शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 17, 2017 01:06 IST

बच्चू कडू यांची टीका : पूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

इचलकरंजी : सन २००६ मध्ये स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाशी निगडित शेतीमालाला बाजारभाव या धोरणाप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने धोरण अवलंबले असते तर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.आमदार बच्चू कडू यांच्या नागपूर ते वडनगर या आसूड यात्रेचे आगमन रविवारी येथे झाले. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले, कॉँग्रेसचे सरकार असो किंवा भाजपचे सरकार असो, उत्पादन खर्चापेक्षा कमी हमीभाव शेतीमालाला देण्याच्या धोरणामुळे शेतकरी नुकसानीत जात आहे. पूर्वी आणि आता असलेल्या दोन्हीही सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. मात्र, आम्ही आसूड यात्रेतून शेतकऱ्यांबरोबर कष्टकरी जनतेमध्येही जनजागरण करीत आहोत. शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढतो आहोत.सरकारकडे घोषणाबाजीशिवाय शेतकऱ्यांना देण्यासाठी काहीही नाही. उलट शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. गतवर्षी १३ हजार रुपयांवर असलेल्या तुरीचे भाव यंदा चार ते पाच हजार रुपये इतके कमी झाले. त्यामुळे एकरी ४० हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. एका अर्थाने सरकार व व्यापारीवर्गाने शेतकऱ्यांची केलेली ही लूट आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या गुजरात राज्यात चार हजार रुपये प्रतिटन उसाला भाव दिला जातो. महाराष्ट्रात मात्र अडीच ते तीन हजार रुपये इतका भाव मिळतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांची झालेली लूट सरकारने आम्हाला परत दिली पाहिजे. ज्यामुळे राज्यातील शेतकरी आपोआपच कर्जमुक्त होऊन स्वत:च्या पायावर निश्चितपणे उभा राहील. आम्ही शेतकऱ्याच्या परिश्रमाचे, त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मागत आहे. म्हणूनच शेतकऱ्याच्या पिकावर उत्पादन खर्चावर किफायतशीर नफा देणारा भाव हवा आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, मोदी सरकारने सबका साथ, सबका विकास म्हणत फक्त मूठभर लोकांचा विकास केला. कॉँग्रेसचे सरकार टाटा, बिर्लाच्या इशाऱ्यावर चालत असे आणि आता मोदींचे सरकार अंबानी-अदानीच्या हातचे बाहुले झाले आहे. पत्रकार परिषदेस आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरेश गडगे, तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आसूड यात्रेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)हेमामालिनींकडून शेतकऱ्यांचा अवमानहेमामालिनी म्हणतात, शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करताहेत. हा अन्नदात्या शेतकरीवर्गाचा अवमान आहे, अशी टीका करून आमदार कडू म्हणाले, हेमामालिनींसह अनेक तथाकथित उच्चभ्रूसुद्धा दारू पितात आणि नाचतात. त्यांच्या कधी आत्महत्या झाल्याचे ऐकिवात आहे का? मग हेमामालिनींकडून शेतकऱ्यांचा अवमान का केला जातो? याचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत.