शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरची लढाई

By admin | Updated: April 16, 2017 01:02 IST

राजू शेट्टी यांची घोषणा : कोल्हापुरात ४ मे रोजी मोर्चा; आश्वासने न पाळल्याने पवित्रा

जयसिंगपूर : मागील एक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करीत आहे. शेतकरी कर्जमुक्तीवरून संघटना आता रस्त्यावरची लढाई करणार आहे. सात-बारा कोरा होईपर्यंत संघर्ष करणारच असून, ४ मे रोजी कोल्हापूरला मोर्चा काढून पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहे. शेतकऱ्यांना नव्याने उभे करायचे तर कर्जमुक्त करणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला दीडटप हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने कर्जमुक्ती ही चळवळ आता आंदोलनाच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या या लढाईत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.जयसिंगपूर येथे शनिवारी सिद्धेश्वर यात्री निवासमध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. यावेळी उसाचा दुसरा हप्ता व शेतकरी कर्जमुक्त रॅली नियोजन याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व पराभूत झालेल्या उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, कर्जमुक्तीचे शेतकरी हक्कदार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतीमालातून जवळपास १२ ते १३ लाख कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याला शासनच जबाबदार आहे. उद्योगपतींना दिलेली कर्जे बुडत असताना शेतजमिनी तारण ठेवून शेतकऱ्यांनी कर्जे घेतलेली आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाल्याशिवाय शांत बसणार नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे एकूण कर्ज १० लाख कोटींच्या आसपास आहे. ते माफ करायला पाहिजे. शेतकरी कर्जमुक्ती रॅली ही फक्त सुरुवात आहे.आण्णासाहेब चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी वैभव कांबळे, आदिनाथ हेमगिरे, चंदगडचे पं. स. सभापती जगन्नाथ हुलजी, आण्णासाहेब लठ्ठे, विठ्ठल मोरे, सागर शंभुशेटे, डॉ. श्रीवर्धन पाटील, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, महिला बाल कल्याण सभापती शुभांगी शिंदे, राजेंद्र गड्यान्नावर, सावकर मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास डॉ. महावीर अक्कोळे, मिलिंद साखरपे, आदी उपस्थित होते. नगरसेवक शैलेश चौगुले यांनी आभार मानले.जयसिंगपूर येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार राजू शेट्टी. यावेळी व्यासपीठावर आण्णासाहेब चौगुले, सुरेश कांबळे, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.