शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

‘क्षारपड’मुक्तीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

By admin | Updated: March 14, 2017 21:34 IST

स्वखर्चातून प्रयत्न : चिंचवाडमधील सात शेतकऱ्यांचा उपक्रम

संतोष बामणे --जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यात शेतजमिनी क्षारपड झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत ‘शासनाचे काम आणि सहा महिने थांब’ याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला असून, शासकीय निधीची वाट न पाहता चिंचवाड (ता. शिरोळ) येथील सात शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सुमारे १३ एकर शेती स्वत:च्या खर्चातून क्षारपडमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाला आतातरी जाग येणार का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. सिमेंटची जंगले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात सुमारे ३० टक्के जमीन क्षारपडयुक्त आहे. सोन्यासारखी पिके येणारी शेती क्षारपडयुक्त बनल्यामुळे तीन-चार एकर शेताचा मालकही मोलमजुरी करून आपल्या जीवनाचा गाडा चालवित आहे. त्यातच शिरोळ तालुक्यातील शिरोळ, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, हसूर, शिरटी, तेरवाड, मजरेवाडी, अकिवाट, सैनिक टाकळी, राजापूर, खिद्रापूर, दानवाड, दत्तवाड यासह अनेक गावांत मोठ्या प्रमाणात क्षारपड झालेल्या जमिनी पडिक आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्याकडे क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी निधी मागणी करीत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींकडून निधी मंजूर होतो. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे क्षारपड जमीनधारकांना आपले चारित्र्य चालविणे कठीण बनत आहे. त्यामुळे चिंचवाड येथील मनोहर गोधडे, दिलीप पाटोळे, अजित मिरजे, आण्णासाहेब शिरगावे, कुमार शिरगावे, अजित चौगुले, नाभिराज चौगुले यांनी आपल्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी स्वखर्चातून काम सुरू केले आहे. यामध्ये प्रथमत: सुमारे १३ एकर जमीनक्षेत्र क्षारपड निवडली असून, यामध्ये प्रति एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येत आहे. तर कॉन्ट्रॅक्टरद्वारे क्षारपड जमिनीत सछिद्र पाईपलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. या परिसरात जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या फंडातून चिंचवाड, उदगाव गावच्या परिसरात ड्रेनेजचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे याठिकाणी होत असलेल्या कामाला या ड्रेनेजचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा प्रयत्नशासनाने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी विविध जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अर्धा एकर, एक एकरच्या शेतकऱ्यांना शासनाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे चिंचवाड येथे स्वखर्चातून क्षारपड जमीन सुधारण्यासाठी चिंचवाडच्या शेतकऱ्यांनी उपक्रम हाती घेतला आहे. स्वतंत्र निधीची गरज क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शासनाने जमीन मालकाला स्वतंत्र निधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी उर्वरीत पैसे घालून आपल्या क्षारपड जमिनी सुधारू शकेल व शासनाचा थेट निधी शेतकऱ्याला मिळेल. यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.