शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पावसाने उडविली शेतकºयांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 16:06 IST

गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकºयांची अक्षरशा दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठावरील ऊसाच्या आडसाल लागणी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भात पिकांने तर जमिनीवर लोटांगण घातले आहे. सोयाबीन पिकात पाणी उभे राहिले आणि शेंगाना पाणी लागल्याने कोंब सुटण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या आडसाल लागणी पाण्याखाली भात पिकांचे जमिनीवर लोटांगणसोयाबीनच्या शेंगा झाल्या काळ्याशेतकरी सापडला चांगलाच अडचणीत

कोल्हापूर : गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकºयांची अक्षरशा दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठावरील ऊसाच्या आडसाल लागणी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भात पिकांने तर जमिनीवर लोटांगण घातले आहे. सोयाबीन पिकात पाणी उभे राहिले आणि शेंगाना पाणी लागल्याने कोंब सुटण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यात जुलै, आॅगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाच्या आडसाल लागणी केल्या जातात. विशेषता नदी बुडीत क्षेत्रात पुराचे पाणी येऊन गेल्यानंतर लागणीस गती येते. सप्टेंबर, आॅक्टोबर मध्ये जरी जोरदार पाऊस होत असला तरी तो एक सारखा आठ दिवस बसत नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे नदी काठावर प्रामुख्याने ऊसाची आडसाल लागणच केली जाते. यंदा मात्र शेतकºयांचा अंदाज चुकला असून गेले चार दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे.

धरणक्षेत्रातही धुवांदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याची फुग नद्यांना दिसत असून पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पाण्यामुळे ऊसाच्या लागणी अडचणीत आल्या आहेत. ऊसाची रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. नदी काठावरीलच लागणी अडचणीत आल्या असे नाहीतर इतर रानातीलही लागणीमध्ये पाणी तुबंले आहे.

भात पिक परिपक्व झाले आहे. लोबं भरल्याने अगोदरच भाताला वजन पेलणे अवघड झाले आहे, त्यात एक सारखा पाऊस सुरू असल्याने भात लगेच जमिनीवर आडवे होत आहे. लोंब पाण्यात भिजल्याने त्यांना कोंब येण्यास सुरूवात झाली आहे. सोयाबीनची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. सोयाबीनची पाने व शेंगा पिवळी धमक झाली आहेत. डोक्यावर पाऊस आणि सरीत पाणी असल्याने सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडू लागल्या आहेत.

ऊसपिकही आडवे

हा पाऊस ऊस पिकाच्या वाढीस उपयुक्त असला तरी मोठ्या ऊसाचे नुकसानही तेवढेच होत आहे. जोरदार वाहणारे वाºयामुळे ऊस जमिनीवर आडवे झाले आहेत. त्यामुळे या ऊसाचे वजन घटण्याची भिती व्यक्त केली जात आहे.