शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

सात वर्षे ५९ कोटी एफआरपीच्या प्रतीक्षेत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची एफआरपी देणे बंधनकारक असले तरी कोल्हापूर विभागातील हजारो ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची एफआरपी देणे बंधनकारक असले तरी कोल्हापूर विभागातील हजारो शेतकऱ्यांचे गेली सात वर्षे ५९ कोटी ७ लाख एफआरपीचे पैसे अडकले आहेत. सहा कारखान्यांपैकी काही बंद असले तरी त्यांच्यावर आरआरसीची कारवाई झाली खरी; मात्र शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. मुळात ही कारवाईच कुचकामी असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उसाच्या निश्चित केलेल्या दरानुसार पैसे चौदा दिवसांत देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटनांकडून सातत्याने रेटा लावलेला असतो. मात्र, कोल्हापूर विभागातील सहा कारखान्यांकडे सात वर्षांपासून एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दौलत’, ‘आजरा’ तर सांगली जिल्ह्यातील वसंतदादा’, ‘महाकाली’, ‘माणगंगा’, केन ॲग्रो (डोंगराई) या कारखान्यांचा समावेश आहे. ‘दौलत’च्या शेतकऱ्यांचे २०११-१२ हंगामापासून १८ कोटी ११ लाख रुपये अडकले आहेत. आजरा कारखान्याची २०१८-१९ पासून १५ कोटी ४६ लाख रुपये देय एफआरपी आहे. उर्वरित चार कारखान्यांकडे २५ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत.

या प्रत्येक कारखान्यावर ‘आरआरसी’ची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे. वास्तविक त्या हंगामातील साखर जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे भागवणे अपेक्षित असते. साखर विक्रीतूनही शेतकऱ्यांची देणी पूर्ण झाली नाही, तर कारखान्याची स्थावर मालमत्ता विक्री करून पैसे द्यावेत, अशी ‘आरआरसी’ची कारवाई अपेक्षित आहे. मात्र, सात वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रलंबित असणारी एफआरपीची रक्कम पाहता, ही कारवाईही कुचकामी ठरल्याचे स्पष्ट होते. केवळ कागदी घोडे नाचवायचे आणि वेळ मारून नेण्याचा प्रकारच येथे घडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

कारखानानिहाय थकीत एफआरपी-

कारखाना हंगाम थकीत

दौलत २०११-१२ १८.११ कोटी

आजरा २०१८-१९ १५.४६ कोटी

वसंतदादा २०१३-१४ ५.५४ कोटी

महाकाली २०१८-१९ ७.९७ कोटी

माणगंगा २०१८-१९ ३.३२ कोटी

केन ॲग्रो २०१८-१९ ८.६५ कोटी

कोट-

संघटनांनी आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी कारवाई करायची आणि ती कारवाई कागदावर राहणार असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे? जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की नाही? थकीत एफआरपीबाबत पुन्हा आंदोलन हातात घ्यावे लागेल.

- प्रा. जालंदर पाटील (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)