शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

संप चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

By admin | Updated: June 4, 2017 01:32 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे, टोमॅटो फेकले; सरकारचाच्या निषेधाच्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विश्वासात न घेता काही शेतकरी नेत्यांनी सरकारशी केलेल्या तडजोडीने शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पाहावयास मिळत आहे. शनिवारी दुपारी अचानकपणे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कांदा, बटाटा, टोमॅटो फेकून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलीस प्रशासनाची धावाधाव झाली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करा, ‘स्वामिनाथन’ आयोगाच्या शिफारसी लागू करा, यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर गेले आहेत. मार्केटमध्ये फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याची आवक नाहीच; पण बाहेरून मुंबई, पुण्याकडे जाणारा शेतीमाल रोखण्यास सुरुवात केल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही शेतकरी नेत्यांशी चर्चा करून संप मागे घेतल्याचे जाहीर केले; पण त्यानंतर जिल्ह्णासह संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले. रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी सुरू केली. ‘मुख्यमंत्री, जयाजी सूर्यवंशी, सदाभाऊ खोत’ यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सोबत आणलेले कांदा, बटाटा, टोमॅटो, उसाची फेकाफेक सुरू केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बरोबर आंदोलनकर्त्यांना चर्चा करण्यास सागिंतले. रोज उठून तुमच्या दारात बसण्याची आम्हाला हौस नाही. कोणाला त्रास देण्याचा आमचा उद्देशही नाही; पण अन्यायाविरोधात उठाव करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नसल्याचे सांगत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयाजी सूर्यवंशी यांच्या कानात काहीतरी सांगून संपात फूट पाडण्याचे काम केले; पण शेतकरी नमणार नाही, तर सरकारला नमविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे म्हणाले, या संपात चांद्यापासून बांद्यापर्यंतचा शेतकरी व शेतकरी नेते उतरले आहेत. त्यामुळे चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना बोलावून चांगला तोडगा काढणे अपेक्षित होते. मध्यरात्री तीन वाजता मुख्यमंत्री बैठक घेऊन संपावर तोडगा काढतात, एवढी घाई कसली होती. यावेळी अ‍ॅड. अजित पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील, आदम मुजावर, कृष्णात पाटील, मकरंद कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, गोरखनाथ चंदनशिवे, आदी मान्यवर उपस्थित होते. सरकारने शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याच्या केलेल्या उद्योगामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी फसवाफसवी शोभत नाही. शेतकऱ्यांची ताकद काय आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकदा दाखवून देणार आहे. येथून पुढे आंदोलन अधिक तीव्र करून मुंबई, पुण्यासह सर्वच शहरांची नाकाबंदी करून सरकारला कोंडीत पकडणार आहोत. ५ जूनला महाराष्ट्र बंद, तर ६ जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आहोत. - रघुनाथदादा पाटील (नेते, शेतकरी संघटना) भाज्यांचे दर तिप्पटभाज्यांची आवक कमी झाल्याने दरात कमालीची वाढ झाली आहे. शनिवारी प्रमुख भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा तिप्पट झाले आहेत. रविवारी आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर भाजी कोठून आणायची? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. ———————————————————————कोल्हापूर बाजार समितीमधील तुलनात्मक आवक क्विंटलमध्ये -शेती माल २७ मे ३ जून भाजीपाला २४४४ १०२३फळे २३३७ १४५०कांदा-बटाटा १०६७४ ३१४ आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात विस्कटलेले कांदा, बटाटा, टोमॅटो गोळा करणारी एक वयोवृद्ध व्यक्ती. (फोटो-०३०६२०१७-कोल-शेतकरी०१) (छाया-दीपक जाधव) दीड लाख लिटरने संकलन घटले १ संपाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील दूध संकलनाला फटका बसला. ‘गोकुळ’, ‘वारणा, ‘स्वाभिमानी’ दूध संघांचे संकलन दीड लाख लिटरने कमी झाले आहे. २ अनेक गावांनी स्वत:हून दूध संकलन बंद केल्याने दुधाची आवक कमी झाली आहे. ‘गोकुळ’चे सुमारे ५० ते ६० हजार लिटर, ‘वारणा’चे २५ हजार, तर ‘स्वाभिमानी’चे ६५ हजार अशी दीड लाख लिटरहून अधिक दुधाची आवक कमी झाली आहे. ३ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. कांदा-बटाट्याची आवक तर एकदम कमी झाली असून, बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे. ३८ टॅँकर पोलीस बंदोबस्तात रवानाशनिवारी ‘गोकुळ’चे ३८ दुधाचे टॅँकर पोलीस बंदोबस्तात मुंबई व पुण्याला पाठविण्यात आले. इतर संघाच्याही संकलनात घट झाल्याने बाजारात दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वरवरची आश्वासने दिली आहेत. शेतकऱ्यांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. एक संघटनेबरोबर चर्चा केली म्हणजे सगळ्यांना मान्य होत नाही. - खासदार राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी संघटना