून महाभारत घडले. राजकीय गोंधळामुळे व उदासीनतेमुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकत नाही हे निश्चित झाले होते.प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रकल्पाचे काम रेंगाळले. दि. १९ जानेवारी २००९ ला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, कामगारमंत्री हसन मुश्रीफ व धरणग्रस्त कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पाचे काम पुनर्वसनासह दोन वर्षांत पूर्ण करावयाचे असल्याने यासाठी भूसंपादन व पुनर्वसनाचे टप्पे निश्चित करून कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी कृती समितीला दिले होते. बुडीत क्षेत्रातील भूसंपादनाचे निवाडे पूर्ण करणे, तीन महिने कालावधीत धरण पायामध्ये जमीन संपादित केलेल्या खातेदाराला ६५ टक्के रक्कम भरल्यानंतर दोन महिन्यांच्या आत जमिनीचे वाटप केले जाईल, लाभ क्षेत्रातील जमीन संपादन करून प्रकल्पग्रस्तांना वाटप असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले लेखी आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, कार्यकारी अभियंता कदम यांच्याबरोबर कृती समितीची बैठक झाली. मात्र, याही बैठकीत पुनर्वसनाची समाधानकारक प्रक्रिया दिसून आली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आधी पुनर्वसन मगच धरण, अशी भूमिका घेतली. (पूर्वार्ध)आधी पुनर्वसनासाठी शेतकरी ठामप्रकल्पाचे काम समांतर पुनर्वसन या अटीवर २००७ व ०८ या दोन वर्षांत जोरात सुरू झाले. सुमारे ४० टक्के काम पूर्ण केले. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे २००८ पासून शेतकऱ्यांनी हा प्रकल्प अनिश्चित कालावधीसाठी बंद पाडला. प्रशासनाचा या प्रकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रशासन आधी धरण पूर्ण करू द्या, मगच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावता येईल, अशा अटी घालत होते व धरणग्रस्त शेतकरी व कृती समिती आधी पुनर्वसन मगच धरण, अशा भूमिकेवर ठाम राहिल्याने हा प्रकल्प गेल्या चौदा वर्षांपासून रेंगाळला आहे.