शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

नागपूर-रत्नागिरी मार्गाच्या बायपास रेखांकनास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

नागपूर-रत्नागिरी महामार्ग क्र. १६६ हा २०१७ च्या रेखांकनात केर्ली येथील वडगाव पाणंदमधून थेट कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाला जोडला जाणार होता. दरम्यान, ...

नागपूर-रत्नागिरी महामार्ग क्र. १६६ हा २०१७ च्या रेखांकनात केर्ली येथील वडगाव पाणंदमधून थेट कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाला जोडला जाणार होता. दरम्यान, परिसरातील राजकीय हस्तक्षेप आणि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पूर्वीचे रेखांकन रद्द केले. केर्ले गावाला बायपास आणि पर्यायी मार्ग म्हणून वडगाव पाणंद, हनुमान हायस्कूल (केर्ले)ते नलवडे बंगला (पडवळवाडी) असा साडेपाच किलोमीटरच्या रेखांकनाचा प्रस्ताव निश्चित केला. संबधित शेतकरी आणि नागरिकांनी बायपास रेखांकन रद्द होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाद मागितली होती; परंतु २१ जून २०२१ रोजी बायपासच्या अमान्य रेखांकनात शेतकऱ्यांनी अडथळा आणून रेखांकनाचे काम बंद पाडले. मंगळवारी सरकारी यंत्रणेने पूर्वकल्पना न देताच करवीर पोलिसांच्या फौजफाट्यासह मोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात दिवसभर रेखांकन चालू ठेवले. साडेपाच किलोमीटरच्या मार्गात येणारी दोनशे शेतकऱ्यांची शेकडो एकर बागायत जमीन, विहीर, कूपनलिका चाळीसहून अधिक पक्की घरे साडेपाच किलोमीटरच्या मार्गात जाणार आहे. त्यामुळे मोजणीच्या ठिकाणी महिला व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून नियोजित आराखडा बदण्याची विनंती प्रशासनास केली. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे न फिरकल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.

कोट : २०१७ च्या रेखांकन प्रस्तावाला शेतकऱ्यांचा विरोध व लोकप्रतिधींच्या हस्तक्षपामुळे जुने रेखांकन रद्द केले. त्याला पर्याय आणि केर्ले गावाला बायपास म्हणून नवीन रेखांकनाच्या पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने त्यानुसार रेखांकनाची प्रक्रिया सुरू आहे. रेखांकनात शेती, घरे जाणाऱ्यांना शासन नियमानुसार मोबदला मिळणार आहे.

-वसंत पंदरकर, प्रकल्प संचालक, कोल्हापूर

कोट-

राजकीय हस्तक्षेपामुळे पूर्वीच्या मोजणीत बदल करून बायपासची मोजणी आमच्यावर अन्यायकारक आहे. नियोजित महामार्गात आमची घरेदारे, शेती, जमीन जात असल्याने आम्ही रस्त्यावर येणार आहे. ही मोजणी पोलीस बंदोबस्तात बळाचा वापर करून करत आहेत.

-शिवाजी गायकवाड, शेतकरी, केर्ले