दरम्यान, आंदोलनाच्या सुरुवातीलाच सहाय्यक अभियंता शरद संकपाळ यांनी आंदोलकांशी चर्चा करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. तानाजी स्वामी म्हणाले, महापुरामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. पूर ओसरून बरेच दिवस झाले, मात्र अद्यापही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. यासंदर्भात सातत्याने महावितरण कार्यालयाकडे पाठपुरावा करून दुरुस्तीची मागणी केली. पण तो झाला नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली. उद्या ट्रान्सफॉर्मर देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करीत असून, तो नाही मिळाला तर पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. संकपाळ म्हणाले, गेल्या आठवड्यात ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी जयसिंगपूर कार्यालयाकडे पाठविले आहेत. उद्या ते मिळतील. त्यानंतर संस्थेचा वीजपुरवठा पूर्ववत करून देण्यात येईल. यावेळी प्रा. दत्तात्रय पाटील, एम.डी. पाटील, विष्णुपंत पाटील, संभाजी यादव, भीमराव पाटील, सचिव निवास पाटील उपस्थित होते.