शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शेतकऱ्यांची तीन हजार पेन्शनची मागणी

By admin | Updated: September 1, 2014 23:48 IST

कोल्हापूर शहर व परिसरातील लाक्षणिक उपोषण सुरू : किसान सभेचे आंदोलन; शंभरहून अधिक सहभागी

कोल्हापूर : साठ वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, २०१३ साली केलेला भूसंपादनाचा कायदा बदलला जाऊ नये, आदी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, सोमवारपासून तीन दिवसांच्या उपोषणाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर व परिसरातील सुमारे १०० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले. देशभरातील वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, भूसंपादनाचा कायदा बदलला जाऊ नये, त्याचबरोबर स्वामीनाथन समितीने शिफारस केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्केइतकी शेती मालाची आधारभूत किंमत जाहीर करावी, अशा मागण्या किसान सभेने केल्या. त्यासाठी अ.भा. किसान सभेने संपूर्ण देशपातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग ७२ तासांचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरातही या उपोषणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी पेन्शनचा कायदा करण्याचे अभिवचन राज्यसभेत दिल्यानंतरही या कायद्याबाबतचे नोटिफिकेशन काढलेले नाही. केंद्र सरकाने ताबडतोब लक्ष घालून पेन्शनचा कायदा बनविण्यासाठी पावले टाकावीत, अशी मागणी राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांनी केली. देशभरातील या उपोषणाद्वारेही सरकारला जाग येणार नसेल, तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी दिल्लीत जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही गावडे यांनी दिला. उपोषणाचे नेतृत्व नामदेव गावडे यांच्यासह रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, आशा कुकडे, सुशीला यादव, बाबा यादव, महादेव आवटे, संजय पाटील, दिनकर सूर्यवंशी, भारती जाधव, कृष्णात जाधव, नामदेव पाटील, शिवाजी सूर्यवंशी, आदींनी केले. (प्रतिनिधी)