शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

शेतकरी आत्महत्या निवारण अभियान राबविणार

By admin | Updated: September 22, 2015 00:10 IST

राजू शेट्टी : महिन्याभरात केंद्र व राज्य शासनाला अहवाल देणार

सांगली : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याबरोबरच आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या निवारण अभियान आम्ही राबविणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनामार्फत या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे, मात्र आत्महत्या होऊच नयेत, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कर्जामुळे खचलेल्या व चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याचा विचार सुरू आहे. राज्यातील विशेषत: विदर्भातील दहा गावांचा सर्व्हे यासाठी करणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब तसेच कर्जामुळे अडचणीत आलेले अन्य शेतकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. सविस्तर अभ्यास करून याविषयीचा एक अहवाल आम्ही तयार करणार आहोत. केवळ परिस्थितीचा अहवालच नव्हे, तर त्यामध्ये आम्ही काही उपायसुद्धा सुचविणार आहोत. शेतकऱ्याला आत्महत्याच करावी लागू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. दहा वर्षाच्या कालावधीसाठी शेतकऱ्याला कर्ज मिळावे. त्या कर्जावरील व्याज शासन व सामुदायिक सामाजिक दायित्व योजनेतून (सीएसआर) भागविण्यात यावे. तसेच कर्जाचे संकटकाळात पुनर्गठन झाले पाहिजे. शेतकऱ्याच्या सात-बारावर मालकीसदरी कोणत्याही बॅँकेचे अगर सोसायटीचे नाव लागता कामा नये. इतर हक्कात वित्तीय संस्थेचे नाव असावे. अशा प्रकारच्या अनेक उपाययोजनांमधून राज्यात शेतकऱ्यांसाठी चांगले वातावरण तयार करता येऊ शकते. येत्या महिन्याभरात याचा अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर करणार आहोत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)‘नाम’ला पाठिंबा नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या फाऊंडेशनचा उपक्रम चांगला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यास पाठिंबा आहे. आत्महत्या होऊच नयेत म्हणून आम्ही जी मोहीम हाती घेणार आहोत, त्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.सावकार व नातलगांचेच कर्ज अधिकआत्महत्या केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सावकार व नातवाईकांकडून कर्ज घेतले होते. सावकारी तगादा असह्य होत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे बॅँकांकडून शेतकऱ्यांना सहजरित्या कर्जपुरवठा उपलब्ध झाला पाहिजे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. पदांसाठी वाट पाहूघटकपक्षांनी सत्तेतील सहभागासाठी यापूर्वी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर कोणतीही बैठक झाली नाही. मात्र आम्ही सरकारला यासाठी वेळ देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पदांसाठी आताच कोणताही आमचा आग्रह नाही. योग्यवेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे शेट्टी म्हणाले.