शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 17, 2017 01:06 IST

बच्चू कडू यांची टीका : पूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

इचलकरंजी : सन २००६ मध्ये स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाशी निगडित शेतीमालाला बाजारभाव या धोरणाप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने धोरण अवलंबले असते तर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.आमदार बच्चू कडू यांच्या नागपूर ते वडनगर या आसूड यात्रेचे आगमन रविवारी येथे झाले. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले, कॉँग्रेसचे सरकार असो किंवा भाजपचे सरकार असो, उत्पादन खर्चापेक्षा कमी हमीभाव शेतीमालाला देण्याच्या धोरणामुळे शेतकरी नुकसानीत जात आहे. पूर्वी आणि आता असलेल्या दोन्हीही सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. मात्र, आम्ही आसूड यात्रेतून शेतकऱ्यांबरोबर कष्टकरी जनतेमध्येही जनजागरण करीत आहोत. शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढतो आहोत.सरकारकडे घोषणाबाजीशिवाय शेतकऱ्यांना देण्यासाठी काहीही नाही. उलट शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. गतवर्षी १३ हजार रुपयांवर असलेल्या तुरीचे भाव यंदा चार ते पाच हजार रुपये इतके कमी झाले. त्यामुळे एकरी ४० हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. एका अर्थाने सरकार व व्यापारीवर्गाने शेतकऱ्यांची केलेली ही लूट आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या गुजरात राज्यात चार हजार रुपये प्रतिटन उसाला भाव दिला जातो. महाराष्ट्रात मात्र अडीच ते तीन हजार रुपये इतका भाव मिळतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांची झालेली लूट सरकारने आम्हाला परत दिली पाहिजे. ज्यामुळे राज्यातील शेतकरी आपोआपच कर्जमुक्त होऊन स्वत:च्या पायावर निश्चितपणे उभा राहील. आम्ही शेतकऱ्याच्या परिश्रमाचे, त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मागत आहे. म्हणूनच शेतकऱ्याच्या पिकावर उत्पादन खर्चावर किफायतशीर नफा देणारा भाव हवा आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, मोदी सरकारने सबका साथ, सबका विकास म्हणत फक्त मूठभर लोकांचा विकास केला. कॉँग्रेसचे सरकार टाटा, बिर्लाच्या इशाऱ्यावर चालत असे आणि आता मोदींचे सरकार अंबानी-अदानीच्या हातचे बाहुले झाले आहे. पत्रकार परिषदेस आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरेश गडगे, तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आसूड यात्रेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)हेमामालिनींकडून शेतकऱ्यांचा अवमानहेमामालिनी म्हणतात, शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करताहेत. हा अन्नदात्या शेतकरीवर्गाचा अवमान आहे, अशी टीका करून आमदार कडू म्हणाले, हेमामालिनींसह अनेक तथाकथित उच्चभ्रूसुद्धा दारू पितात आणि नाचतात. त्यांच्या कधी आत्महत्या झाल्याचे ऐकिवात आहे का? मग हेमामालिनींकडून शेतकऱ्यांचा अवमान का केला जातो? याचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत.