शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

कृषी वीज सवलतीतून शेतकरी, ग्रा.पं.ला होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:42 IST

गणपती कोळी कुरुंदवाड : वीज महावितरण कंपनीने कृषी वीज सवलतीतून शेतकरी, ग्रामपंचायतीला भरघोस सवलत दिली आहे. या योजनेमुळे महावितरणबरोबरच ...

गणपती कोळी

कुरुंदवाड : वीज महावितरण कंपनीने कृषी वीज सवलतीतून शेतकरी, ग्रामपंचायतीला भरघोस सवलत दिली आहे. या योजनेमुळे महावितरणबरोबरच शेतकरीही वीज बिल थकबाकीतून मुक्त होणार आहेत. शिवाय ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पनाचे नवीन स्त्रोत निर्माण झाले असून, या उत्पन्नातून गावागावातील वीज वितरणासंदर्भात रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. त्यासाठी शेतकरी आणि ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेण्याची गरज आहे.

महापूर, कोरोना यासह विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी शेती उत्पादनात नुकसानीत आल्याने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज बिले अनेक वर्षांपासून थकीत आहेत. येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत अठरा गावे येत असून या गावांतून सुमारे ३४ कोटी रुपये कृषी वीज बिले थकीत आहेत.

राज्य शासनाने थकीत वीज बिलात पन्नास टक्क्यांची सूट दिली आहे. ही योजना यशस्वी व्हावी यासाठी महावितरणने ग्रामपंचायतीला गावातील थकबाकी वसुलीवर ३३ टक्के तर ग्रामपंचायतीने वसूल करून दिल्यास ३० टक्के अधिक असे एकूण ६३ टक्के रक्कम ग्रामपंचायतीला विकास कामासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणार आहे. यासाठी सरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. या योजनेमुळे महावितरण आणि शेतकरी कृषी वीज बिल थकबाकीतून मुक्त होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीला अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी आहे.

चौकट -

ग्रा.पं.कडून नियोजन गरजेचे वीज बिल वसुलीतून ३० टक्के जादा रक्कम ग्रामपंचायतीला मिळणार आहे. ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना पाच ते दहा टक्के जादा सवलत दिल्यास शेतकरी आणि ग्रामपंचायत दोघांनाही आर्थिक लाभ होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन करणे आवश्यक आहे.

कोट -

या विभागातील गावांमध्ये एकूण ३४ कोटी रुपये थकबाकी असून माफी वगळता अठरा कोटी रुपयांची वसुली आहे. कृषी थकीत वीज बिलात प्रथमच अशी मोठी सवलत दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

- सिकंदर मुल्ला, सहाययक अभियंता