शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

पावसाने उडविली शेतकºयांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 16:06 IST

गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकºयांची अक्षरशा दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठावरील ऊसाच्या आडसाल लागणी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भात पिकांने तर जमिनीवर लोटांगण घातले आहे. सोयाबीन पिकात पाणी उभे राहिले आणि शेंगाना पाणी लागल्याने कोंब सुटण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या आडसाल लागणी पाण्याखाली भात पिकांचे जमिनीवर लोटांगणसोयाबीनच्या शेंगा झाल्या काळ्याशेतकरी सापडला चांगलाच अडचणीत

कोल्हापूर : गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकºयांची अक्षरशा दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठावरील ऊसाच्या आडसाल लागणी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भात पिकांने तर जमिनीवर लोटांगण घातले आहे. सोयाबीन पिकात पाणी उभे राहिले आणि शेंगाना पाणी लागल्याने कोंब सुटण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यात जुलै, आॅगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाच्या आडसाल लागणी केल्या जातात. विशेषता नदी बुडीत क्षेत्रात पुराचे पाणी येऊन गेल्यानंतर लागणीस गती येते. सप्टेंबर, आॅक्टोबर मध्ये जरी जोरदार पाऊस होत असला तरी तो एक सारखा आठ दिवस बसत नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे नदी काठावर प्रामुख्याने ऊसाची आडसाल लागणच केली जाते. यंदा मात्र शेतकºयांचा अंदाज चुकला असून गेले चार दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे.

धरणक्षेत्रातही धुवांदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याची फुग नद्यांना दिसत असून पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पाण्यामुळे ऊसाच्या लागणी अडचणीत आल्या आहेत. ऊसाची रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. नदी काठावरीलच लागणी अडचणीत आल्या असे नाहीतर इतर रानातीलही लागणीमध्ये पाणी तुबंले आहे.

भात पिक परिपक्व झाले आहे. लोबं भरल्याने अगोदरच भाताला वजन पेलणे अवघड झाले आहे, त्यात एक सारखा पाऊस सुरू असल्याने भात लगेच जमिनीवर आडवे होत आहे. लोंब पाण्यात भिजल्याने त्यांना कोंब येण्यास सुरूवात झाली आहे. सोयाबीनची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. सोयाबीनची पाने व शेंगा पिवळी धमक झाली आहेत. डोक्यावर पाऊस आणि सरीत पाणी असल्याने सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडू लागल्या आहेत.

ऊसपिकही आडवे

हा पाऊस ऊस पिकाच्या वाढीस उपयुक्त असला तरी मोठ्या ऊसाचे नुकसानही तेवढेच होत आहे. जोरदार वाहणारे वाºयामुळे ऊस जमिनीवर आडवे झाले आहेत. त्यामुळे या ऊसाचे वजन घटण्याची भिती व्यक्त केली जात आहे.