शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षे ५९ कोटी एफआरपीच्या प्रतीक्षेत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची एफआरपी देणे बंधनकारक असले तरी कोल्हापूर विभागातील हजारो ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची एफआरपी देणे बंधनकारक असले तरी कोल्हापूर विभागातील हजारो शेतकऱ्यांचे गेली सात वर्षे ५९ कोटी ७ लाख एफआरपीचे पैसे अडकले आहेत. सहा कारखान्यांपैकी काही बंद असले तरी त्यांच्यावर आरआरसीची कारवाई झाली खरी; मात्र शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. मुळात ही कारवाईच कुचकामी असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उसाच्या निश्चित केलेल्या दरानुसार पैसे चौदा दिवसांत देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटनांकडून सातत्याने रेटा लावलेला असतो. मात्र, कोल्हापूर विभागातील सहा कारखान्यांकडे सात वर्षांपासून एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दौलत’, ‘आजरा’ तर सांगली जिल्ह्यातील वसंतदादा’, ‘महाकाली’, ‘माणगंगा’, केन ॲग्रो (डोंगराई) या कारखान्यांचा समावेश आहे. ‘दौलत’च्या शेतकऱ्यांचे २०११-१२ हंगामापासून १८ कोटी ११ लाख रुपये अडकले आहेत. आजरा कारखान्याची २०१८-१९ पासून १५ कोटी ४६ लाख रुपये देय एफआरपी आहे. उर्वरित चार कारखान्यांकडे २५ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत.

या प्रत्येक कारखान्यावर ‘आरआरसी’ची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे. वास्तविक त्या हंगामातील साखर जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे भागवणे अपेक्षित असते. साखर विक्रीतूनही शेतकऱ्यांची देणी पूर्ण झाली नाही, तर कारखान्याची स्थावर मालमत्ता विक्री करून पैसे द्यावेत, अशी ‘आरआरसी’ची कारवाई अपेक्षित आहे. मात्र, सात वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रलंबित असणारी एफआरपीची रक्कम पाहता, ही कारवाईही कुचकामी ठरल्याचे स्पष्ट होते. केवळ कागदी घोडे नाचवायचे आणि वेळ मारून नेण्याचा प्रकारच येथे घडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

कारखानानिहाय थकीत एफआरपी-

कारखाना हंगाम थकीत

दौलत २०११-१२ १८.११ कोटी

आजरा २०१८-१९ १५.४६ कोटी

वसंतदादा २०१३-१४ ५.५४ कोटी

महाकाली २०१८-१९ ७.९७ कोटी

माणगंगा २०१८-१९ ३.३२ कोटी

केन ॲग्रो २०१८-१९ ८.६५ कोटी

कोट-

संघटनांनी आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी कारवाई करायची आणि ती कारवाई कागदावर राहणार असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे? जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की नाही? थकीत एफआरपीबाबत पुन्हा आंदोलन हातात घ्यावे लागेल.

- प्रा. जालंदर पाटील (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)