शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बांदीवडेत शेतकऱ्याचा खून

By admin | Updated: May 4, 2015 00:57 IST

जमिनीचा वाद : संशयिताचे घर जमावाने पेटविले; प्रापंचिक साहित्याची नासधूस

पन्हाळा/कोतोली : पन्हाळा तालुक्यातील बांदीवडे येथील नाना बापू पाटील (वय ६०) या शेतकऱ्याचा जमिनीच्या वादातून शनिवारी मध्यरात्री खून झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीत आली. याप्रकरणी संशयित सुखदेव गिरीगोसावी व नामदेव गिरीगोसावी यांच्या बांदीवडे येथील शेतामधील घर संतप्त नागरिकांनी पेटवून दिले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नामदेव शामराव गिरीगोसावी व नाना बापू पाटील या दोघांमध्ये जमीन गट नं. ३१२ च्या कारणावरून गेल्या चार वर्षांपासून भांडणे सुरू आहेत. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात वारंवार एकमेकांविरोधात तक्रारी दाखल आहेत. नाना पाटील यांनी आपली जमीन चार वर्षांपूर्वी विकली होती. ती जमीन नामदेव गिरीगोसावी याने खरेदी केली आहे. ही जमीन बल्डिंग करून चांगली केल्यानंतर नाना पाटील ही जमीन माझीच म्हणून गिरीगोसावी यास धमकावत असे व त्यातून भांडणे होत होती. नाना पाटील हे शनिवारी शेतजमिनीच्या वादाबाबत पन्हाळा कोर्टात गेले होते; पण रात्री ते परत आलेच नाहीत. त्यानुसार त्यांचा शोध सुरू होता. तसेच नाना पाटील यांचा मोबाईलसुद्धा बंद होता. दरम्यान पाटील यांच्या कुटुबिंयांनी त्याचा शोध घेण्यास सुरु केले. दरम्यान करंजफेण ते बांदिवडे या रस्त्यावरील गटारात रविवारी सकाळी त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. पाटील यांचा मृतदेह सापडल्यामुळे त्यांचे नातेवाईक संतप्त झाले. घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर असलेले संशयित आरोपी गिरीगोसावी बंधुंचे शेतातील घर पाटील यांच्या नातेवाइकांनी पेटवून दिले, तर घरातील प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी विशेष पोलीस पथक तैनात केले. खूनाबाबतची फिर्याद मृत नाना पाटील यांचे बंधू आण्णा बापू पाटील यांनी पन्हाळा पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक केली नसल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)