शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

शेतकऱ्यांनी कंपन्या उभाराव्यात

By admin | Updated: October 3, 2015 01:15 IST

राजू शेट्टी यांचे आवाहन : डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन

नवे पारगाव : शेतीच्या उत्पादित मालाचा ग्राहक हा शेतकरी असूनही त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होते. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पातळीवर शेती माल उत्पादन कंपन्या सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अंबप येथे राजेंद्र हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या सभेत खासदार राजू शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, डी. वाय. पाटील एज्युकेशनच्या वतीने सुरू असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे शोध-संशोधन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भर घालतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, विभाजन कुटुंब संस्कृतीमुळे शेतीचे तुकडे झाले असल्याने बदलत्या काळाप्रमाणे बदल करून ‘एकत्रित समूह शेती’ पद्धती सुरू करावी. यामुळे उत्पादन खर्च व कष्ट यांची बचत होऊन शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी स्वागत केले. सरपंच विश्वनाथ पाटील, बाळासाहेब माने शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी मनोगत व्यक्त केले. तळसंदेच्या सीम बायोटेकचे व्यवस्थापक गुलाबराव धुमाळ यांनी ‘केळी पीक व्यवस्थापन’ तर पुण्याच्या नेटाफीम इरिगेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख यांनी आपत्कालीन स्थितीत ऊस शेती मधील ठिबक सिंचन व खत व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी प्रदर्शनातील स्टॉलमधून शेतकऱ्यांनी माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जाधव, तालुका कृषी अधिकारी देवकर, अंबपचे उपसरपंच अल्लाबक्ष मुल्ला, माजी सरपंच उषाताई माने, मनपाडळेचे माजी सरपंच राजेंद्र पाटील, अंबपवाडीच्या सरपंच मीनाताई खोत, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव कांबळे, शिवाजी माने, स्वाभिमानीचे विभाग प्रमुख संपतराव पोवार, घुणकीचे माजी उपसरपंच जयसिंग कुरणे, शिवाजी शिंदे, सुधीर मगदूम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुधि सूर्यगंध यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक पाटील यांनी आभार मानले.