शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

पावसाने उडविली शेतकºयांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 16:06 IST

गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकºयांची अक्षरशा दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठावरील ऊसाच्या आडसाल लागणी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भात पिकांने तर जमिनीवर लोटांगण घातले आहे. सोयाबीन पिकात पाणी उभे राहिले आणि शेंगाना पाणी लागल्याने कोंब सुटण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या आडसाल लागणी पाण्याखाली भात पिकांचे जमिनीवर लोटांगणसोयाबीनच्या शेंगा झाल्या काळ्याशेतकरी सापडला चांगलाच अडचणीत

कोल्हापूर : गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकºयांची अक्षरशा दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठावरील ऊसाच्या आडसाल लागणी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भात पिकांने तर जमिनीवर लोटांगण घातले आहे. सोयाबीन पिकात पाणी उभे राहिले आणि शेंगाना पाणी लागल्याने कोंब सुटण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यात जुलै, आॅगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाच्या आडसाल लागणी केल्या जातात. विशेषता नदी बुडीत क्षेत्रात पुराचे पाणी येऊन गेल्यानंतर लागणीस गती येते. सप्टेंबर, आॅक्टोबर मध्ये जरी जोरदार पाऊस होत असला तरी तो एक सारखा आठ दिवस बसत नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे नदी काठावर प्रामुख्याने ऊसाची आडसाल लागणच केली जाते. यंदा मात्र शेतकºयांचा अंदाज चुकला असून गेले चार दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे.

धरणक्षेत्रातही धुवांदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याची फुग नद्यांना दिसत असून पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पाण्यामुळे ऊसाच्या लागणी अडचणीत आल्या आहेत. ऊसाची रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. नदी काठावरीलच लागणी अडचणीत आल्या असे नाहीतर इतर रानातीलही लागणीमध्ये पाणी तुबंले आहे.

भात पिक परिपक्व झाले आहे. लोबं भरल्याने अगोदरच भाताला वजन पेलणे अवघड झाले आहे, त्यात एक सारखा पाऊस सुरू असल्याने भात लगेच जमिनीवर आडवे होत आहे. लोंब पाण्यात भिजल्याने त्यांना कोंब येण्यास सुरूवात झाली आहे. सोयाबीनची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. सोयाबीनची पाने व शेंगा पिवळी धमक झाली आहेत. डोक्यावर पाऊस आणि सरीत पाणी असल्याने सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडू लागल्या आहेत.

ऊसपिकही आडवे

हा पाऊस ऊस पिकाच्या वाढीस उपयुक्त असला तरी मोठ्या ऊसाचे नुकसानही तेवढेच होत आहे. जोरदार वाहणारे वाºयामुळे ऊस जमिनीवर आडवे झाले आहेत. त्यामुळे या ऊसाचे वजन घटण्याची भिती व्यक्त केली जात आहे.