शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST

जयसिंगपूर : मोदी सरकार सत्तेत आल्यावर स्वामिनाथनच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला दीडपट हमीभाव देणार होते. मात्र सत्तेत आल्यावर सरकारने हमीभावातून कायमचेच ...

जयसिंगपूर : मोदी सरकार सत्तेत आल्यावर स्वामिनाथनच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला दीडपट हमीभाव देणार होते. मात्र सत्तेत आल्यावर सरकारने हमीभावातून कायमचेच मुक्त करण्याचा कायदा केला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

हरियाणा-राजस्थान बॉर्डरच्या शेतकरी आंदोलनात शेट्टी बोलत होते. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा रविवारी सतरावा दिवस असून, आंदोलनाचा जोर आणखी वाढत आहे. या आंदोलनावरून केंद्रातील भाजप सरकारची कोंडी झाली आहे.

सरकार कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतकऱ्यांनी देशभरात रेल्वे आणि दिल्लीला जाणारे सर्व महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली काॅर्पाेरेट जगताच्या दावणीला भारताची संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था बांधण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; आणि त्यामुळेच कोणत्याही चर्चेविना सरकारने हे कायदे सभागृहात मंजूर केले आणि शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

आंदोलनात यावेळी योगेंद्र यादव, मेधाताई पाटकर, हानन मौला, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, कविता कनगुटी, कॉम्रेड सत्यवान, आदी सहभागी झाले होते.

चौकट - जयपूर-दिल्ली महामार्ग बंद

शेतकरी दिल्लीकडे जाऊ नयेत म्हणून रस्त्यांवर खड्डे करण्यात आले आहेत. तरीही आंदोलक निकराचा लढा देत आहेत. जर मोदी सरकारच्या बेबंदशाहीला आळा घालायला अपयशी झालो तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. राजस्थानमधून आलेल्या शेतकऱ्यांनी शहाँजानगाव येथे अडविल्याने जयपूर-दिल्ली महामार्ग बंद झाल्याने दिल्लीचे सर्व मार्ग बंद झाले असल्याचीही माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

फोटो - १३१२२०२०-जेएवाय-०२

फोटो ओळ - हरियाणा-राजस्थान बॉर्डर शेतकरी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी सहभागी झाले होते.