शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST

जयसिंगपूर : मोदी सरकार सत्तेत आल्यावर स्वामिनाथनच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला दीडपट हमीभाव देणार होते. मात्र सत्तेत आल्यावर सरकारने हमीभावातून कायमचेच ...

जयसिंगपूर : मोदी सरकार सत्तेत आल्यावर स्वामिनाथनच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला दीडपट हमीभाव देणार होते. मात्र सत्तेत आल्यावर सरकारने हमीभावातून कायमचेच मुक्त करण्याचा कायदा केला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

हरियाणा-राजस्थान बॉर्डरच्या शेतकरी आंदोलनात शेट्टी बोलत होते. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा रविवारी सतरावा दिवस असून, आंदोलनाचा जोर आणखी वाढत आहे. या आंदोलनावरून केंद्रातील भाजप सरकारची कोंडी झाली आहे.

सरकार कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतकऱ्यांनी देशभरात रेल्वे आणि दिल्लीला जाणारे सर्व महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली काॅर्पाेरेट जगताच्या दावणीला भारताची संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था बांधण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; आणि त्यामुळेच कोणत्याही चर्चेविना सरकारने हे कायदे सभागृहात मंजूर केले आणि शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

आंदोलनात यावेळी योगेंद्र यादव, मेधाताई पाटकर, हानन मौला, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, कविता कनगुटी, कॉम्रेड सत्यवान, आदी सहभागी झाले होते.

चौकट - जयपूर-दिल्ली महामार्ग बंद

शेतकरी दिल्लीकडे जाऊ नयेत म्हणून रस्त्यांवर खड्डे करण्यात आले आहेत. तरीही आंदोलक निकराचा लढा देत आहेत. जर मोदी सरकारच्या बेबंदशाहीला आळा घालायला अपयशी झालो तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. राजस्थानमधून आलेल्या शेतकऱ्यांनी शहाँजानगाव येथे अडविल्याने जयपूर-दिल्ली महामार्ग बंद झाल्याने दिल्लीचे सर्व मार्ग बंद झाले असल्याचीही माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

फोटो - १३१२२०२०-जेएवाय-०२

फोटो ओळ - हरियाणा-राजस्थान बॉर्डर शेतकरी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी सहभागी झाले होते.