शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरची लढाई

By admin | Updated: April 16, 2017 01:02 IST

राजू शेट्टी यांची घोषणा : कोल्हापुरात ४ मे रोजी मोर्चा; आश्वासने न पाळल्याने पवित्रा

जयसिंगपूर : मागील एक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करीत आहे. शेतकरी कर्जमुक्तीवरून संघटना आता रस्त्यावरची लढाई करणार आहे. सात-बारा कोरा होईपर्यंत संघर्ष करणारच असून, ४ मे रोजी कोल्हापूरला मोर्चा काढून पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहे. शेतकऱ्यांना नव्याने उभे करायचे तर कर्जमुक्त करणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला दीडटप हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने कर्जमुक्ती ही चळवळ आता आंदोलनाच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या या लढाईत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.जयसिंगपूर येथे शनिवारी सिद्धेश्वर यात्री निवासमध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. यावेळी उसाचा दुसरा हप्ता व शेतकरी कर्जमुक्त रॅली नियोजन याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व पराभूत झालेल्या उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, कर्जमुक्तीचे शेतकरी हक्कदार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतीमालातून जवळपास १२ ते १३ लाख कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याला शासनच जबाबदार आहे. उद्योगपतींना दिलेली कर्जे बुडत असताना शेतजमिनी तारण ठेवून शेतकऱ्यांनी कर्जे घेतलेली आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाल्याशिवाय शांत बसणार नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे एकूण कर्ज १० लाख कोटींच्या आसपास आहे. ते माफ करायला पाहिजे. शेतकरी कर्जमुक्ती रॅली ही फक्त सुरुवात आहे.आण्णासाहेब चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी वैभव कांबळे, आदिनाथ हेमगिरे, चंदगडचे पं. स. सभापती जगन्नाथ हुलजी, आण्णासाहेब लठ्ठे, विठ्ठल मोरे, सागर शंभुशेटे, डॉ. श्रीवर्धन पाटील, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, महिला बाल कल्याण सभापती शुभांगी शिंदे, राजेंद्र गड्यान्नावर, सावकर मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास डॉ. महावीर अक्कोळे, मिलिंद साखरपे, आदी उपस्थित होते. नगरसेवक शैलेश चौगुले यांनी आभार मानले.जयसिंगपूर येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार राजू शेट्टी. यावेळी व्यासपीठावर आण्णासाहेब चौगुले, सुरेश कांबळे, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.