शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘क्षारपड’मुक्तीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

By admin | Updated: March 14, 2017 21:34 IST

स्वखर्चातून प्रयत्न : चिंचवाडमधील सात शेतकऱ्यांचा उपक्रम

संतोष बामणे --जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यात शेतजमिनी क्षारपड झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत ‘शासनाचे काम आणि सहा महिने थांब’ याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला असून, शासकीय निधीची वाट न पाहता चिंचवाड (ता. शिरोळ) येथील सात शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सुमारे १३ एकर शेती स्वत:च्या खर्चातून क्षारपडमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाला आतातरी जाग येणार का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. सिमेंटची जंगले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात सुमारे ३० टक्के जमीन क्षारपडयुक्त आहे. सोन्यासारखी पिके येणारी शेती क्षारपडयुक्त बनल्यामुळे तीन-चार एकर शेताचा मालकही मोलमजुरी करून आपल्या जीवनाचा गाडा चालवित आहे. त्यातच शिरोळ तालुक्यातील शिरोळ, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, हसूर, शिरटी, तेरवाड, मजरेवाडी, अकिवाट, सैनिक टाकळी, राजापूर, खिद्रापूर, दानवाड, दत्तवाड यासह अनेक गावांत मोठ्या प्रमाणात क्षारपड झालेल्या जमिनी पडिक आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्याकडे क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी निधी मागणी करीत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींकडून निधी मंजूर होतो. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे क्षारपड जमीनधारकांना आपले चारित्र्य चालविणे कठीण बनत आहे. त्यामुळे चिंचवाड येथील मनोहर गोधडे, दिलीप पाटोळे, अजित मिरजे, आण्णासाहेब शिरगावे, कुमार शिरगावे, अजित चौगुले, नाभिराज चौगुले यांनी आपल्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी स्वखर्चातून काम सुरू केले आहे. यामध्ये प्रथमत: सुमारे १३ एकर जमीनक्षेत्र क्षारपड निवडली असून, यामध्ये प्रति एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येत आहे. तर कॉन्ट्रॅक्टरद्वारे क्षारपड जमिनीत सछिद्र पाईपलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. या परिसरात जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या फंडातून चिंचवाड, उदगाव गावच्या परिसरात ड्रेनेजचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे याठिकाणी होत असलेल्या कामाला या ड्रेनेजचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा प्रयत्नशासनाने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी विविध जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अर्धा एकर, एक एकरच्या शेतकऱ्यांना शासनाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे चिंचवाड येथे स्वखर्चातून क्षारपड जमीन सुधारण्यासाठी चिंचवाडच्या शेतकऱ्यांनी उपक्रम हाती घेतला आहे. स्वतंत्र निधीची गरज क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शासनाने जमीन मालकाला स्वतंत्र निधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी उर्वरीत पैसे घालून आपल्या क्षारपड जमिनी सुधारू शकेल व शासनाचा थेट निधी शेतकऱ्याला मिळेल. यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.