शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST

जयसिंगपूर : मोदी सरकार सत्तेत आल्यावर स्वामिनाथनच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला दीडपट हमीभाव देणार होते. मात्र सत्तेत आल्यावर सरकारने हमीभावातून कायमचेच ...

जयसिंगपूर : मोदी सरकार सत्तेत आल्यावर स्वामिनाथनच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला दीडपट हमीभाव देणार होते. मात्र सत्तेत आल्यावर सरकारने हमीभावातून कायमचेच मुक्त करण्याचा कायदा केला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

हरियाणा-राजस्थान बॉर्डरच्या शेतकरी आंदोलनात शेट्टी बोलत होते. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा रविवारी सतरावा दिवस असून, आंदोलनाचा जोर आणखी वाढत आहे. या आंदोलनावरून केंद्रातील भाजप सरकारची कोंडी झाली आहे.

सरकार कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतकऱ्यांनी देशभरात रेल्वे आणि दिल्लीला जाणारे सर्व महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली काॅर्पाेरेट जगताच्या दावणीला भारताची संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था बांधण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; आणि त्यामुळेच कोणत्याही चर्चेविना सरकारने हे कायदे सभागृहात मंजूर केले आणि शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

आंदोलनात यावेळी योगेंद्र यादव, मेधाताई पाटकर, हानन मौला, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, कविता कनगुटी, कॉम्रेड सत्यवान, आदी सहभागी झाले होते.

चौकट - जयपूर-दिल्ली महामार्ग बंद

शेतकरी दिल्लीकडे जाऊ नयेत म्हणून रस्त्यांवर खड्डे करण्यात आले आहेत. तरीही आंदोलक निकराचा लढा देत आहेत. जर मोदी सरकारच्या बेबंदशाहीला आळा घालायला अपयशी झालो तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. राजस्थानमधून आलेल्या शेतकऱ्यांनी शहाँजानगाव येथे अडविल्याने जयपूर-दिल्ली महामार्ग बंद झाल्याने दिल्लीचे सर्व मार्ग बंद झाले असल्याचीही माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

फोटो - १३१२२०२०-जेएवाय-०२

फोटो ओळ - हरियाणा-राजस्थान बॉर्डर शेतकरी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी सहभागी झाले होते.