शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऊसबिलेअभावी शेतकऱ्यांची शेती कामे ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : साखर कारखान्याकडून यंदाच्या ऊस गळीत हंगामात एफआरपी कायद्यानुसार उसाची बिले वेळेवर मिळत नाही. एफआर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : साखर कारखान्याकडून यंदाच्या ऊस गळीत हंगामात एफआरपी कायद्यानुसार उसाची बिले वेळेवर मिळत नाही. एफआर फीचे तुकडे करून शेतकऱ्यांना ऊसबिले देण्याचे धोरण साखर कारखान्याचे आहे .ऊसबिलेअभावी ग्रामीण भागात शेतीची कामे ठप्प होऊ लागली आहे. ऊसबिले मिळत नसल्याने शेतीचे अर्थचक्र थंडावू लागले आहे.

यंदाचा ऊस गाळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला .सरासरी १५ मार्चनंतर साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपले. एकीकडे ऊस तोडणीसाठी ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून पैसे उकळले तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केल्याने दोन दोन महिने ऊसबिले दिलेली नाहीत. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे.

मार्चएण्डिग असूनही शेतकऱ्याच्या हाती पैसा नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. ग्रामीण बाजारपेठेतही आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे . ऊसबिलाअभावी शेतीमध्ये मशागतीची कामेही थंडावली आहे.

वाढत्या महागाईच्या काळात इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांनी शेती मशागतीचे दर वाढविले ट्रॅक्टर नांगरटी परवडत नाही. ऊसबिले मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होऊ लागली आहे. शेतीमध्ये नांगरटी करणे, शेणखत सोडणे, जमीन दुरुस्ती करणे, माती सोडणे इत्यादी मशागतीची कामे थंडावली आहेत .

चौकट १ = साखर कारखान्यांच्या निवडणुकीवर परिणाम होणार !

यंदाच्या ऊस गळीत हंगामात दोन दोन महिने ऊसबिले शेतकऱ्यांना मिळत नसल्याने साखर कारखान्यांच्या आगामी निवडणुकीवर परिणाम होणार अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली.

चौकट २ = ऊसतोडणी मजूर खुशीत !

यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांना धुतले गेले. जादा पैसे उकळून साठलेला पैसा तीर्थयात्रा सहली, भोजनावळ्या यावर खर्च करू झाल्याने ऐन मार्चएण्डिगमध्ये ऊसतोडणी मजूर खूश आहेत.

कोट - ऊसशेती परवडत नाही .

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची बिले एफआरपीच्या कायद्यानुसार वेळेत दिली जात नाही. त्यामुळे पैसे नसल्याने शेतीची कामे वेळेवर होत नाहीत. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. ऊसशेती परवडत नसल्याने इतर पिके घेणे गरजेचे आहे.

नामदेव पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य किसान सभा कोल्हापूर जिल्हा