शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संप चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

By admin | Updated: June 4, 2017 01:32 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे, टोमॅटो फेकले; सरकारचाच्या निषेधाच्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विश्वासात न घेता काही शेतकरी नेत्यांनी सरकारशी केलेल्या तडजोडीने शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पाहावयास मिळत आहे. शनिवारी दुपारी अचानकपणे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कांदा, बटाटा, टोमॅटो फेकून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलीस प्रशासनाची धावाधाव झाली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करा, ‘स्वामिनाथन’ आयोगाच्या शिफारसी लागू करा, यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर गेले आहेत. मार्केटमध्ये फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याची आवक नाहीच; पण बाहेरून मुंबई, पुण्याकडे जाणारा शेतीमाल रोखण्यास सुरुवात केल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही शेतकरी नेत्यांशी चर्चा करून संप मागे घेतल्याचे जाहीर केले; पण त्यानंतर जिल्ह्णासह संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले. रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी सुरू केली. ‘मुख्यमंत्री, जयाजी सूर्यवंशी, सदाभाऊ खोत’ यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सोबत आणलेले कांदा, बटाटा, टोमॅटो, उसाची फेकाफेक सुरू केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बरोबर आंदोलनकर्त्यांना चर्चा करण्यास सागिंतले. रोज उठून तुमच्या दारात बसण्याची आम्हाला हौस नाही. कोणाला त्रास देण्याचा आमचा उद्देशही नाही; पण अन्यायाविरोधात उठाव करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नसल्याचे सांगत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयाजी सूर्यवंशी यांच्या कानात काहीतरी सांगून संपात फूट पाडण्याचे काम केले; पण शेतकरी नमणार नाही, तर सरकारला नमविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे म्हणाले, या संपात चांद्यापासून बांद्यापर्यंतचा शेतकरी व शेतकरी नेते उतरले आहेत. त्यामुळे चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना बोलावून चांगला तोडगा काढणे अपेक्षित होते. मध्यरात्री तीन वाजता मुख्यमंत्री बैठक घेऊन संपावर तोडगा काढतात, एवढी घाई कसली होती. यावेळी अ‍ॅड. अजित पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील, आदम मुजावर, कृष्णात पाटील, मकरंद कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, गोरखनाथ चंदनशिवे, आदी मान्यवर उपस्थित होते. सरकारने शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याच्या केलेल्या उद्योगामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी फसवाफसवी शोभत नाही. शेतकऱ्यांची ताकद काय आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकदा दाखवून देणार आहे. येथून पुढे आंदोलन अधिक तीव्र करून मुंबई, पुण्यासह सर्वच शहरांची नाकाबंदी करून सरकारला कोंडीत पकडणार आहोत. ५ जूनला महाराष्ट्र बंद, तर ६ जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आहोत. - रघुनाथदादा पाटील (नेते, शेतकरी संघटना) भाज्यांचे दर तिप्पटभाज्यांची आवक कमी झाल्याने दरात कमालीची वाढ झाली आहे. शनिवारी प्रमुख भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा तिप्पट झाले आहेत. रविवारी आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर भाजी कोठून आणायची? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. ———————————————————————कोल्हापूर बाजार समितीमधील तुलनात्मक आवक क्विंटलमध्ये -शेती माल २७ मे ३ जून भाजीपाला २४४४ १०२३फळे २३३७ १४५०कांदा-बटाटा १०६७४ ३१४ आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात विस्कटलेले कांदा, बटाटा, टोमॅटो गोळा करणारी एक वयोवृद्ध व्यक्ती. (फोटो-०३०६२०१७-कोल-शेतकरी०१) (छाया-दीपक जाधव) दीड लाख लिटरने संकलन घटले १ संपाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील दूध संकलनाला फटका बसला. ‘गोकुळ’, ‘वारणा, ‘स्वाभिमानी’ दूध संघांचे संकलन दीड लाख लिटरने कमी झाले आहे. २ अनेक गावांनी स्वत:हून दूध संकलन बंद केल्याने दुधाची आवक कमी झाली आहे. ‘गोकुळ’चे सुमारे ५० ते ६० हजार लिटर, ‘वारणा’चे २५ हजार, तर ‘स्वाभिमानी’चे ६५ हजार अशी दीड लाख लिटरहून अधिक दुधाची आवक कमी झाली आहे. ३ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. कांदा-बटाट्याची आवक तर एकदम कमी झाली असून, बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे. ३८ टॅँकर पोलीस बंदोबस्तात रवानाशनिवारी ‘गोकुळ’चे ३८ दुधाचे टॅँकर पोलीस बंदोबस्तात मुंबई व पुण्याला पाठविण्यात आले. इतर संघाच्याही संकलनात घट झाल्याने बाजारात दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वरवरची आश्वासने दिली आहेत. शेतकऱ्यांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. एक संघटनेबरोबर चर्चा केली म्हणजे सगळ्यांना मान्य होत नाही. - खासदार राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी संघटना