शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘क्षारपड’मुक्तीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

By admin | Updated: March 14, 2017 21:34 IST

स्वखर्चातून प्रयत्न : चिंचवाडमधील सात शेतकऱ्यांचा उपक्रम

संतोष बामणे --जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यात शेतजमिनी क्षारपड झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत ‘शासनाचे काम आणि सहा महिने थांब’ याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला असून, शासकीय निधीची वाट न पाहता चिंचवाड (ता. शिरोळ) येथील सात शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सुमारे १३ एकर शेती स्वत:च्या खर्चातून क्षारपडमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाला आतातरी जाग येणार का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. सिमेंटची जंगले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात सुमारे ३० टक्के जमीन क्षारपडयुक्त आहे. सोन्यासारखी पिके येणारी शेती क्षारपडयुक्त बनल्यामुळे तीन-चार एकर शेताचा मालकही मोलमजुरी करून आपल्या जीवनाचा गाडा चालवित आहे. त्यातच शिरोळ तालुक्यातील शिरोळ, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, हसूर, शिरटी, तेरवाड, मजरेवाडी, अकिवाट, सैनिक टाकळी, राजापूर, खिद्रापूर, दानवाड, दत्तवाड यासह अनेक गावांत मोठ्या प्रमाणात क्षारपड झालेल्या जमिनी पडिक आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्याकडे क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी निधी मागणी करीत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींकडून निधी मंजूर होतो. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे क्षारपड जमीनधारकांना आपले चारित्र्य चालविणे कठीण बनत आहे. त्यामुळे चिंचवाड येथील मनोहर गोधडे, दिलीप पाटोळे, अजित मिरजे, आण्णासाहेब शिरगावे, कुमार शिरगावे, अजित चौगुले, नाभिराज चौगुले यांनी आपल्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी स्वखर्चातून काम सुरू केले आहे. यामध्ये प्रथमत: सुमारे १३ एकर जमीनक्षेत्र क्षारपड निवडली असून, यामध्ये प्रति एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येत आहे. तर कॉन्ट्रॅक्टरद्वारे क्षारपड जमिनीत सछिद्र पाईपलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. या परिसरात जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या फंडातून चिंचवाड, उदगाव गावच्या परिसरात ड्रेनेजचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे याठिकाणी होत असलेल्या कामाला या ड्रेनेजचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा प्रयत्नशासनाने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी विविध जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अर्धा एकर, एक एकरच्या शेतकऱ्यांना शासनाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे चिंचवाड येथे स्वखर्चातून क्षारपड जमीन सुधारण्यासाठी चिंचवाडच्या शेतकऱ्यांनी उपक्रम हाती घेतला आहे. स्वतंत्र निधीची गरज क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शासनाने जमीन मालकाला स्वतंत्र निधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी उर्वरीत पैसे घालून आपल्या क्षारपड जमिनी सुधारू शकेल व शासनाचा थेट निधी शेतकऱ्याला मिळेल. यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.