शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 17, 2017 01:06 IST

बच्चू कडू यांची टीका : पूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

इचलकरंजी : सन २००६ मध्ये स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाशी निगडित शेतीमालाला बाजारभाव या धोरणाप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने धोरण अवलंबले असते तर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.आमदार बच्चू कडू यांच्या नागपूर ते वडनगर या आसूड यात्रेचे आगमन रविवारी येथे झाले. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले, कॉँग्रेसचे सरकार असो किंवा भाजपचे सरकार असो, उत्पादन खर्चापेक्षा कमी हमीभाव शेतीमालाला देण्याच्या धोरणामुळे शेतकरी नुकसानीत जात आहे. पूर्वी आणि आता असलेल्या दोन्हीही सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. मात्र, आम्ही आसूड यात्रेतून शेतकऱ्यांबरोबर कष्टकरी जनतेमध्येही जनजागरण करीत आहोत. शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढतो आहोत.सरकारकडे घोषणाबाजीशिवाय शेतकऱ्यांना देण्यासाठी काहीही नाही. उलट शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. गतवर्षी १३ हजार रुपयांवर असलेल्या तुरीचे भाव यंदा चार ते पाच हजार रुपये इतके कमी झाले. त्यामुळे एकरी ४० हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. एका अर्थाने सरकार व व्यापारीवर्गाने शेतकऱ्यांची केलेली ही लूट आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या गुजरात राज्यात चार हजार रुपये प्रतिटन उसाला भाव दिला जातो. महाराष्ट्रात मात्र अडीच ते तीन हजार रुपये इतका भाव मिळतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांची झालेली लूट सरकारने आम्हाला परत दिली पाहिजे. ज्यामुळे राज्यातील शेतकरी आपोआपच कर्जमुक्त होऊन स्वत:च्या पायावर निश्चितपणे उभा राहील. आम्ही शेतकऱ्याच्या परिश्रमाचे, त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मागत आहे. म्हणूनच शेतकऱ्याच्या पिकावर उत्पादन खर्चावर किफायतशीर नफा देणारा भाव हवा आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, मोदी सरकारने सबका साथ, सबका विकास म्हणत फक्त मूठभर लोकांचा विकास केला. कॉँग्रेसचे सरकार टाटा, बिर्लाच्या इशाऱ्यावर चालत असे आणि आता मोदींचे सरकार अंबानी-अदानीच्या हातचे बाहुले झाले आहे. पत्रकार परिषदेस आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरेश गडगे, तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आसूड यात्रेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)हेमामालिनींकडून शेतकऱ्यांचा अवमानहेमामालिनी म्हणतात, शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करताहेत. हा अन्नदात्या शेतकरीवर्गाचा अवमान आहे, अशी टीका करून आमदार कडू म्हणाले, हेमामालिनींसह अनेक तथाकथित उच्चभ्रूसुद्धा दारू पितात आणि नाचतात. त्यांच्या कधी आत्महत्या झाल्याचे ऐकिवात आहे का? मग हेमामालिनींकडून शेतकऱ्यांचा अवमान का केला जातो? याचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत.