शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी कंपन्या उभाराव्यात

By admin | Updated: October 3, 2015 01:15 IST

राजू शेट्टी यांचे आवाहन : डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन

नवे पारगाव : शेतीच्या उत्पादित मालाचा ग्राहक हा शेतकरी असूनही त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होते. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पातळीवर शेती माल उत्पादन कंपन्या सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अंबप येथे राजेंद्र हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या सभेत खासदार राजू शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, डी. वाय. पाटील एज्युकेशनच्या वतीने सुरू असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे शोध-संशोधन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भर घालतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, विभाजन कुटुंब संस्कृतीमुळे शेतीचे तुकडे झाले असल्याने बदलत्या काळाप्रमाणे बदल करून ‘एकत्रित समूह शेती’ पद्धती सुरू करावी. यामुळे उत्पादन खर्च व कष्ट यांची बचत होऊन शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी स्वागत केले. सरपंच विश्वनाथ पाटील, बाळासाहेब माने शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी मनोगत व्यक्त केले. तळसंदेच्या सीम बायोटेकचे व्यवस्थापक गुलाबराव धुमाळ यांनी ‘केळी पीक व्यवस्थापन’ तर पुण्याच्या नेटाफीम इरिगेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख यांनी आपत्कालीन स्थितीत ऊस शेती मधील ठिबक सिंचन व खत व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी प्रदर्शनातील स्टॉलमधून शेतकऱ्यांनी माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जाधव, तालुका कृषी अधिकारी देवकर, अंबपचे उपसरपंच अल्लाबक्ष मुल्ला, माजी सरपंच उषाताई माने, मनपाडळेचे माजी सरपंच राजेंद्र पाटील, अंबपवाडीच्या सरपंच मीनाताई खोत, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव कांबळे, शिवाजी माने, स्वाभिमानीचे विभाग प्रमुख संपतराव पोवार, घुणकीचे माजी उपसरपंच जयसिंग कुरणे, शिवाजी शिंदे, सुधीर मगदूम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुधि सूर्यगंध यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक पाटील यांनी आभार मानले.