शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शेतकरी संघाचा ‘बैल’ शर्यतीत

By admin | Updated: April 19, 2017 00:53 IST

एक कोटीपेक्षा अधिक नफा : १६१ कोटींची उलाढाल; सभासदांना १२ टक्के लांभाश

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघास २०१६-१७ या आर्थिक वर्षात १६१ कोटींची उलाढाल झाली असून तब्बल १ कोटी १ लाख ४८ हजार नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. गतवर्षी तोट्यात असणाऱ्या शाखा नफ्यात आल्या असून, आगामी काळात किमान ४0 शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने शेतकरी संघ अडचणीत आला होता; पण संचालक मंडळाने रुकडी येथील खत कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला. त्यामध्ये कंत्राटी कामगार घेऊन खर्चात काटकसर केली. खत कंपन्यांची बिले वेळेत दिल्याने त्यांच्याकडूनही सुमारे आठ ते नऊ लाखांची सूट मिळाली. संघाने बैल छाप दाणेदार व हातमिश्र खत १८:८:१० चे उत्पादन सुरू केले. गुणवत्तेच्या बळावर या खताने शेतकऱ्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण तयार केले. त्यामुळे वर्षभरात आठ हजार टन स्वत:चे खत उत्पादन करू शकलो. पेट्रोल व डिझेल पंपांच्या माध्यमातूनही संघाला चांगले उत्पन्न मिळाले आहे. धान्य, मिरची पूड, मसाले, कडधान्य विभागही सक्षमतेने सुरू आहेत. चार नवीन शाखा सुरू करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सध्या ६० शाखा कार्यरत असून, आगामी काळात हा आकडा शंभरापर्यंत नेण्याचा आमचा मानस असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले. संघाच्या उत्पन्नवाढीत संचालकांबरोबर कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ४५ लाख रुपये अदा केले. संघाच्या अमृतमहोत्सवानिमित्त कर्मचाऱ्यांना वीस दिवसांचा पगार बक्षीस म्हणून दिला आहे. त्याचबरोबर सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप केला आहे. टिंबर मार्केट येथील जागेवर पेट्रोलपंप सुरू केला जाणार आहे. जुने २९ हजार सभासद होते; पण पोटनियम दुरुस्तीनुसार क्रियाशील सभासद तेरा हजारच राहिले आहेत. नवीन सभासदांमुळे १ कोटी २ लाखांचे भागभांडवल झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, आण्णासाहेब चौगुले, जी. डी. पाटील, मारुती पाटील, शशिकांत पाटील, विजयकुमार चौगले, विनोद पाटील, अमरसिंह माने, व्यंकाप्पा भोसले, सुमित्रादेवी शिंदे, व्यवस्थापक आप्पासो निर्मळे उपस्थित होते. सांगली, कऱ्हाडसह कर्नाटकात शाखासंघाचा विस्तार वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी नजीकच्या काळात सांगली, कऱ्हाड, कोगनोळी, सदलगा येथेही शाखा सुरू करून व्यवसाय वृद्धिंगत केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवला होता; पण हा भत्ता पूर्ववत करण्याबाबत विचार सुरू असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार किमान एक हजार ते बाराशे रुपयांनी वाढणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.