शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले; हा घ्या पुरावा
2
India Pakistan War : पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजू लागला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
5
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
6
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
7
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
8
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
9
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
10
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
11
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
12
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
13
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
14
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
15
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
16
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
17
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
18
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
19
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
20
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम

शेतकऱ्यांचा वीज वितरणशी संघर्ष पेटणार

By admin | Updated: September 14, 2016 23:59 IST

वीज बिल प्रकरण : चार वर्षांची शेतपंपांची थकबाकी पोलिस बंदोबस्तात वसूल करण्याची तयारी

सुहास जाधव--पेठवडगाव -वीज वितरणच्या शेती वीजपंपांची चार वर्षांची थकबाकी तीन कोटी रुपये आहे. ही रक्कम भरण्यासाठी वीज वितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यासाठी तगादा लावला आहे, तर वीज खंडित करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी पळवून लावले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने पोलिसांची मदत घेऊन वसुलीचे नियोजन केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वीज वितरण कंपनी व शेतकरी आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.जून ते सप्टेंबर हे महिने शेतकऱ्यांच्या आर्थिक मंदीचे दिवस असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, तसेच शेतकरी संघटनेने वीज थकीत बिलासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांचा निर्णय होईपर्यंत थकीत बिलांची वसुली जबरदस्तीने करू नये, अशी अपेक्षा आहे. याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष करून कारवाईचा फास शेतकऱ्यांभोवती आवळला आहे. यामुळे शेतकरी वर्ग द्विधा मन:स्थितीत आहे.जयसिंगपूर उपविभागामध्ये पाच कार्यालये कार्यरत आहेत. येथील २१,१८३ शेतकऱ्यांची शेतीपंपांची वीज बिले थकीत आहेत. त्यांच्याकडून वीज वितरण कंपनीचे २२ कोटी ९८ लाख ६३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. या थकीत बिलांची वसुली करण्यासाठी युद्ध पातळीवर वीज वितरण कंपनीची यंत्रणा सुरू आहे. वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्यावतीने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा देऊन वसुली करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. या नोटिसांमध्ये वीज बिलांची रक्कम न भरल्यास १५ दिवसांत विद्युत पुरवठा खंडित करणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी आहे.याबाबत रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने वीज वितरण कंपनीस वीज बिल भरणार नाही, असे पूर्वीच कळविले होते. शेतीसाठी २४ तास पूर्ण दाबाचा विद्युतपुरवठा वीज वितरण कंपनीस बंधनकारक आहे. मात्र, बारा तासांचे भारनियमन, रात्री-अपरात्री वीजपुरवठा करून शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनी नुकसान करीत आहे. वीज बिलामध्ये स्थिर, विद्युत, इंधन अधिभार, विद्युत शुल्क, आदी आकार लादून विद्युत ग्राहकांना लुबाडण्याचे काम वीज वितरण कंपनी करीत आहे. थकीत बिलावर सावकारकीसारखी पठाणी व्याज आकारणी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, असा वीज वितरण कंपनीच्या नोटिसीला खुलासा देण्यात आला आहे.इस्लामपूर (ता. वाळवा) येथे वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने तगादा लावला होता. यावेळी विभागीय जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, वितरण अधिकारी व ग्राहकांची बैठक झाली. यामध्ये विद्युतपुरवठा न तोडता कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. असाच निर्णय वडगाव येथेही घ्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार शेतीची वीज तोडता येणार नाही, असेही निवेदन वीज वितरण कंपनीस देण्यात आले आहेतोडग्याची गरजथकीत वसुलीसाठी शेतकऱ्यांचा कडवा विरोध पाहता वडगाव परिसरातील गावांत झाल्यामुळे वीज वितरण कंपनीने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात महावितरण कंपनी, पोलिस यांचा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. याप्रश्नी दोन्ही बाजूंनी चर्चेतून तोडगा काढण्याची गरज आहे.