शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरची लढाई

By admin | Updated: April 16, 2017 01:02 IST

राजू शेट्टी यांची घोषणा : कोल्हापुरात ४ मे रोजी मोर्चा; आश्वासने न पाळल्याने पवित्रा

जयसिंगपूर : मागील एक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करीत आहे. शेतकरी कर्जमुक्तीवरून संघटना आता रस्त्यावरची लढाई करणार आहे. सात-बारा कोरा होईपर्यंत संघर्ष करणारच असून, ४ मे रोजी कोल्हापूरला मोर्चा काढून पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहे. शेतकऱ्यांना नव्याने उभे करायचे तर कर्जमुक्त करणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला दीडटप हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने कर्जमुक्ती ही चळवळ आता आंदोलनाच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या या लढाईत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.जयसिंगपूर येथे शनिवारी सिद्धेश्वर यात्री निवासमध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. यावेळी उसाचा दुसरा हप्ता व शेतकरी कर्जमुक्त रॅली नियोजन याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व पराभूत झालेल्या उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, कर्जमुक्तीचे शेतकरी हक्कदार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतीमालातून जवळपास १२ ते १३ लाख कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याला शासनच जबाबदार आहे. उद्योगपतींना दिलेली कर्जे बुडत असताना शेतजमिनी तारण ठेवून शेतकऱ्यांनी कर्जे घेतलेली आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाल्याशिवाय शांत बसणार नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे एकूण कर्ज १० लाख कोटींच्या आसपास आहे. ते माफ करायला पाहिजे. शेतकरी कर्जमुक्ती रॅली ही फक्त सुरुवात आहे.आण्णासाहेब चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी वैभव कांबळे, आदिनाथ हेमगिरे, चंदगडचे पं. स. सभापती जगन्नाथ हुलजी, आण्णासाहेब लठ्ठे, विठ्ठल मोरे, सागर शंभुशेटे, डॉ. श्रीवर्धन पाटील, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, महिला बाल कल्याण सभापती शुभांगी शिंदे, राजेंद्र गड्यान्नावर, सावकर मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास डॉ. महावीर अक्कोळे, मिलिंद साखरपे, आदी उपस्थित होते. नगरसेवक शैलेश चौगुले यांनी आभार मानले.जयसिंगपूर येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार राजू शेट्टी. यावेळी व्यासपीठावर आण्णासाहेब चौगुले, सुरेश कांबळे, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.