शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

ऊसबिलेअभावी शेतकऱ्यांची शेती कामे ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : साखर कारखान्याकडून यंदाच्या ऊस गळीत हंगामात एफआरपी कायद्यानुसार उसाची बिले वेळेवर मिळत नाही. एफआर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : साखर कारखान्याकडून यंदाच्या ऊस गळीत हंगामात एफआरपी कायद्यानुसार उसाची बिले वेळेवर मिळत नाही. एफआर फीचे तुकडे करून शेतकऱ्यांना ऊसबिले देण्याचे धोरण साखर कारखान्याचे आहे .ऊसबिलेअभावी ग्रामीण भागात शेतीची कामे ठप्प होऊ लागली आहे. ऊसबिले मिळत नसल्याने शेतीचे अर्थचक्र थंडावू लागले आहे.

यंदाचा ऊस गाळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला .सरासरी १५ मार्चनंतर साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपले. एकीकडे ऊस तोडणीसाठी ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून पैसे उकळले तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केल्याने दोन दोन महिने ऊसबिले दिलेली नाहीत. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे.

मार्चएण्डिग असूनही शेतकऱ्याच्या हाती पैसा नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. ग्रामीण बाजारपेठेतही आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे . ऊसबिलाअभावी शेतीमध्ये मशागतीची कामेही थंडावली आहे.

वाढत्या महागाईच्या काळात इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांनी शेती मशागतीचे दर वाढविले ट्रॅक्टर नांगरटी परवडत नाही. ऊसबिले मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होऊ लागली आहे. शेतीमध्ये नांगरटी करणे, शेणखत सोडणे, जमीन दुरुस्ती करणे, माती सोडणे इत्यादी मशागतीची कामे थंडावली आहेत .

चौकट १ = साखर कारखान्यांच्या निवडणुकीवर परिणाम होणार !

यंदाच्या ऊस गळीत हंगामात दोन दोन महिने ऊसबिले शेतकऱ्यांना मिळत नसल्याने साखर कारखान्यांच्या आगामी निवडणुकीवर परिणाम होणार अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली.

चौकट २ = ऊसतोडणी मजूर खुशीत !

यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांना धुतले गेले. जादा पैसे उकळून साठलेला पैसा तीर्थयात्रा सहली, भोजनावळ्या यावर खर्च करू झाल्याने ऐन मार्चएण्डिगमध्ये ऊसतोडणी मजूर खूश आहेत.

कोट - ऊसशेती परवडत नाही .

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची बिले एफआरपीच्या कायद्यानुसार वेळेत दिली जात नाही. त्यामुळे पैसे नसल्याने शेतीची कामे वेळेवर होत नाहीत. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. ऊसशेती परवडत नसल्याने इतर पिके घेणे गरजेचे आहे.

नामदेव पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य किसान सभा कोल्हापूर जिल्हा